शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

बेरोजगारांपुढे परीक्षा शुल्काचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 23:27 IST

शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या नोकर महाभरतीत विविध विभागाच्या जागांसाठी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. आधीच बेरोजगार, मग एवढे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगार युवकांना पडला आहे. यामुळे संतापलेला युवावर्ग आता मानसिक तणावासोबतच आर्थिक तणावातही गुरफटला जात आहे. या प्रकारामुळे अनेक होतकरू व हुशार युवक अर्ज भरण्यास असमर्थ ठरत आहेत.

ठळक मुद्देपैसे आणायचे कुठून? : प्रत्येक परीक्षेसाठी हजारो रुपये शुल्क

परीमल डोहणे।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या नोकर महाभरतीत विविध विभागाच्या जागांसाठी पाचशे ते हजार रुपयांपर्यंत परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. आधीच बेरोजगार, मग एवढे पैसे आणायचे कुठून, असा प्रश्न पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या बेरोजगार युवकांना पडला आहे. यामुळे संतापलेला युवावर्ग आता मानसिक तणावासोबतच आर्थिक तणावातही गुरफटला जात आहे. या प्रकारामुळे अनेक होतकरू व हुशार युवक अर्ज भरण्यास असमर्थ ठरत आहेत.मागील काही वर्षांपूर्वी शासनाने नोकर भरती बंद केली होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बेरोजगारांची फौज तयार झाली आहे. दरम्यान, शासनाने २०१९ ला मोठ्या प्रमाणात नोकभरती राबविण्याची घोषणा केली. त्यामुळे अनेक युवक स्पर्धा परीक्षेची तयारी जोमाने करु लागले. काही दिवसांपूर्वीच विविध पदांच्या भरतीसाठी जाहिराती प्रसिद्ध झाल्या. मात्र त्या पदभरतीसाठी पाचशे ते हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. बेकारी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे युवक मिळेल ते काम करुन स्पर्धा परीक्षेची तयार करीत आहेत. मात्र पदभरतीमध्ये हजारो रुपये शुल्क आकारण्यात येत असल्यामुळे अनेकजण अर्ज भरणे टाळत आहेत. परिणामी अनेकांचे शासकीय नोकरीचे स्वप्न अंधातरीच राहण्याची चिन्हे दिसून येत आहेत.असे आहे परीक्षा शुल्कराज्य मार्ग परिवहन महामंडळातील ७६ जागांसाठी खुल्या प्रवर्गासाठी एक हजार रुपये तर मागसवर्गीयसाठी ५०० रुपये, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक हजार रुपये, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅक एक हजार, भारतीय रेल्वे विभाग खुला व ओबीसी ५००, मागासवर्गीय २५०, राष्ट्रीय केमिकल्स व फर्टिलायझर्स ७०० रुपये, युनियन बॅक आॅफ इंडिया ६०० रुपये, बँक आॅफ बळोदा ६००, कर्मचारी राज्य विमा महामंडळ पाचशे रुपये, तलाठी भरती खुला व इतर मागासवर्गीय ५००, मागासवर्गीय ३५०, शिक्षक भरती ५०० रुपये, भारतीय जिवन विकास महामंडळ ६०० रुपये अशा विविध ठिकाणी पाचशेच्या वर शुल्क आकारण्यात येत आहे. यासोबतच बँक शुल्क उमेदवाराला वेगळे द्यावे लागते.एका अर्जामागे दीड ते दोन हजार खर्चनुकत्याच राबविण्यात येत असलेल्या नोकर भरतीमध्ये पाचशे ते हजार रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येत आहे. सदर शुल्क भरण्यासाठी बँकेचे शुल्क वेगळे, अर्ज भरताना नेट कॅफेचे शुल्क, अर्ज प्रिंट करणे आदीसाठी पैसे मोजावे लागतात. त्यासोबत अनेक विभागाच्या परीक्षा या जिल्हा पातळीवर नसून विभागीयस्थळी असतात. त्यामुळे प्रवास खर्च वेगळा असा सरासरी एका अर्जाला दीड ते दोन हजार रुपये खर्च येतो. त्यामुळे अर्ज भरताना युवकांना मोठी कसरत करावी लागते.भरती रद्द तर होणार नाही?विविध पदांच्या भरतीसाठी जागा निघाल्या आहेत. मात्र नुकताच लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. त्यातच आदर्श आचारसंहितेची घोषणा झाली आहे. निवडणुकीचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार आहे. त्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे. त्यामुळे नोकर भरती रद्द तर होणार नाही ना, अशी भीती बेरोजगार युवकांना सतावत आहे.