शहरं
Join us  
Trending Stories
1
आता दोघांनीही थांबावे; डोनाल्ड ट्रम्प यांची भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा मध्यस्थीची ऑफर
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
भारताच्या एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानमध्ये कितीजण मृत्युमुखी पडले? आकडा आला समोर  
4
बहावलपूरवरील हल्ला पाकिस्तानी सैन्याच्या लागलाय जिव्हारी, कापलं गेलंय नाक, कारण काय?
5
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
6
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
7
‘ऑपरेशन सिंदूर’ला नागपुरातील ‘नागास्त्र-१’चे बळ ? टेहळणीसोबतच लक्ष्याचा भेद करण्याची क्षमता
8
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
9
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
10
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
11
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
12
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
13
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
14
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
15
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
16
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
17
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
18
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
19
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
20
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."

अखेर सायन्स पार्क, आझाद बगिचा मार्गी

By admin | Updated: July 16, 2016 01:04 IST

गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सदस्यांच्या आक्षेपामुळे रखडलेल्या रामाळा तलाव बगिचातील सायन्स पार्कची ....

स्थायी समिती : सत्ताधारी सदस्यांचा बगिचा विकासावर आक्षेप चंद्रपूर : गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सदस्यांच्या आक्षेपामुळे रखडलेल्या रामाळा तलाव बगिचातील सायन्स पार्कची निविदा स्थायी समितीने शुक्रवारी मंजूर केली. तसेच आझाद बगिचाचे विद्युतीकरण व विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला. मात्र, सत्ताधारी सदस्यांनी शहरात अनेक समस्या कायम असताना आझाद बगिचाचा विकास कशाला करता, असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी रमाई घरकूल योजनेचा निधी खर्च होत नसल्याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वीच रामाळा तलाव येथील बगिचामध्ये सायन्स पार्क उभारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशाकीय मंजुरी दिली आहे. सायन्स पार्कच्या उभारणीकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये सर्वात कमी ४.८१ टक्के एवढ्या कमी दराची निविदा मे. एस. व्ही. एम. कंस्ट्रक्शनने भरली होती. मनपाच्या स्थायीे समितीच्या सभेत हा विषय शुक्रवारी चर्चेला आला. रामाळा तलावाची देखभाल जिल्हाधिकाऱ्यामार्फत सिंचन विभाग करतो. आता या तलावात सायन्स पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ९३.६८ लाख रुपये किंमतीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सायन्स पार्क उभारणीकरिता ९३ लाख ६८ हजार ३५३ रुपये खर्च अपेक्षित आहे. चंद्रपूर येथील मे. एसव्हीएम कंस्ट्रक्शनने ८९ लाख ०८ हजार ७५ रुपयांचा आराखडा मांडला आहे. ही निविदा सर्वात कमी किंमतीची असल्याने एस. व्ही. एम. कन्स्ट्रक्शनला सायन्स पार्क उभारणीचे काम देण्यावर स्थायी समितीच्या सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थायी समितीच्या सभेत दुसरा महत्त्वाचा विषय शहरातील आझाद बगिचाच्या विद्युतीकरण व विकासाचा होता. त्याकरिता ५ कोटी ४२ लाख २५ हजार ९०१ रुपये खर्च अपेक्षित आहे. आझाद बगिचासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत नागपूर येथील मे. खळतकर कंस्ट्रक्शनने ८.६१ टक्के कमी दराने, चंद्रपूरच्या मे. विजय आर. घाटे इंजिनिअर कन्स्ट्रक्शनने ९.१० टक्के कमी दराने तर त्या दोघांपेक्षा अधिक किंमतीची नागपूर येथील मे. प्रशांत कंस्ट्रक्शनने निविदा दाखल केली होती. त्यातील सर्वात कमी दराची असलेली निविदा स्थायी समितीने मंजूर केली. एकीकडे मनपा आझाद बगिचाचा विकास करू इच्छिते. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबवून कामदेखील सोपविण्यात आले आहे. त्याच वेळी भाजपचे सदस्य धनंजय हूड व राहुल पावडे यांनी बगिचाच्या विकास कामावर नाराजी व्यक्त केली. शहरात अनेक समस्या कायम आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे चैनीचा बगिचा हवाच कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सभेला स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय इंगोले, लेखाधिकारी गायकवाड आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)