शहरं
Join us  
Trending Stories
1
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
2
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
3
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
4
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
5
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
6
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
7
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
8
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
9
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
10
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
11
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
12
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
13
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
14
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
15
घरात दोन बायका असतानाही तिसरीशी लग्न; चौथी आणायच्या तयारीत होता नवरदेव, पण चांगलाच फसला!
16
IND vs SA 1st Test Day 2 Stumps : जड्डूसह कुलदीप-अक्षरचा जलवा! तिसरा दिवस ठरणार निकालाचा?
17
मासिक पाळी येण्यापूर्वी चिडचिड, रडू येतं, मूड जातो, त्याची ५ कारणं- शरीरातले बदल ओळखा पटकन
18
“काँग्रेस-मनसे एकमेकांचा दर्जा ठरवायला लागले तर आपण लांबून हसलेले बरे”; भाजपा नेत्यांचा टोला
19
सोम प्रदोष २०२५: सोम प्रदोषाने आठवड्याची सुरुवात होणार; 'या' ८ राशींना शिवकृपेचे संकेत मिळणार
20
थरारक! विवाहित प्रेयसीची हत्या, मृतदेहाचे तुकडे केले; शीर अन् अवयव बसच्या चाकाखाली चिरडले, मग..
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सायन्स पार्क, आझाद बगिचा मार्गी

By admin | Updated: July 16, 2016 01:04 IST

गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सदस्यांच्या आक्षेपामुळे रखडलेल्या रामाळा तलाव बगिचातील सायन्स पार्कची ....

स्थायी समिती : सत्ताधारी सदस्यांचा बगिचा विकासावर आक्षेप चंद्रपूर : गेल्या काही महिन्यांपासून सत्ताधारी सदस्यांच्या आक्षेपामुळे रखडलेल्या रामाळा तलाव बगिचातील सायन्स पार्कची निविदा स्थायी समितीने शुक्रवारी मंजूर केली. तसेच आझाद बगिचाचे विद्युतीकरण व विकास करण्याचाही निर्णय घेण्यात आला. मात्र, सत्ताधारी सदस्यांनी शहरात अनेक समस्या कायम असताना आझाद बगिचाचा विकास कशाला करता, असा आक्रमक पवित्रा घेतला. यावेळी रमाई घरकूल योजनेचा निधी खर्च होत नसल्याबाबत सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वीच रामाळा तलाव येथील बगिचामध्ये सायन्स पार्क उभारण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशाकीय मंजुरी दिली आहे. सायन्स पार्कच्या उभारणीकरिता निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये सर्वात कमी ४.८१ टक्के एवढ्या कमी दराची निविदा मे. एस. व्ही. एम. कंस्ट्रक्शनने भरली होती. मनपाच्या स्थायीे समितीच्या सभेत हा विषय शुक्रवारी चर्चेला आला. रामाळा तलावाची देखभाल जिल्हाधिकाऱ्यामार्फत सिंचन विभाग करतो. आता या तलावात सायन्स पार्क उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याअनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी ९३.६८ लाख रुपये किंमतीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. सायन्स पार्क उभारणीकरिता ९३ लाख ६८ हजार ३५३ रुपये खर्च अपेक्षित आहे. चंद्रपूर येथील मे. एसव्हीएम कंस्ट्रक्शनने ८९ लाख ०८ हजार ७५ रुपयांचा आराखडा मांडला आहे. ही निविदा सर्वात कमी किंमतीची असल्याने एस. व्ही. एम. कन्स्ट्रक्शनला सायन्स पार्क उभारणीचे काम देण्यावर स्थायी समितीच्या सभेत शिक्कामोर्तब करण्यात आले. स्थायी समितीच्या सभेत दुसरा महत्त्वाचा विषय शहरातील आझाद बगिचाच्या विद्युतीकरण व विकासाचा होता. त्याकरिता ५ कोटी ४२ लाख २५ हजार ९०१ रुपये खर्च अपेक्षित आहे. आझाद बगिचासाठी राबविलेल्या निविदा प्रक्रियेत नागपूर येथील मे. खळतकर कंस्ट्रक्शनने ८.६१ टक्के कमी दराने, चंद्रपूरच्या मे. विजय आर. घाटे इंजिनिअर कन्स्ट्रक्शनने ९.१० टक्के कमी दराने तर त्या दोघांपेक्षा अधिक किंमतीची नागपूर येथील मे. प्रशांत कंस्ट्रक्शनने निविदा दाखल केली होती. त्यातील सर्वात कमी दराची असलेली निविदा स्थायी समितीने मंजूर केली. एकीकडे मनपा आझाद बगिचाचा विकास करू इच्छिते. त्याकरिता निविदा प्रक्रिया राबवून कामदेखील सोपविण्यात आले आहे. त्याच वेळी भाजपचे सदस्य धनंजय हूड व राहुल पावडे यांनी बगिचाच्या विकास कामावर नाराजी व्यक्त केली. शहरात अनेक समस्या कायम आहेत. त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे चैनीचा बगिचा हवाच कशाला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सभेला स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, मनपा आयुक्त संजय काकडे, उपायुक्त विजय इंगोले, लेखाधिकारी गायकवाड आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)