शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

चिनी वस्तूवर बहिष्कार टाका

By admin | Updated: October 29, 2016 00:51 IST

चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानला सहकार्य करीत आहे. त्यामुळे भारताची चारही बाजूने कोंडी होत आहे.

रघुवीर अहीर : कमल स्पोर्र्टींग कल्बचे आंदोलन चंद्रपूर : चीन भारताच्या विरोधात पाकिस्तानला सहकार्य करीत आहे. त्यामुळे भारताची चारही बाजूने कोंडी होत आहे. पाकिस्तानला शस्त्र, अस्त्र उपलब्ध करुन देत असल्यामुळे आपल्या जवानाचा नाहक बळी जात आहे. मात्र आर्थिक बाजूने चीनच्या उत्पादीत वस्तूचा वापर आपण मोठ्या प्रमाणात करीत आहोत. त्यामुळे चीनची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. त्यामुळे आपणाला चीनच्या वस्तूवर बहिष्कार टाकणे गरजेचे आहे, असे वक्तव्य कमल स्पोर्र्टींग कल्बचे अध्यक्ष रघूवीर अहीर यांनी केले.चिनी वस्तूच्या बहिष्कार आंदोलनालनासाठी काढण्यात आलेल्या रॅलीच्या वेळी ते बोलत होते. कमल स्पोर्र्टींग कल्ब व स्वदेशी जागरण मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी गिरणार चौकातून गांधी चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. कमल स्पोर्र्टींग कल्बचे मार्गदर्शक शिवम त्रिवेदी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी रघूवीर अहीर म्हणाले, आज आपण प्रत्येक छोट्या मोठ्या सर्व वस्तंूसाठी चिनी वस्तूचा वापर करीत आहोत. त्या वस्तूचा वापर करणे टाळावे व चिनी वस्तूवर बहीष्कार टाकावा, असे आवाहन केले. यावेळी क्लबचे उपाध्यक्ष सुरज पेंदूलवार म्हणाले, चीन भारताच्या विरोधी पाकिस्तानला सहकार्य करीत आहे. त्यामुळे भारताला पाकिस्तानसोबत प्रत्यक्ष व चीनसोबत अप्रत्यक्ष लढाई करावी लागत आहे. चीनचे सामर्थ्य त्यांच्या व्यापारावर अवंलबून आहे. त्यामूळे चिनी वस्तूवर नागरिकांनी बहिष्कार टाकावा, असे ते म्हणाले. यावेळी मोहन चौधरी यांनीसुद्धा मार्गदर्शन केले. यावेळी कल्बचे अध्यक्ष रघूवीर अहीर, सुरज पेंदूलवार, राहूल गायकवाड, हिमायू अली, प्रज्वल कडू, शिवम त्रिवेदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रज्वल कडू यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अभिनव लिंगोजवार, जगदीश दंडेले, तेजा सिंग, महेश अहीर, कमल कालीवाले, रवी बनकर, हेमराज काबलिया, जितू शर्मा, मयूर झाडे, विपीन मेंढे, अक्षय खांडेकर, जितेश वासेकर आदींनी प्रयत्न केले. (नगर प्रतिनिधी)