शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
3
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
4
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
5
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
6
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
7
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
8
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
9
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
10
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
11
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
12
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
13
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
14
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
15
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
16
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
17
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
18
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
19
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
20
Farrhana Bhatt : वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष

शेतीलाच मानले सर्वस्व

By admin | Updated: October 21, 2015 01:17 IST

अपयश हाच माणसाचा पहिला गुरु असतो, असे म्हणतात. या अपयशातून कोणी काही बोध घेतला तर तो प्रगतीचा कितीही टप्पा गाठू शकतो, हे डोंगरगावच्या शंकर पाथोडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे.

शेती व्यवसायात नवा पायंडा : भाजीपाला पिकाने झाली आर्थिक उन्नतीघनश्याम नवघडे नागभीडअपयश हाच माणसाचा पहिला गुरु असतो, असे म्हणतात. या अपयशातून कोणी काही बोध घेतला तर तो प्रगतीचा कितीही टप्पा गाठू शकतो, हे डोंगरगावच्या शंकर पाथोडे यांनी सिद्ध करून दाखवले आहे. पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करुन पाथोडे यांनी परिसरात नवा पायंडा पाडला आहे.शंकर पाथोडे यांना वडिलोपार्जित चार एकर शेती आहे. या शेतीला जोडव्यवसाय म्हणून ते टेलरींगचा व्यवसाय करायचे. पण एवढे करुनही आर्थिक अडचण ही पाचविला पुजलेली. अशातच त्यांना कोणीतरी रेशीम (तुर्ती) उद्योग करण्याचा सल्ला दिला. या सल्ल्यानुसार त्यांनी तो व्यवसाय केला. पण अपयशच पदरी आले. आर्थिक दृष्टया अतिशय दयनीय अवस्था त्यांच्यावर आली. यातून मार्ग कसा काढायचा, या विवंचनेत ते असताना गावातीलच आनंदराव पाथोडे यांनी त्यांंना भाजीपाला लागवडीचा सल्ला दिला. हा सल्ला शिरसावंदय माणून त्यांनी वडिलोपार्जित शेतीत भाजीपाला पिकाची लागवड केली. वर्ष दोन वर्षात त्यांना बऱ्यापैकी पैसा दिसून लागला. शंकररावांचा उत्साह आणखीच वाढला. त्यांनी या व्यवसायात स्वत:ला पूर्ण वाहून घेतले. आता ते कोणतेही प्रशिक्षण न घेता अगदी आधुनिक पद्धतीने भाजीपाल्याची लागवड करीत आहेत. या मिळालेल्या उत्पन्नातून त्यांनी आणखी पाच एकर शेती खरेदी केली आहे.पाथोडे आता सात एकरात वर्षभर भाजीपाला पिकाची तर तीन एकरात धानाची लावगड करीत आहे. त्यांनी संपुर्ण कुटुंबाला याच व्यवसायात वाहून घेतले आहे. सकाळी ६ वाजता त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतावर हजर होते आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत शेतावर असतात. या व्यवसायात आपण कुठेही कमी पडू नये म्हणून पाथोडे यांनी शेतात आठ ठिकाणी बोअर तर दोन ठिकाणी विहिरी खोदल्या आहेत. या विहिर आणि बोअरच्या माध्यमातून ते वर्षभर कारले, चवळी, वांगी, टमाटर, भेंडी, कोबी, पानकोबी, मेथी, पालक, कोथिंबीर यांचे उत्पादन घेत असतात. या पिकातून वर्षाकाठी त्यांना १२ ते १३ लाखांचे उत्पन्न मिळत असून खर्च वजा जाता त्यांना आठ ते नऊ लाखांचा निव्वळ नफा उरत असतो. आज नागभीडमध्ये दररोज भाजीपाला येत असतो यातील निम्मा भाजीपाला डोंगरगाव येथीलच असतो. पुर्वी पाथोडे मोटार सायकलने भाजीपाल्याची वाहतूक करायचे गरज म्हणून त्यांनी आता टेंपो खरेदी केला असू त्याचा आणखी फायदा त्यांना होत आहे.