शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

कार्यकारी अभियंता देत आहेत वीज बचतीचे धडे

By admin | Updated: September 24, 2015 01:08 IST

नोकरीच्या निमित्ताने वाट्याला आलेली जबाबदारी कुरकूर न करता पार पाडणारे अधिकारी -कर्मचारी अनेक असतीलही.

महाविद्यालयांना भेटी : अर्चना घोडेस्वार यांच्या उपक्रमाचे कौतुक चंद्रपूर : नोकरीच्या निमित्ताने वाट्याला आलेली जबाबदारी कुरकूर न करता पार पाडणारे अधिकारी -कर्मचारी अनेक असतीलही. पण नोकरीतील चाकोरीबद्ध कामासोबतच परिघाबाहेर जावून जनजागृती करणारे अधिकारी बोटावर मोजणारेच आहेत. आपल्यावरील जबाबदारीच्या डोंगराएवढ्या कामातून वेळ काढत शाळा-महाविद्यालयात जावून विद्यार्थ्यांना वीज बचतीचे धडे देणाऱ्या एक महिला अधिकारी चंद्रपुरातही आहेत. महावितरण चंद्रपूर विभागाच्या कार्यकारी अभियंत्या अर्चना घोडेस्वार यांनी आपल्या या कामातून एक वेगळी प्रेरणावाट अन्य अधिकाऱ्यांसाठी निर्माण केली आहे.मागील वर्षभरापासून अर्चना घोडेस्वार वीज बचतीचे महत्त्व विद्यार्थ्यांना शाळा-शाळांतून फिरत आहेत. या कामाचा कसलाही मोबदला न घेता आणि शाळांकडून कसलीही अपेक्षा न ठेवता त्या आपला आगळावेगळा उपक्रम राबवित पुढे निघाल्या आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. आजच्या युगात वीज ही चौथी प्राथमिक गरज बनली आहे. विजेशिवाय एक क्षणही कल्पवित नाही. परंतु अशी ही वीज निर्माण करण्यास वीज निर्मिती कंपनीस कोळसा व पाणी यांचे कशाप्रकारे नियोजन करावे लागते, वीज निर्मिती करताना काय काय अडचणी येतात, विजेची निर्मिती झाल्यावर वीज कशाप्रकारे वीज वाहिन्यातून ग्राहकांपर्यंत पोहोचते, विजेचा अपव्यय टाळल्यास कशी शेकडो युनिट वीज वाचू शकते, याबाबत माहिती अभियंत्या अर्चना घोडेस्वार व त्यांचे सहकारी अभियंते विद्यार्थ्यांना देत आहेत.वीज आणि पर्यावरण ऱ्हास याची सांगड घालत त्या विद्यार्थ्यांना विज बचतीचे महत्व सांगत असतात. वीज निर्मितीसाठी शेकडो टन कोळसा वापरण्यात येतो. शिवाय पाणीही अतिशय जास्त प्रमाणात वापरावे लागते. त्यामुळे विजेची बचत म्हणजे पर्यावरणाचा ऱ्हास थांबविणे व शेकडो टन कोळसा व पाणी वाचविणे, आपले भविष्य सुधारणे, असे साधे समीकरण या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्यांना मनात बिंबवित आहेत. वीजसुरक्षा या विषयावरही या उपक्रमात त्यांचे मार्गदर्शन असते. पावसाळ्यात वीज वारंवार का जाते, तसेच उन्हाळ्यात विजेची मागणी का वाढते, वीजपुरवठा खंडीत झाल्यावर वीज कर्मचारी तो कशाप्रकारे सुरळीत करतात, त्यावेळी त्यांना काय काय अडचणींचा सामना करावा लागतो, त्यानंतर ताबडतोब वीज पुरवठा कशाप्रकारे सुरळीत होतो, या सर्व बाबी अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना समजावून दिले जात आहे.आठवी ते १२ व्या वर्गातील विद्यार्थी बऱ्यापैकी सज्ञान असल्याने त्यांनी मार्गदर्शनासाठी या वयोगटातील मुलांची निवड केली आहे. तंत्रनिकेतन महाविद्यालयात जावूनही त्या विद्यार्थ्यांना विजेचे महत्त्व समजावून देत असतात. विद्यार्थ्यांनी संशोधन करावे, या संशोधनातून प्रदुषणविरहीत निर्मिती व्हावी, असा त्यांचा प्रत्येक शाळेत आग्रह असतो. (स्थानिक प्रतिनिधी)