शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

जिवंतपणीच भोगाव्या लागतात नरकयातना!

By admin | Updated: September 26, 2015 00:48 IST

प्रस्तुत प्रतिनिधीने पालडोह, कामतगुडा गावात भेट देऊन लोकांशी संवाद साधला. त्यात अनेकांनी शासन प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला.

शासन-प्रशासनाचे दुर्लक्ष : पहाडावरील नागरिकांना पक्क्या रस्त्यांचे स्वप्न धूसरप्रस्तुत प्रतिनिधीने पालडोह, कामतगुडा गावात भेट देऊन लोकांशी संवाद साधला. त्यात अनेकांनी शासन प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. खराब रस्त्यामुळे गावात वाहने जात नाही. त्यामुळे अनेक रुग्णांचा बळी जात असल्याचे नागरिकांनी सांगितले. रस्ते हे प्रगतीचे पहिले पाऊल मानले जाते. मात्र जिवती तालुक्यातील रस्ते पाहिले की वास्तव्य लक्षात येते. माजटी, गणेरी, सोरेकासा, घोडणकप्पी, पालडोह, कामतगुडा (गौरी), अंतापूर, कलीगुडा, शंकरलोधी, धनकदेवी अशा अनेक रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. बांधकाम विभाग मात्र या तालुक्याकडे लक्ष द्यायलाच तयार नाही. देशाचा विकास करायचा असेल तर प्रथम खेड्याकडे चला. खेड्यांचा विकास झाला तर देशाचा विकास होईल, असे महात्मा गांधींनी सांगितले होते. मात्र शासकीय यंत्रणेलाच याचा विसर पडल्याचे दिसत आहे. वरील गावात कुठलेच वाहन जात नाही. गेले तरी मोठे कसरत करीत वाहन चालवावे लागते.वर्षभरापूर्वी आपण इतर गावात नाही; पण घोडणकप्पी गावात गेले होते. तेव्हा विदारक वास्तव्य आपणालाही पाहायला मिळाले. त्यानुसार संबंधित विभागांना पत्रव्यवहार करून सूचना दिल्या आहेत. मात्र अजून कुठल्याच हालचाली दिसत नाही. याबाबत आणखी पाठपुरावा केला जाईल. - अश्विनी गुरमे, सभापती, पंचायत समिती, जिवतीरस्त्याअभावी विकास खुंटलापहाडावरील अनेक गावात दळणवळण करण्यासाठी असलेले मुख्य रस्तेच खराब झाल्याने शासनाच्या महत्वाकांक्षी अनेक योजना गावात आल्या नाहीत. स्वातंत्र्यानंतरही या गावांना आहे त्याच स्थितीत जीवन जगावे लागत असल्याचे मत पालडोहचे बालाजी पवार, घोडणकप्पीचे रामू आत्राम तर कामतगुडा (गौरीचे) उत्तम राठोड, भाऊसाहेब राठोड यांनी ‘लोकमत’समोर व्यक्त केले.