शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा वाटेवरच्या दगडा तुला फुटली रे वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:23 IST

घरातच रहाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माहेर दूर असलेल्या नवविहितांना माहेरी जाता आले नाही. आता आषाढ महिन्यामुळे यावर्षी तरी ...

घरातच रहाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे माहेर दूर असलेल्या नवविहितांना माहेरी जाता आले नाही. आता आषाढ महिन्यामुळे यावर्षी तरी आपल्याला माहेरी जाता येईल, अशी अाशा नवविवाहिताना असून, त्यांना माहेरची ओढ लागली आहे.

कोरोना संकटामुळे प्रत्येकांवर निर्बंध आले आहे. विशेषत: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे प्रत्येकांना घरात राहिल्याशिवाय पर्याय नव्हता. आता कोरोना संकट काही प्रमाणात कमी झाले असून, रुग्णसंख्या घटली आहे. त्यामुळे निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. कोरोनामुळे लादलेल्या निर्बंधामध्ये दूरवर असलेल्या नवविवाहिताही अडकल्या. त्यांना माहेरी येताच आले नाही. त्यामुळे त्या माहेरी येण्यासाठी आसुसल्या आहेत. आता आषाढ महिना सुरू झाला असून, नवविवाहिताना माहेरी जाण्याचे स्वप्न रंगवित आहे. बाॅक्स

नवविवाहिता म्हणतात.....

कोरोना संकटामुळे सर्वत्र दहशत आहे. आता रुग्णसंख्या कमी झाली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रवास करून माहेरी जाणे धोक्याचे वाटत आहे. एकदाचे कोरोना संकट गेल्यानंतरच माहेरी जाण्याचा विचार करीत आहे.

-मंगला रामटेके, चंद्रपूर.

---

माझे माहेर लांब आहे. सध्या रेल्वेसुद्धा व्यवस्थित सुरू झाल्या नाही. त्यामुळे माहेरी जाण्यास अडचण आहे. प्रत्येकींनाच माहेरी जाण्याची आवड असते; मात्र सध्याची परिस्थिती वेगळी आहे. माहेरच्यांना फोनद्वारे बोलणे होते. आता नाही, पण काही दिवसांना माहेरी जाण्याचा प्लॅन केला आहे.

रूपा कोडापे

----

कोट

मुलीला भेटण्याची ओढ तर राहणारच ना!

प्रत्येक आईला मुलीला भेटण्याची ओढ राहते. मुलगी सासरी गेली की ती कशी राहणार, याबाबत चिंताही असते. लहानपणापासून सांभाळ केल्यानंतर ती सासरी गेल्यानंतर माहेरी कधी येते, याची प्रत्येक आई वाट बघतात. आता कोरोना संकटामुळे माहेरी येण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

वैशाली कुलकर्णी

कोट

प्रवास करणे सध्या धोकादायकच

मुलगी सासरी गेल्यानंतर मुलीला भेटण्याची तळमळ प्रत्येक आईलाच असते. आषाढ महिन्यात नवविवाहिता माहेरी येतात; मात्र आता ही पद्धत काहीशी कमी झाली आहे. मोबाइल आणि प्रवासी साधने वाढली आहेत, त्यामुळे पूर्वीसारखी आतुरता नाही; मात्र प्रत्येक आईला मुलाला भेटावे असेच वाटते. कोरोना संकटामुळे अनेक अडचणी येत आहे.

-शुभांगी मालेकर, चंद्रपूर.