शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

किबी बाईट्स कॉम्प्युटर इन्स्टिट्युट केंद्राच्या विरोधात परीक्षार्थ्यांत संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 00:06 IST

आॅनलाईन परीक्षा केंद्रावर नादुरूस्त संगणक व लिंक जुळत नसल्याने अनेक परीक्षार्थिंना मनस्ताप सहन करावा लागल्याचा ....

ठळक मुद्देजुने संगणक : लिंक जुळत नसल्याने अनेकांनी प्रश्न सोडविलेच नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आॅनलाईन परीक्षा केंद्रावर नादुरूस्त संगणक व लिंक जुळत नसल्याने अनेक परीक्षार्थिंना मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार बाबुपेठ बायपास मार्गावरील किबी बाईट्स कॉम्प्युटर इन्स्टिट्युट केंद्रावर शनिवार व रविवारी घडला. आॅनलाईन एक प्रश्न सोडविण्यासाठी बराच वेळ जात होता. या प्रकारामुळे अनेक विद्यार्थ्यांना पूर्ण प्रश्न सोडविता आले नाही. त्यामुळे परीक्षार्थींचे नुकसान झाले असून या केंद्रावरील सर्व परीक्षार्थीची पुन्हा परीक्षा घेवून सदर परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याची मागणी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनातून करण्यात आली आहे.रिजनल रुरल बँकेत (आरआरबी) परिविक्षाधिन अधिकारी या पदासाठी शनिवार व रविवारला सर्वत्र पूर्व परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी चंद्रपूर शहरात तीन परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यापैकी किबी बाईट्स कॉम्प्युटर इंन्स्टिट्युट केंद्रावरील परीक्षार्थींना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. देशातील विविध बँकांमध्ये पदभरती करण्यासाठी परीक्षांचे कंत्राट काही नामांकित कंपन्यांना देण्यात आले आहे. आरआरबी पीओ साठी परीक्षा प्रक्रिया आटोपण्याचे कंत्राट इन्स्टिट्युट आॅफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (आयबीपीएस) कडे देण्यात आले आहे. अआयआरबी पीओसाठी आॅनलाईन पूर्व परीक्षा शनिवारी व रविवारी आटोपली. या आॅनलाईन परीक्षेत एटीट्युट आणि रिजनिंग असे दोन प्रत्येकी ४० गुणांचे पेपर होते. ४५ मिनिटात हे दोन्ही पेपर सोडवायचे होते. या परीक्षेसाठी चंद्रपुरात तीन परीक्षा केंद्र ठेवण्यात आले. त्यापैकी किबी बाईट्स कॉम्प्युटर इन्स्टिट्युट हे एक केंद्र होते. या केंद्रातील बहुतेक संगणक हे जुने आणि नादुरुस्त अवस्थेत होते. त्यामुळे प्रश्नपत्रिका डाऊनलोड करणे तसेच प्रश्नाचे उत्तर सेव्ह करताना बराच वेळ लागत होता. त्यात विद्यार्थ्यांचा बराच वेळ गेला. याबाबत परीक्षार्थींनी विचारणा केली असता, केंद्र संचालकाकडून सर्व्हर प्रॉब्लेम असल्याचे सांगण्यात आले. मात्र, इतर कोणत्याही परीक्षो केंद्रावर विद्यार्थ्यांना अशी अडचण गेली नाही. त्यामुळे अधिक माहिती घेतल्यानंतर या केंद्रातील संगणक जुने आणि नादुरुस्त असल्यामुळे लिंक निट जुळत नव्हती. त्यामुळे आॅनलाईन परीक्षा देताना विद्यार्थ्यांना नाहक मनस्पात सहन करावा लागला.केंद्र संचालकाच्या चुकीमुळे परीक्षार्थींना नाहक त्रास सहन करावा लागत असेल तर परीक्षा पुन्हा का घेण्यात येऊ नये, असा प्रश्न परीक्षार्थींनी केला आहे. यासाठी सोमवारी अन्यायग्रस्त परीक्षार्थींनी जिल्हाधिकाºयांची भेट घेऊन निवेदन दिले. यात सदर परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करण्याची मागणी केली असून आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. यावेळी अमर जिल्हेकर, सध्धम फुलझेले, दीपक गेडाम, प्रशांत खापर्डे, अनिकेत करमनकर यांच्यासह ४२ परीक्षार्थी उपस्थित होते.