शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अखेर कामगारांच्या पगाराचे अनुदान मिळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:53 IST

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या थकित वेतनासाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २३ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू होते. जोपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खात्यावर शासनाकडून वेतन अनुदान जमा होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतेली होती.

ठळक मुद्देकाम बंद आंदोलन मागे : ८० लाख रुपये अनुदान जमा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील कंत्राटी कामगारांच्या थकित वेतनासाठी प्रहार संघटनेच्या नेतृत्वात २३ आॅगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू होते. जोपर्यंत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या खात्यावर शासनाकडून वेतन अनुदान जमा होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतेली होती. याची दखल घेत शनिवारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बीडीएस प्रणालीवर वेतन अनुदानापोटी ८० लाख रुपये जमा करण्यात आले.वेतन अनुदान जमा झाल्यानंतर जिल्हाधिकारी खेमनार यांनी याबाबत सोमवारी अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्रे यांच्या कक्षात बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये उपनिवासी जिल्हाधिकारी वैभव नावडीकर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डी. एस. मोरे, कामगार अधिकारी यु. एस. लोया, वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी राठोड, प्रहार संघटनेचे पप्पू देशमुख, सतीश खोब्रागडे, घनशाम येरगुडे, दिनेश कंपू, धर्मेंद्र शेंडे, कांचन चिंचेकर, सतीश येसांबरे, तारा ठमके, ज्योती कांबळे, शेवंता भालेराव, रजिया पठाण, मनीषा डफ, सतीश घोडमारे, अमोल घोडमारे, राकेश मस्कावार, विशाल डोर्लीकर, करण कडस्कर, अमिता वानखेडे, रवी काळे, निशा साव, भाग्यश्री मुधोळकर, गिरीधर खंडाळकर तसेच कंत्राटदार बंडीवार व संतोष कुचलकर उपस्थित होते.बैठकीमध्ये कामगारांचे थकित वेतन तीन ते चार दिवसांमध्ये त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात यावे, असे आदेश अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्री यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता मोरे यांना दिले. तसेच कामगारांच्या इतर मागण्यांवरसुद्धा तातडीने अंमलबजावणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. पुढील सात दिवसांमध्ये पुन्हा सर्व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्याचे आश्वासन अतिरिक्त जिल्हाधिकारी कलंत्रे यांनी कामगारांच्या शिष्टमंडळाला दिले. यानंतर प्रहारचे देशमुख मंगळवारी कामगारांशी चर्चा करून काम बंद आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सर्व कामगार पूर्वरत कामावर रुजू झाले.