शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

अप्रगत गावांना वगळून प्रगत गावाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 00:46 IST

पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक खासदाराने त्यांच्या मतदारसंघातील एका गावाची विकास कामांसाठी मॉडेल म्हणून निवड करावी ...

मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजना : योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळगोवरी : पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक खासदाराने त्यांच्या मतदारसंघातील एका गावाची विकास कामांसाठी मॉडेल म्हणून निवड करावी व त्या गावाचा मॉडेल गाव म्हणून विकास करावा, याकरिता प्रधानमंत्री दत्तक ग्राम योजनेची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर राज्यातही मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेची घोषणा करण्यात आली होती; मात्र या योजनेत आमदारांनी गावाची निवड करताना प्रगत गावाचीच निवड केल्याने दुर्गम गावांतील नागरिकांत रोष पसरला आहे.प्रत्येक आमदाराने त्यांच्या मतदारसंघातील एका दुर्गम व अप्रगत गावाची या योजनेसाठी निवड करावी आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या गावांचा विकास करावा, अशी संकल्पना मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेमागची होती. मात्र, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी या योजनेसाठी राज्य महामार्गावरील चंदनवाही या गावाची निवड केली. सदर गाव हे पूर्वीपासूनच प्रगत असून, या गावाची राष्ट्रपती पुरस्कारासाठीही निवड झाली आहे. चंदनवाही गावात विकासाच्या अनेक योजना यापूर्वीच राबविण्यात आल्या आहेत. गावातील सर्वच रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले आहे. पाण्याची अद्ययावत टाकीचेही निर्माण झाले आहे. गावात अद्यायावत स्वरूपाच्या अंगणवाड्या असून, ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. गावातील जवळपास ८० टक्के शेतजमिनीला पाण्याची सोय आहे. गाव पूर्वीपासूनच हागणदारीमुक्त आहे. सन २०१५ मध्ये सदर गावाची या योजनेसाठी निवड करण्यात आली. दोन वर्षाच्या कालावधीत दत्तक ग्रामच्या नावावर केवळ १० लाख रुपयांच्या रस्ता बांधकामासाठी स्थानिक विकास निधीतून निधीतून मंजूर करण्यात आले. गावातील कोसा निर्मिती केंद्र मागील अनेक वर्षापासून बंद असून, या केंद्राच्या पुनर्निर्माणासाठीही या दोन वर्षात कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. मुळात सदर योजनेसाठी अप्रगत व दुर्गम भागातील निवड अपेक्षित असताना आधीपासूनच प्रगत असलेल्या गावाची निवड का करण्यात आली, हा मोठा प्रश्न आहे.सदर गावाची या योजनेसाठी निवड झाल्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे. सदर योजनेसाठी क्षेत्रातील एखाद्या दुर्गम व अप्रगती गावाची निवड करून विकास करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)