शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

मंत्र्यांच्या आदेशानंतरही जमीन मोजणीचे काम थंडबस्त्यात

By admin | Updated: January 11, 2015 22:48 IST

आंध्र-महाराष्ट्र सिमेवरील १४ गावांचे भूमापन व मोजणी करण्याच्या सूचना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ३१ जानेवारी २०१४ ला जिवती तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान केली होती.

जिवती : आंध्र-महाराष्ट्र सिमेवरील १४ गावांचे भूमापन व मोजणी करण्याच्या सूचना माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी ३१ जानेवारी २०१४ ला जिवती तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान केली होती. मात्र, प्रस्तावास मंजूरी न मिळाल्याने एक वर्षापासून जमीन मोजणीचे काम थंडबस्त्यात आहे.१४ गावातील जमिनीची विशेष बाब म्हणून मोजणी करण्यासाठी अंदाजीत ८० लाख रुपयाचा खर्च अपेक्षीत असल्याने शासनाच्या मंजुरीचा प्रस्ताव उपसंचालक भूमिअभिलेख सलग्न जमाबंदी आयुक्त (भूमापण पुणे) यांच्याकडून अप्पर मुख्य सचिव (महसूल) यांचेकडे ३ फेब्रुवारी रोजी पाठविण्यात आला. परंतु, सदर प्रस्तावास अद्यापही मंजुरी नसल्यामुळे सिमेवरील शेतकऱ्यांचे प्रश्न अजून किती दिवस रेंगाळत राहणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.महाराष्ट्र शासनाने १४ फेब्रुवारी १९९६ ला मुकादमगुडा, परमडोली, तांडा, कोठा (बु.), लेंडीजाळा, महाराजगुडा, शंकरलोधी, पद्मावती, अंतापूर, इंदिरानगर, येसापूर, पळसगुडा, भोलापठार लेंडीगुडा या गावातील शेतकऱ्यांना माजी पालकमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठामंत्री शोभाताई फडणवीस यांच्या हस्ते सातबारा प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. मात्र या सातबारामध्ये भोगवटदार रकान्यात सरकार अशी नोंद आहे. नमुना बारामध्ये जमीन कसणाऱ्याचे नाव आहे. त्यामुळे ती सरकारची जमीन समजली जाते. त्यामुळे सातबरा असूनही शेतीसंबंधी राबविल्या जाणाऱ्या शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही. एवढेच नाही तर शासनाकडून मिळणारी दुष्काळग्रस्त निधीही मिळत नाही.१९५६ मधील राज्य पूर्नरचनेनंतर पूर्वीच्या हैद्राबाद राज्यामधील आदिलाबाद जिल्ह्यातील राजुरा तालुका तत्कालीन मुंबई राज्यामधील नांदेड जिल्ह्यात हस्तांतरीत करण्यात आला आहे. त्यानंतर तो महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात समाविष्ट करण्यात आला. राजुरा तालुका व आसिफाबाद तालुक्याच्या जंगलातील सिमेलगत परमडोली, मुकादमगुडा, कोंढा बु., तांडा, लेंडीजाळा, शंकरलोधी, अंतापूर, येसापूर, भोलापठार, पळसगुडा, महाराजगुडा, पद्मावती, इंदिरानगर, लेंडीगुडा ही १४ गावे असून जिवती तालुक्याच्या निर्मितीनंतर ती अंतर्भूत करण्यात आली आहेत. या १४ गावामध्ये भूमिअभिलेख कार्यालयाकडून कोणतीही मोजणी झालेली नसून पूर्नमोजणीचेही काम करण्यात आलेले नाही. गावातील १९९६ पूर्वीचा रेकार्ड उपलब्ध नसल्याने जमीन वाटपाबाबत अडचण निर्माण झाल्याचे सांगण्यात येते. प्रशासनाने जमिनीची मोजणी करुन शेतकऱ्यांना पट्टे देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते रामदास रणविर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)