शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

स्वातंत्र्यानंतरही राजुरा तालुका होता पारतंत्र्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:33 IST

बी.यू.बोर्डेवार राजुरा : राजुरा तालुक्यातील हैद्राबाद मुक्तीसंग्राम आजही अंगावर शहारे आणणारा आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला. ...

बी.यू.बोर्डेवार

राजुरा : राजुरा तालुक्यातील हैद्राबाद मुक्तीसंग्राम आजही अंगावर शहारे आणणारा आहे. भारत १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र झाला. तेव्हा राजुरा पारतंत्र्यात होता. तब्बल एक वर्षानंतर १७ सप्टेंबर १९४८ ला निजामाच्या राजवटीमधून स्वतंत्र झाला.

राजुरा हे ब्रिटिश राजवटीच्या टोकावरील शेवटचे गाव होते. राजुराची तेव्हाची लोकसंख्या पाच हजार होती. १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर हैद्राबाद येथील राजकारणाचा आतंक सुरू झाला. निजाम राजवटीच्या १७ जिल्ह्यामध्ये बहुसंख्य लोक हिंदू होते. यात कर्नाटकचे तीन जिल्हे, तेलंगणाचे नऊ जिल्हे आणि महाराष्ट्र राज्यातील पाच जिल्ह्यांचा समावेश होता. निजामाच्या राजवटीविरुद्ध आवाज उठविला आणि हैद्राबाद येथील काँग्रेसचे अध्यक्ष स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली निजाम विरुद्ध आंदोलन सुरू केले. राजुरा तालुका देखील आंदोलनात सहभागी झाला होता. सतत १३ महिने केलेल्या तीव्र आंदोलनानंतर भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतीय सेना पाठवून निजामाविरुद्ध कारवाई सुरू केली. भारतीय सेना हैद्राबाद राज्यात येत असल्याची कुणकुण लागताच नवाब उस्मान अली यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकडे धाव घेतली. याच दरम्यान भारतीय सेना सेना प्रमुख जी.एन.चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राजुरामध्ये दाखल झाल्या. चार दिवस केलेल्या तीव्र संघर्षानंतर १७ सप्टेंबरला हैद्राबाद सैन्य प्रमुख कासीम रजवी यांनी हार पत्करली आणि हैद्राबाद राज्य भारतात विलीन झाले आणि राजुरा तालुका निजाम राजवटीच्या तावडीतून मुक्त झाला.

बॉक्स

शासकीय सुटी मंजूर करून घेतली

निजाम राजवटीतून मुक्त झाल्यानंतर राजुराचे माजी आमदार वामनराव चटप यांनी राज्य सरकारसोबत पाठपुरावा करून तालुक्यात मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी सरकारी सुटी मंजूर करून घेतली. राजुरा, कोरपना आणि जिवती तालुक्यात मुक्ती संग्राम दिवस उत्साहात साजरा केला जातो.

बॉक्स

...तर राजुरा आज पाकिस्तानात असते

१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. संपूर्ण देशात उत्साहाचे वातावरण होते. मात्र सहाशेहून अधिक संस्थानांना त्यांच्या मर्जीनुसार भारत किंवा पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्याची मुभा ब्रिटिशांनी दिली. त्यामुळे काश्मीरसोबत पाकिस्तानात राहण्याचा निर्णय निजाम राजवटीने घेतला. परंतु तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या डावपेचामुळे भारत मजबूत राष्ट्र होऊ शकले. निजामाचे नवाब मीर उस्मान अली यांनी पाकिस्तानमध्ये समाविष्ट होण्याची संकेत दिले होते. कदाचित तसे झाले असते तर राजुरा तालुका पाकिस्तानच्या सीमेवर असता.

160921\img_20210916_080305.jpg

फोटो