शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

अखेर सायन्स पार्क, आझाद बगिचा मार्गी

By admin | Updated: July 16, 2016 01:04 IST

गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सदस्यांच्या आक्षेपामुळे रखडलेल्या रामाळा तलाव बगिचातील सायन्स पार्कची ....

स्थायी समिती : सत्ताधारी सदस्यांचा बगिचा विकासावर आक्षेप चंद्रपूर : गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सदस्यांच्या आक्षेपामुळे रखडलेल्या रामाळा तलाव बगिचातील सायन्स पार्कची निविदा स्थायी समितीने शुक्रवारी मंजूर केली. तसेच आझाद बगिचाचे विद्युतीकरण व विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला. मात्र, सत्ताधारी सदस्यांनी शहरात अनेक समस्या कायम असताना आझाद बगिचाचा विकास कशाला करता, असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी रमाई घरकूल योजनेचा निधी खर्च होत नसल्याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वीच रामाळा तलाव येथील बगिचामध्ये सायन्स पार्क उभारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशाकीय मंजुरी दिली आहे. सायन्स पार्कच्या उभारणीकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये सर्वात कमी ४.८१ टक्के एवढ्या कमी दराची निविदा मे. एस. व्ही. एम. कंस्ट्रक्शनने भरली होती. मनपाच्या स्थायीे समितीच्या सभेत हा विषय शुक्रवारी चर्चेला आला. रामाळा तलावाची देखभाल जिल्हाधिकाऱ्यामार्फत सिंचन विभाग करतो. आता या तलावात सायन्स पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ९३.६८ लाख रुपये किंमतीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सायन्स पार्क उभारणीकरिता ९३ लाख ६८ हजार ३५३ रुपये खर्च अपेक्षित आहे. चंद्रपूर येथील मे. एसव्हीएम कंस्ट्रक्शनने ८९ लाख ०८ हजार ७५ रुपयांचा आराखडा मांडला आहे. ही निविदा सर्वात कमी किंमतीची असल्याने एस. व्ही. एम. कन्स्ट्रक्शनला सायन्स पार्क उभारणीचे काम देण्यावर स्थायी समितीच्या सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थायी समितीच्या सभेत दुसरा महत्त्वाचा विषय शहरातील आझाद बगिचाच्या विद्युतीकरण व विकासाचा होता. त्याकरिता ५ कोटी ४२ लाख २५ हजार ९०१ रुपये खर्च अपेक्षित आहे. आझाद बगिचासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत नागपूर येथील मे. खळतकर कंस्ट्रक्शनने ८.६१ टक्के कमी दराने, चंद्रपूरच्या मे. विजय आर. घाटे इंजिनिअर कन्स्ट्रक्शनने ९.१० टक्के कमी दराने तर त्या दोघांपेक्षा अधिक किंमतीची नागपूर येथील मे. प्रशांत कंस्ट्रक्शनने निविदा दाखल केली होती. त्यातील सर्वात कमी दराची असलेली निविदा स्थायी समितीने मंजूर केली. एकीकडे मनपा आझाद बगिचाचा विकास करू इच्छिते. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबवून कामदेखील सोपविण्यात आले आहे. त्याच वेळी भाजपचे सदस्य धनंजय हूड व राहुल पावडे यांनी बगिचाच्या विकास कामावर नाराजी व्यक्त केली. शहरात अनेक समस्या कायम आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे चैनीचा बगिचा हवाच कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सभेला स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय इंगोले, लेखाधिकारी गायकवाड आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)