शहरं
Join us  
Trending Stories
1
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
2
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
3
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
4
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
5
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
6
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
7
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
8
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
9
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
10
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
11
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
12
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
13
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
14
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
15
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
16
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
17
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
18
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
19
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
20
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष

स्वातंत्र्यानंतरही राजुरा तालुका होता पारतंत्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST

बी.यू.बोर्डेवार राजुरा : राजुरा तालुक्यातील हैद्राबाद मुक्तीसंग्राम आजही अंगावर शहारे आणणारा आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला. ...

बी.यू.बोर्डेवार

राजुरा : राजुरा तालुक्यातील हैद्राबाद मुक्तीसंग्राम आजही अंगावर शहारे आणणारा आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला. तेव्हा राजुरा पारतंत्र्यात होता. तब्बल एक वर्षानंतर १७ सप्टेंबर १९४८ ला निजामाच्या राजवटीमधून स्वतंत्र झाला.

राजुरा हे ब्रिटिश राजवटीच्या टोकावरील शेवटचे गाव होते. राजुराची तेव्हाची लोकसंख्या पाच हजार होती. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैद्राबाद येथील राजकारणाचा आतंक सुरू झाला. निजाम राजवटीच्या १७ जिल्ह्यामध्ये बहुसंख्य लोक हिंदू होते. यात कर्नाटकचे तीन जिल्हे, तेलंगणाचे नऊ जिल्हे आणि महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश होता. निजामाच्या राजवटीविरुद्ध आवाज उठविला आणि हैद्राबाद येथील काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली निजाम विरुद्ध आंदोलन सुरू केले. राजुरा तालुका देखील आंदोलनात सहभागी झाला होता. सतत १३ महिने केलेल्या तीव्र आंदोलनानंतर भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय सेना पाठवून निजामाविरुद्ध कारवाई सुरू केली. भारतीय सेना हैद्राबाद राज्यात येत असल्याची कुणकुण लागताच नवाब उस्मान अली यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली. याच दरम्यान भारतीय सेना सेना प्रमुख जी.एन.चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राजुरामध्ये दाखल झाल्या. चार दिवस केलेल्या तीव्र संघर्षानंतर १७ सप्टेंबरला हैद्राबाद सैन्य प्रमुख कासीम रजवी यांनी हार पत्करली आणि हैद्राबाद राज्य भारतात विलीन झाले आणि राजुरा तालुका निजाम राजवटीच्या तावडीतून मुक्त झाला.

बॉक्स

शासकीय सुटी मंजूर करून घेतली

निजाम राजवटीतून मुक्त झाल्यानंतर राजुराचे माजी आमदार वामनराव चटप यांनी राज्य सरकारसोबत पाठपुरावा करून तालुक्यात मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी सरकारी सुटी मंजूर करून घेतली. राजुरा, कोरपना आणि जिवती तालुक्यात मुक्ती संग्राम दिवस उत्साहात साजरा केला जातो.

बॉक्स

...तर राजुरा आज पाकिस्तानात असते

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण होते. मात्र सहाशेहून अधिक संस्थानांना त्यांच्या मर्जीनुसार भारत किंवा पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्याची मुभा ब्रिटिशांनी दिली. त्यामुळे काश्मीरसोबत पाकिस्तानात राहण्याचा निर्णय निजाम राजवटीने घेतला. परंतु तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या डावपेचामुळे भारत मजबूत राष्ट्र होऊ शकले. निजामाचे नवाब मीर उस्मान अली यांनी पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्याची संकेत दिले होते. कदाचित तसे झाले असते तर राजुरा तालुका पाकिस्तानच्या सीमेवर असता.

160921\img_20210916_080305.jpg

फोटो