शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

भूसंपादन प्रक्रिया होण्यापूर्वीच सातबारावर फेरफार

By admin | Updated: July 13, 2017 00:44 IST

वेकोलिने २५ वर्षांपूर्वी एसीसी कारखान्याच्या वसाहतीकरिता उसगाव क्षेत्रातील १९ शेतकऱ्यांच्या ३८ हे. आर. शेतजमीनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू केली.

महसुल विभागाचा प्रताप : वेकोलिची प्रक्रिया २५ वर्षांपासून प्रलंबितलोकमत न्यूज नेटवर्कघुग्घुस : वेकोलिने २५ वर्षांपूर्वी एसीसी कारखान्याच्या वसाहतीकरिता उसगाव क्षेत्रातील १९ शेतकऱ्यांच्या ३८ हे. आर. शेतजमीनीची भूसंपादन प्रक्रिया सुरू केली. ती भूसंपादन प्रक्रिया १९९२ नंतर प्रलंबित होती. मात्र पाच महिन्यापूर्वी शेतकऱ्यांना कोणतीही सुचना न देता महसूल विभागाने एसीसी कंपनीच्या नावाने सातबारा केला. दोन महिन्यांपूर्वी शेतकरी सातबारा करिता तलाठी कार्यालयात गेले, तेव्हा हा घोळ लक्षात आला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून या प्रकाराबाबत एसीसी कंपनीही अनभिज्ञ असल्याचे समोर आले आहे.वेकोलिच्या घुग्घुस खुल्या कोळसा खाणीच्या विस्तारीकरणाकरिता व एसीसी कारखान्याच्या कामगार वसाहतीचे पुनर्वसनासाठी कारखान्याला लागून असलेल्या उसगाव शेत शिवारातील १९ शेतकऱ्यांपैकी एकूण ३८ हेक्टर ६५ आर शेतजमीन भूसंपादनाची प्रक्रिया १९९२ मध्ये प्रक्रिया सुरू केली. टीआरएलकडून मोजमाप झाले. दरम्यान सदर जमीन क्वार्टर बांधकाम करिता योग्य नाही, असा निकर्ष निघाल्याने एसीसीने जमिन नाकारली. तेव्हापासून भूसंपादन प्रक्रिया प्रलंबित होती.शासनाने तीन वर्षापूर्वी प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये या प्रकरणाचा अंतर्भाव होता. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात प्रलंबित केसेस असल्याने विविध तालुक्यातील एसडीओकडे प्रकरण वर्ग केले होते. त्यात हे प्रलंबित प्रकरण चिमूर एसडीओकडे गेले आणि शासनाने दिलेल्या अवधीच्या आत प्रलंबित केसेस निकाली काढण्याच्या घाईत एसडीओंनी एसीसीच्या नावाने सातबारा करण्याचे आदेश तलाठी यांना दिले. मात्र भूसंपादन प्रक्रिया वेकोलिकडून १९९२ मध्ये सुरू झाली. शेतजमिनीचे मोजमाप झाल्यानंतर प्रक्रिया थांबली होती. मात्र सातबारा कंपनीच्या नावे करण्यात आला. पालकमंत्र्यांनी घेतली दखलया गंभीर प्रकरणाकडे जि.प.चे समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे यांनी महसूल विभागाकडून झालेल्या प्रकाराबाबत पालकमंत्री मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर व आ. शामकुळे यांचे लक्ष वेधले. त्यांनी पाठपुरावा करून शेतकऱ्यांच्या नावाने सातबारा मिळावा अशी मागणी केली. त्यामुळे सातबारावरील एसीसीचे नाव काढून ‘त्या’ १९ शेतकऱ्यांच्या नावाने सातबारा पुर्ववत झाला आहे.