शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक जिल्ह्यातील दलित गाव होणार ‘स्मार्ट’ !

By admin | Updated: September 14, 2015 00:49 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्यात समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राजकुमार चुनारकर खडसंगीभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्यात समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या ऐतिहासिक वर्षाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात स्मार्ट दलित गावांची निर्मिती करण्यात येणार आहे.केंद्र शासनाने शहराच्या विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ ही योजना राबविली. याच धर्तीवर राज्य शासन स्मार्ट ग्राम योजना राबविणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतींना सक्षम आणि स्मार्ट बनवून ग्राम विकासाच्या चळवळीला गतिमान करण्याचा प्रयत्न चालविला आहे. ग्रामविकास विभागामार्फत गावाच्या विकासासाठी सध्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या विविध योजनांचे एकत्रीकरण करून तसेच शासनाच्या विविध विभागाचा समन्वय साधून स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येत आहे. त्याचाच धागा पकडून आता राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यातील एका दलित गावाला स्मार्ट बनविणार आहे.१४ एप्रील २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष समता व सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून या निमित्त विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. यासह सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सर्वाधिक दलित लोकसंख्या असलेले एक गाव निवडून ते ‘स्मार्ट’ गाव म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या गावात वीज, पाणी, रस्ते या सारख्या पायाभूत सुविधा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व सेवामुळे अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेल्या दलित गावाचा कायापालट होऊन या गावात मूलभूत सुविधासह आधुनिक सुविधासुद्धा पुरविल्यामुळे या गावाचा सर्वांगिण विकास होऊन ते गाव जिल्ह्यात स्मार्ट बनणार आहे.