शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

बेरोजगारांपुढे परीक्षा शुल्काचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:27 IST

शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या नोकर महाभरतीत विविध विभागाच्या जागांसाठी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. आधीच बेरोजगार, मग एवढे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगार युवकांना पडला आहे. यामुळे संतापलेला युवावर्ग आता मानसिक तणावासोबतच आर्थिक तणावातही गुरफटला जात आहे. या प्रकारामुळे अनेक होतकरू व हुशार युवक अर्ज भरण्यास असमर्थ ठरत आहेत.

ठळक मुद्देपैसे आणायचे कुठून? : प्रत्येक परीक्षेसाठी हजारो रुपये शुल्क

परीमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या नोकर महाभरतीत विविध विभागाच्या जागांसाठी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. आधीच बेरोजगार, मग एवढे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगार युवकांना पडला आहे. यामुळे संतापलेला युवावर्ग आता मानसिक तणावासोबतच आर्थिक तणावातही गुरफटला जात आहे. या प्रकारामुळे अनेक होतकरू व हुशार युवक अर्ज भरण्यास असमर्थ ठरत आहेत.मागील काही वर्षांपूर्वी शासनाने नोकर भरती बंद केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. दरम्यान, शासनाने २०१९ ला मोठ्या प्रमाणात नोकभरती राबविण्याची घोषणा केली. त्यामुळे अनेक युवक स्पर्धा परीक्षेची तयारी जोमाने करु लागले. काही दिवसांपूर्वीच विविध पदांच्या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या. मात्र त्या पदभरतीसाठी पाचशे ते हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. बेकारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे युवक मिळेल ते काम करुन स्पर्धा परीक्षेची तयार करीत आहेत. मात्र पदभरतीमध्ये हजारो रुपये शुल्क आकारण्यात येत असल्यामुळे अनेकजण अर्ज भरणे टाळत आहेत. परिणामी अनेकांचे शासकीय नोकरीचे स्वप्न अंधातरीच राहण्याची चिन्हे दिसून येत आहेत.असे आहे परीक्षा शुल्कराज्य मार्ग परिवहन महामंडळातील ७६ जागांसाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर मागसवर्गीयसाठी ५०० रुपये, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक हजार रुपये, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक एक हजार, भारतीय रेल्वे विभाग खुला व ओबीसी ५००, मागासवर्गीय २५०, राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स ७०० रुपये, युनियन बॅक आॅफ इंडिया ६०० रुपये, बँक आॅफ बळोदा ६००, कर्मचारी राज्य विमा महामंडळ पाचशे रुपये, तलाठी भरती खुला व इतर मागासवर्गीय ५००, मागासवर्गीय ३५०, शिक्षक भरती ५०० रुपये, भारतीय जिवन विकास महामंडळ ६०० रुपये अशा विविध ठिकाणी पाचशेच्या वर शुल्क आकारण्यात येत आहे. यासोबतच बँक शुल्क उमेदवाराला वेगळे द्यावे लागते.एका अर्जामागे दीड ते दोन हजार खर्चनुकत्याच राबविण्यात येत असलेल्या नोकर भरतीमध्ये पाचशे ते हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. सदर शुल्क भरण्यासाठी बँकेचे शुल्क वेगळे, अर्ज भरताना नेट कॅफेचे शुल्क, अर्ज प्रिंट करणे आदीसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासोबत अनेक विभागाच्या परीक्षा या जिल्हा पातळीवर नसून विभागीयस्थळी असतात. त्यामुळे प्रवास खर्च वेगळा असा सरासरी एका अर्जाला दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे अर्ज भरताना युवकांना मोठी कसरत करावी लागते.भरती रद्द तर होणार नाही?विविध पदांच्या भरतीसाठी जागा निघाल्या आहेत. मात्र नुकताच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यातच आदर्श आचारसंहितेची घोषणा झाली आहे. निवडणुकीचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार आहे. त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे नोकर भरती रद्द तर होणार नाही ना, अशी भीती बेरोजगार युवकांना सतावत आहे.