शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election : महापालिका, जिल्हा परिषदांच्या निवडणुका कधी होणार? समोर आली मोठी अपडेट
2
Iran Israel War : 'पुतिन आमची मदत करा...', इस्रायलने बॉम्ब टाकल्यावर खामेनींना रशियाची आठवण झाली, परराष्ट्रमंत्र्यांना दूत म्हणून पाठवले
3
पतीचा तिनदा जीव घेण्याचा केला प्रयत्न; चौथ्यांदा चिकन भात खायला देत कायमचा संपवला
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःच मारली अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर कुऱ्हाड, आता 'चावी' इराणकडे! 
5
अर्धशतकासह KL राहुलनं ८ वर्षांनी साधला हा डाव; शतकी दुष्काळ संपवण्याचीही संधी
6
Nag Panchami 2025: यंदा नागपंचमी कधी? कालसर्प दोष निवारणासाठी 'हा' दिवस राखीव ठेवाच!
7
युद्ध आणि मंदीचं सावट! दिग्गज IT शेअर्स कोसळले, पण 'या' सेक्टर्सने वाचवला बाजार; आज काय घडलं?
8
डबल लॉटरी...! आपने पंजाब पोटनिवडणूक जिंकली अन् राज्यसभेची एक जागा रिक्त झाली
9
स्वामींच्या मठात गेल्यावर तुम्हालाही ‘या’ २ गोष्टींचा अनुभव आला आहे का? उत्तर हो असेल तर...
10
रशियाने इराणला का मदत केली नाही? राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सांगितले कारण! म्हणाले...
11
Samudra Shastra: व्यक्तीच्या नाकाची ठेवण सांगते, तिला 'राजयोग' मिळणार की 'संसार भोग'!
12
१०६ मुलांचा बाप आहे 'हा' व्यवसायिक, प्रत्येकाला दिले ११०० कोटी; परंतु ठेवलीये एक अट
13
पृथ्वी शॉ मुंबई संघ सोडण्याच्या तयारीत! कारण...
14
युद्धाच्या मैदानात आता 'मच्छर' उतरवणार चीन?; असं तंत्रज्ञान ज्याचा अमेरिकेने विचारही केला नसेल
15
IND vs ENG: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेला 'अँडरसन- तेंडुलकर ट्रॉफी' नाव दिल्यानं गावस्कर भडकले, म्हणाले...
16
ना पाकिस्तान, ना अफगाणिस्तान, मग इराणपर्यंत कसे पोहोचले B-2 बॉम्बर? खुद्द अमेरिकेनेच केला खुलासा
17
हे काय चाललंय? गोविंदाने लहान मुलीच्या खांद्यावर ठेवलं डोकं; नेटकरी म्हणाले, 'विचित्र माणूस...'
18
तुमच्या आधार कार्डवरुन कोणी कर्ज घेतलंय का? लगेच तपासा; ही आहे प्रोसेस
19
निवृत्तीनंतरही जगा 'राजासारखं'! 'या' ५ सरकारी पेन्शन योजना तुम्हाला आयुष्यभर देतील पैसाच पैसा!
20
पाणलोट क्षेत्रात जोर'धार'; गंगापुर धरणाचा विसर्ग झाला दुप्पट, गोदावरीला पुरसदृश्य स्थिती

प्रत्येक जिल्ह्यातील दलित गाव होणार ‘स्मार्ट’ !

By admin | Updated: September 14, 2015 00:49 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्यात समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राजकुमार चुनारकर खडसंगीभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्यात समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या ऐतिहासिक वर्षाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात स्मार्ट दलित गावांची निर्मिती करण्यात येणार आहे.केंद्र शासनाने शहराच्या विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ ही योजना राबविली. याच धर्तीवर राज्य शासन स्मार्ट ग्राम योजना राबविणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतींना सक्षम आणि स्मार्ट बनवून ग्राम विकासाच्या चळवळीला गतिमान करण्याचा प्रयत्न चालविला आहे. ग्रामविकास विभागामार्फत गावाच्या विकासासाठी सध्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या विविध योजनांचे एकत्रीकरण करून तसेच शासनाच्या विविध विभागाचा समन्वय साधून स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येत आहे. त्याचाच धागा पकडून आता राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यातील एका दलित गावाला स्मार्ट बनविणार आहे.१४ एप्रील २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष समता व सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून या निमित्त विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. यासह सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सर्वाधिक दलित लोकसंख्या असलेले एक गाव निवडून ते ‘स्मार्ट’ गाव म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या गावात वीज, पाणी, रस्ते या सारख्या पायाभूत सुविधा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व सेवामुळे अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेल्या दलित गावाचा कायापालट होऊन या गावात मूलभूत सुविधासह आधुनिक सुविधासुद्धा पुरविल्यामुळे या गावाचा सर्वांगिण विकास होऊन ते गाव जिल्ह्यात स्मार्ट बनणार आहे.