शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:30 IST

चंद्रपूर : शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका कटिबद्ध आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे ...

चंद्रपूर : शहरातील नागरिकांना शुद्ध व मुबलक पिण्याचे पाणी देण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिका कटिबद्ध आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला पिण्याचे पाणी मिळेल, असे प्रतिपादन महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी केले.

चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत केंद्र शासन पुरस्कृत अटल मिशन फॉर रिज्युव्हेनेशन ॲण्ड अर्बन ट्रान्स्फॉरमेशन (अमृत) पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. बाबूपेठ येथील या योजनेचे काम पूर्ण झाले असून, लोकार्पण सोहळा शनिवार, ता. २५ सप्टेंबर रोजी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या हस्ते पार पडला.

लोकार्पण सोहळ्याला उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी यांची प्रमुख उपस्थिती होती. जुनोना मार्गावरील हिंग्लाज भवानी मंदिराशेजारी अमृत योजनेच्या झोन ७ अंतर्गत पिण्याच्या पाण्याची टाकी उभारण्यात आली आहे. येथील कामे पूर्ण झाली असून, नागरिकांच्या घरापर्यंत पाणीपुरवठा सुरू होणार आहे. गुरुवारी सकाळी महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी या भागात नळांची पाहणी केली. त्यात पाणीपुरवठा सुरळीत होत असल्याचे आढळून आले. आज पार पडलेल्या लोकार्पण सोहळ्याला नगरसेवक अनिल रामटेके, नगरसेविका नीलम आक्केवार, नगरसेविका ज्योती गेडाम, नगरसेविका कल्पना बगुलकर, नगरसेवक श्याम कणकम, नगरसेवक प्रदीप किरमे, नगरसेवक संजय कंचर्लावार, शहर अभियंता महेश बारई, उपअभियंता विजय बोरीकर, जलप्रदाय विभागाचे शाखा अभियंता संजय जोगी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे आनंद भालादरे, अमित फुलझेले, श्याम सिडाम यांची उपस्थिती होती.