शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

प्रत्येक जिल्ह्यातील दलित गाव होणार ‘स्मार्ट’ !

By admin | Updated: September 14, 2015 00:49 IST

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्यात समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

राजकुमार चुनारकर खडसंगीभारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंती वर्ष राज्यात समता व सामाजिक न्याय वर्ष म्हणून साजरे करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या ऐतिहासिक वर्षाचे औचित्य साधून केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात स्मार्ट दलित गावांची निर्मिती करण्यात येणार आहे.केंद्र शासनाने शहराच्या विकासासाठी ‘स्मार्ट सिटी’ ही योजना राबविली. याच धर्तीवर राज्य शासन स्मार्ट ग्राम योजना राबविणार आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायतींना सक्षम आणि स्मार्ट बनवून ग्राम विकासाच्या चळवळीला गतिमान करण्याचा प्रयत्न चालविला आहे. ग्रामविकास विभागामार्फत गावाच्या विकासासाठी सध्या विविध योजना राबविल्या जात आहेत. या विविध योजनांचे एकत्रीकरण करून तसेच शासनाच्या विविध विभागाचा समन्वय साधून स्मार्ट ग्राम योजना राबविण्यात येत आहे. त्याचाच धागा पकडून आता राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यातील एका दलित गावाला स्मार्ट बनविणार आहे.१४ एप्रील २०१५ ते १४ एप्रिल २०१६ हे वर्ष समता व सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे करण्यात येत असून या निमित्त विविध उपक्रमही राबविण्यात येणार आहेत. यासह सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सर्वाधिक दलित लोकसंख्या असलेले एक गाव निवडून ते ‘स्मार्ट’ गाव म्हणून विकसित करण्यात येणार आहे. या गावात वीज, पाणी, रस्ते या सारख्या पायाभूत सुविधा तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या सर्व सेवामुळे अनेक वर्षापासून विकासापासून वंचित राहिलेल्या दलित गावाचा कायापालट होऊन या गावात मूलभूत सुविधासह आधुनिक सुविधासुद्धा पुरविल्यामुळे या गावाचा सर्वांगिण विकास होऊन ते गाव जिल्ह्यात स्मार्ट बनणार आहे.