शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

अप्रगत गावांना वगळून प्रगत गावाची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 00:46 IST

पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक खासदाराने त्यांच्या मतदारसंघातील एका गावाची विकास कामांसाठी मॉडेल म्हणून निवड करावी ...

मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजना : योजनेच्या मूळ उद्देशाला हरताळगोवरी : पंतप्रधान मोदी यांनी प्रत्येक खासदाराने त्यांच्या मतदारसंघातील एका गावाची विकास कामांसाठी मॉडेल म्हणून निवड करावी व त्या गावाचा मॉडेल गाव म्हणून विकास करावा, याकरिता प्रधानमंत्री दत्तक ग्राम योजनेची घोषणा केली होती. त्याच धर्तीवर राज्यातही मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेची घोषणा करण्यात आली होती; मात्र या योजनेत आमदारांनी गावाची निवड करताना प्रगत गावाचीच निवड केल्याने दुर्गम गावांतील नागरिकांत रोष पसरला आहे.प्रत्येक आमदाराने त्यांच्या मतदारसंघातील एका दुर्गम व अप्रगत गावाची या योजनेसाठी निवड करावी आणि राज्य शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या गावांचा विकास करावा, अशी संकल्पना मुख्यमंत्री दत्तक ग्राम योजनेमागची होती. मात्र, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे यांनी या योजनेसाठी राज्य महामार्गावरील चंदनवाही या गावाची निवड केली. सदर गाव हे पूर्वीपासूनच प्रगत असून, या गावाची राष्ट्रपती पुरस्कारासाठीही निवड झाली आहे. चंदनवाही गावात विकासाच्या अनेक योजना यापूर्वीच राबविण्यात आल्या आहेत. गावातील सर्वच रस्त्यांचे सिमेंटीकरण झाले आहे. पाण्याची अद्ययावत टाकीचेही निर्माण झाले आहे. गावात अद्यायावत स्वरूपाच्या अंगणवाड्या असून, ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्णत्वास आले आहे. गावातील जवळपास ८० टक्के शेतजमिनीला पाण्याची सोय आहे. गाव पूर्वीपासूनच हागणदारीमुक्त आहे. सन २०१५ मध्ये सदर गावाची या योजनेसाठी निवड करण्यात आली. दोन वर्षाच्या कालावधीत दत्तक ग्रामच्या नावावर केवळ १० लाख रुपयांच्या रस्ता बांधकामासाठी स्थानिक विकास निधीतून निधीतून मंजूर करण्यात आले. गावातील कोसा निर्मिती केंद्र मागील अनेक वर्षापासून बंद असून, या केंद्राच्या पुनर्निर्माणासाठीही या दोन वर्षात कोणतेही प्रयत्न करण्यात आलेले नाही. मुळात सदर योजनेसाठी अप्रगत व दुर्गम भागातील निवड अपेक्षित असताना आधीपासूनच प्रगत असलेल्या गावाची निवड का करण्यात आली, हा मोठा प्रश्न आहे.सदर गावाची या योजनेसाठी निवड झाल्यामुळे या योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासण्यात आला आहे. सदर योजनेसाठी क्षेत्रातील एखाद्या दुर्गम व अप्रगती गावाची निवड करून विकास करण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर)