शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

अधिग्रहणानंतरही शेतकर्‍यांनाच भुर्दंड

By admin | Updated: May 15, 2014 23:27 IST

जलसंपदा विभागाकडून १४ वर्षांपासून संपादित केलेल्या जमिनीचा शेतसारा फेरफार न केल्यामुळे आजही शेतकर्‍यांकडूनच वसूल केला जात आहे.

चंद्रपूर : जलसंपदा विभागाकडून १४ वर्षांपासून संपादित केलेल्या जमिनीचा शेतसारा फेरफार न केल्यामुळे आजही शेतकर्‍यांकडूनच वसूल केला जात आहे. यामुळे शेतकर्‍यांना नाहक भुर्दंड बसत असून गरीब शेतकर्‍यांवर विनाकारणचा बोजा लादला जात असल्याचा आरोप लालपोथरा संयुक्त कालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मांडवकर यांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत केला. एक महिन्याच्या आत फेरफार करुन शेतसारा व्याजासह शेतकर्‍यांना परत करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

जलसंपदा विभाग व भूसंपादन संस्थेने मोठय़ा प्रमाणात प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन केले आहे. लालपोथरा संयुक्त कालवा, मुख्य कालवे व वितरिकांसाठी वरोरा तालुक्यातील ३१३ हेक्टर जमीन संपादित केली होती. वरोरा येथील सिंचन विभागाने १५0 हेक्टर व लभानसराड सिंचन विभागात १६३ हेक्टर शेतजमीन सन २000 पासून संपादीत केली आहे. शासनाच्या धडक मोहिमेंतर्गंंत भूसंपादन संस्थेत संपादित केलेल्या जमिनीची आराजी मूळ मालकाच्या आराजीतून कमी करुन शेतकर्‍यांचा स्वतंत्र सातबारा तयार केल्यानंतर शेतसारा लावणे गरजेचे होते. परंतु फेरफार अजूनही केले नसल्याने शेतकर्‍यांना नाहक भुर्दंड बसत आहे. शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शासनाच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकर्‍यांना नाहक त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शासनाच्या जलसंपदा विभागाकडून आदेश निघूनही १४ वर्षांंपासून शेतसारा वसूल केला जात असून भूसंपादित शेतीमध्ये काही भाग शासनाचा असल्यामुळे शेतकरी ती शेती विकू शकत नाही. त्यामुळे या संदर्भात ज्या कार्यालयाकडून काम होत नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व एक महिन्याच्या आत सातबारा फेरफार करुन द्यावा, अशी मागणी मांडवकर यांनी केली आहे. अधिग्रहीत झालेल्या शेतजमिनीचे फेरफार न झाल्यामुळे जलसंपदा विभाग पाणी वापर संस्थेला कालवे हस्तांतरितसुद्धा करु शकत नसून शेतकर्‍यांना शेतसारा एक महिन्याच्या आत परत करावा, अन्यथा लालपोथरा कालवा संघर्ष समिती शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा मांडवकर यांनी दिला आहे पत्रपरिषदेला विजय ढेंगळे उपस्थित होते. ( प्रतिनिधी)