शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
5
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
6
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
7
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
8
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
9
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
10
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
11
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
12
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
13
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
14
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
15
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
16
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
17
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
18
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
19
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
20
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला

स्वातंत्र्यानंतरही मेटेगावचे नागरिक डांबरी रस्त्यापासून वंचित

By admin | Updated: April 26, 2015 01:48 IST

तालुका मुख्यालयापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या व घनदाट जंगलाच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या ...

उदय गडकरी - सावलीतालुका मुख्यालयापासून अवघ्या ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या व घनदाट जंगलाच्या मध्यभागी वास्तव्यास असलेल्या मेटेगावातील १० आदिवासी कुटुंबातील ५७ गावकऱ्यांची ही कहाणी आहे.स्वातंत्र्य पूर्व काळातील मेटेगाव साधनसंपत्तीने समृध्द व वनवैभवाने नटलेले गाव होते. त्या गावात पारंपरिक पद्धतीने लोखंड तयार करण्याचे काम चालायचे. हे परिसरात मिळत असलेल्या दगडांच्या अवशेषांवरून निदर्शनास येते. त्या काळात या गावाची लोकसंख्या ७११ इतकी असल्याची नोंद पोलीस ठाण्यात असल्याचे सांगण्यात येते. मात्र आज केवळ ५७ इतकीच लोकसंख्या असून दहा घरांची वस्ती आहे. परंतु स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांतही या गावाला जाण्यासाठी शासनाकडून रस्ता मिळाला नाही. हे त्या गावाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. जंगलातून पायवाट असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत गावकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, तर दररोज जंगली श्वापदांचा वावर या गावकऱ्यांमध्ये दहशत पसरवित आहे. दळणवळणाच्या सोईअभावी अचानक उद्भवलेल्या आजारांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.प्रस्तुत प्रतिनिधीने सदर गावाला भेट दिली असता अनेक बाबी उजेडात आल्या. मेटेगाव आज ज्या दयनिय परिस्थितीत आहे, त्याकडे पाहून स्वातंत्रपूर्व काळात या गावांमध्ये लोखंड निर्मिती होत असेल याची कुणी कल्पनाही करु शकत नाही. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी वास्तव्याला असताना तेथे पारंपरिक पद्धतीने लोखंड निर्मिती करण्यात येत असल्याचे निदर्शनात येत आहे. गावाच्या सभोवताल सुमारे अर्धा कि.मी. अंतरापर्यंत तशा प्रकारच्या लोखंड सदृष्य दगडांचे ढीग आढळून येतात. आढळून आलेल्या दगडांबद्दल अधिक माहिती जाणून घेतली असता लोखंड निर्मिती कशा पद्धतीने करायचे याबद्दल गावकरी अनभिज्ञ आहेत. मात्र शुद्ध लोखंडाच्या निर्मितीनंतर उरलेला मळ किंवा कच्चा माल असावा, असे दगडांच्या अवशेषांवरून निदर्शनास येते .आज या गावात आदिवासी समाजाची केवळ दहा घरे असून साध्या प्राथमिक शिक्षणाची सोयही या गावात झाली नाही. अडीच कि.मी. अंतरावर जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. परंतु गावाच्या सभोवताल दुसऱ्या गावापर्यंत घनदाट जंगल असल्याने लहान मुलांना शाळेत पाठविणे शक्य नसल्याने गावातील मुले शिक्षणापासून वंचित आहेत.