शहरं
Join us  
Trending Stories
1
आषाढी एकादशी सोहळा; मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजा; नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
2
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
3
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
4
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
5
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
6
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
7
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
8
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...
9
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
10
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
11
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
12
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
13
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
14
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
15
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
16
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
17
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
18
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
19
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
20
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान

कार्यकारी अभियंता देत आहेत वीज बचतीचे धडे

By admin | Updated: September 24, 2015 01:08 IST

नोकरीच्या निमित्ताने वाट्याला आलेली जबाबदारी कुरकूर न करता पार पाडणारे अधिकारी -कर्मचारी अनेक असतीलही.

महाविद्यालयांना भेटी : अर्चना घोडेस्वार यांच्या उपक्रमाचे कौतुक चंद्रपूर : नोकरीच्या निमित्ताने वाट्याला आलेली जबाबदारी कुरकूर न करता पार पाडणारे अधिकारी -कर्मचारी अनेक असतीलही. पण नोकरीतील चाकोरीबद्ध कामासोबतच परिघाबाहेर जावून जनजागृती करणारे अधिकारी बोटावर मोजणारेच आहेत. आपल्यावरील जबाबदारीच्या डोंगराएवढ्या कामातून वेळ काढत शाळा-महाविद्यालयात जावून विद्यार्थ्यांना वीज बचतीचे धडे देणाऱ्या एक महिला अधिकारी चंद्रपुरातही आहेत. महावितरण चंद्रपूर विभागाच्या कार्यकारी अभियंत्या अर्चना घोडेस्वार यांनी आपल्या या कामातून एक वेगळी प्रेरणावाट अन्य अधिकाऱ्यांसाठी निर्माण केली आहे.मागील वर्षभरापासून अर्चना घोडेस्वार वीज बचतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना शाळा-शाळांतून फिरत आहेत. या कामाचा कसलाही मोबदला न घेता आणि शाळांकडून कसलीही अपेक्षा न ठेवता त्या आपला आगळावेगळा उपक्रम राबवित पुढे निघाल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या युगात वीज ही चौथी प्राथमिक गरज बनली आहे. विजेशिवाय एक क्षणही कल्पवित नाही. परंतु अशी ही वीज निर्माण करण्यास वीज निर्मिती कंपनीस कोळसा व पाणी यांचे कशाप्रकारे नियोजन करावे लागते, वीज निर्मिती करताना काय काय अडचणी येतात, विजेची निर्मिती झाल्यावर वीज कशाप्रकारे वीज वाहिन्यातून ग्राहकांपर्यंत पोहोचते, विजेचा अपव्यय टाळल्यास कशी शेकडो युनिट वीज वाचू शकते, याबाबत माहिती अभियंत्या अर्चना घोडेस्वार व त्यांचे सहकारी अभियंते विद्यार्थ्यांना देत आहेत.वीज आणि पर्यावरण ऱ्हास याची सांगड घालत त्या विद्यार्थ्यांना विज बचतीचे महत्व सांगत असतात. वीज निर्मितीसाठी शेकडो टन कोळसा वापरण्यात येतो. शिवाय पाणीही अतिशय जास्त प्रमाणात वापरावे लागते. त्यामुळे विजेची बचत म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे व शेकडो टन कोळसा व पाणी वाचविणे, आपले भविष्य सुधारणे, असे साधे समीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना मनात बिंबवित आहेत. वीजसुरक्षा या विषयावरही या उपक्रमात त्यांचे मार्गदर्शन असते. पावसाळ्यात वीज वारंवार का जाते, तसेच उन्हाळ्यात विजेची मागणी का वाढते, वीजपुरवठा खंडीत झाल्यावर वीज कर्मचारी तो कशाप्रकारे सुरळीत करतात, त्यावेळी त्यांना काय काय अडचणींचा सामना करावा लागतो, त्यानंतर ताबडतोब वीज पुरवठा कशाप्रकारे सुरळीत होतो, या सर्व बाबी अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून दिले जात आहे.आठवी ते १२ व्या वर्गातील विद्यार्थी बऱ्यापैकी सज्ञान असल्याने त्यांनी मार्गदर्शनासाठी या वयोगटातील मुलांची निवड केली आहे. तंत्रनिकेतन महाविद्यालयात जावूनही त्या विद्यार्थ्यांना विजेचे महत्त्व समजावून देत असतात. विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, या संशोधनातून प्रदुषणविरहीत निर्मिती व्हावी, असा त्यांचा प्रत्येक शाळेत आग्रह असतो. (स्थानिक प्रतिनिधी)