शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

हवा आली तरी गावात होतो अंधार

By admin | Updated: May 5, 2017 00:52 IST

सध्या एकविसावे शतक आहे. विज्ञानानेही बरीच प्रगती केली आहे. लोकांचे जीवनमान सुकर व्हावे म्हणून वैज्ञानिकांनीही मागील

घोडपेठ : सध्या एकविसावे शतक आहे. विज्ञानानेही बरीच प्रगती केली आहे. लोकांचे जीवनमान सुकर व्हावे म्हणून वैज्ञानिकांनीही मागील शतकातच विजेचा शोध लावला होता. मात्र महावितरणच्या कारभारामुळे हा शोध लागूनही लोकांच्या अडचणी दूर झालेल्या नाही. साधी हवा आली तरीही घोडपेठ व परिसरातील वीज जात असून लोकांना रात्रीही विजेशिवायच जगावे लागत आहे. मे महिन्याला नुकतीच सुरूवात झालेली आहे. उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. प्रचंड तापमानामुळे दिवसा लोकांनी घराबाहेर पडणेही बंद केले आहे. त्यातच उकाड्यामुळे हैराण झालेल्या लोकांना महावितरणने आपली किमया दाखविणे सुरू केले आहे. मागील दोन तिन दिवसांत वातावरणात कमालीचा फरक पडला आहे. त्यामुळे वारा जरी आला तरी वीज जाण्याचा प्रकार सध्या घोडपेठ व परिसरात सुरू आहे. आताच ही परिस्थिती आहे तर पावसाळ्यात काय होणार या विचारांनी अनेकांच्या मेंदुला झिणझिण्या येत आहेत. या प्रकारामुळे सामान्य नागरिकांसोबतच उन्हाळ्यात सर्वाधिक विक्री होणारी शितपेयांची दुकाने, झेरॉक्स, आटाचक्की व इतरही व्यवसायांवर मंदी आल्याचे जाणवत आहे. विजेच्या अभावामुळे ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याच्या वेळेत तफावत होवून महिलांनासुध्दा त्रास सहन करावा लागत आहे.