शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
6
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
7
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
8
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
9
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
10
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
11
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
12
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
13
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
14
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
15
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
16
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
17
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
18
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
19
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
20
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   

अप्रगत गावांना वगळून प्रगत गावाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 00:46 IST

पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक खासदाराने त्यांच्या मतदारसंघातील एका गावाची विकास कामांसाठी मॉडेल म्हणून निवड करावी ...

मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजना : योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळगोवरी : पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक खासदाराने त्यांच्या मतदारसंघातील एका गावाची विकास कामांसाठी मॉडेल म्हणून निवड करावी व त्या गावाचा मॉडेल गाव म्हणून विकास करावा, याकरिता प्रधानमंत्री दत्तक ग्राम योजनेची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर राज्यातही मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेची घोषणा करण्यात आली होती; मात्र या योजनेत आमदारांनी गावाची निवड करताना प्रगत गावाचीच निवड केल्याने दुर्गम गावांतील नागरिकांत रोष पसरला आहे.प्रत्येक आमदाराने त्यांच्या मतदारसंघातील एका दुर्गम व अप्रगत गावाची या योजनेसाठी निवड करावी आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या गावांचा विकास करावा, अशी संकल्पना मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेमागची होती. मात्र, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी या योजनेसाठी राज्य महामार्गावरील चंदनवाही या गावाची निवड केली. सदर गाव हे पूर्वीपासूनच प्रगत असून, या गावाची राष्ट्रपती पुरस्कारासाठीही निवड झाली आहे. चंदनवाही गावात विकासाच्या अनेक योजना यापूर्वीच राबविण्यात आल्या आहेत. गावातील सर्वच रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले आहे. पाण्याची अद्ययावत टाकीचेही निर्माण झाले आहे. गावात अद्यायावत स्वरूपाच्या अंगणवाड्या असून, ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. गावातील जवळपास ८० टक्के शेतजमिनीला पाण्याची सोय आहे. गाव पूर्वीपासूनच हागणदारीमुक्त आहे. सन २०१५ मध्ये सदर गावाची या योजनेसाठी निवड करण्यात आली. दोन वर्षाच्या कालावधीत दत्तक ग्रामच्या नावावर केवळ १० लाख रुपयांच्या रस्ता बांधकामासाठी स्थानिक विकास निधीतून निधीतून मंजूर करण्यात आले. गावातील कोसा निर्मिती केंद्र मागील अनेक वर्षापासून बंद असून, या केंद्राच्या पुनर्निर्माणासाठीही या दोन वर्षात कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. मुळात सदर योजनेसाठी अप्रगत व दुर्गम भागातील निवड अपेक्षित असताना आधीपासूनच प्रगत असलेल्या गावाची निवड का करण्यात आली, हा मोठा प्रश्न आहे.सदर गावाची या योजनेसाठी निवड झाल्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे. सदर योजनेसाठी क्षेत्रातील एखाद्या दुर्गम व अप्रगती गावाची निवड करून विकास करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)