शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
2
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात अज्ञातावर खुनाचा गुन्हा, तपास सीआयडीकडे
4
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
5
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
6
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
7
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
8
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
9
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
10
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
11
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
12
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
13
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
14
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
15
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
16
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
17
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
18
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
19
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
20
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती

अधिग्रहणानंतरही शेतकर्‍यांनाच भुर्दंड

By admin | Updated: May 15, 2014 23:27 IST

जलसंपदा विभागाकडून १४ वर्षांपासून संपादित केलेल्या जमिनीचा शेतसारा फेरफार न केल्यामुळे आजही शेतकर्‍यांकडूनच वसूल केला जात आहे.

चंद्रपूर : जलसंपदा विभागाकडून १४ वर्षांपासून संपादित केलेल्या जमिनीचा शेतसारा फेरफार न केल्यामुळे आजही शेतकर्‍यांकडूनच वसूल केला जात आहे. यामुळे शेतकर्‍यांना नाहक भुर्दंड बसत असून गरीब शेतकर्‍यांवर विनाकारणचा बोजा लादला जात असल्याचा आरोप लालपोथरा संयुक्त कालवा संघर्ष समितीचे अध्यक्ष ओमप्रकाश मांडवकर यांनी बुधवारी आयोजित पत्रपरिषदेत केला. एक महिन्याच्या आत फेरफार करुन शेतसारा व्याजासह शेतकर्‍यांना परत करावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

जलसंपदा विभाग व भूसंपादन संस्थेने मोठय़ा प्रमाणात प्रकल्पाच्या कामासाठी भूसंपादन केले आहे. लालपोथरा संयुक्त कालवा, मुख्य कालवे व वितरिकांसाठी वरोरा तालुक्यातील ३१३ हेक्टर जमीन संपादित केली होती. वरोरा येथील सिंचन विभागाने १५0 हेक्टर व लभानसराड सिंचन विभागात १६३ हेक्टर शेतजमीन सन २000 पासून संपादीत केली आहे. शासनाच्या धडक मोहिमेंतर्गंंत भूसंपादन संस्थेत संपादित केलेल्या जमिनीची आराजी मूळ मालकाच्या आराजीतून कमी करुन शेतकर्‍यांचा स्वतंत्र सातबारा तयार केल्यानंतर शेतसारा लावणे गरजेचे होते. परंतु फेरफार अजूनही केले नसल्याने शेतकर्‍यांना नाहक भुर्दंड बसत आहे. शेतकर्‍यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन शासनाच्या अकार्यक्षमतेमुळे शेतकर्‍यांना नाहक त्रास दिला जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

शासनाच्या जलसंपदा विभागाकडून आदेश निघूनही १४ वर्षांंपासून शेतसारा वसूल केला जात असून भूसंपादित शेतीमध्ये काही भाग शासनाचा असल्यामुळे शेतकरी ती शेती विकू शकत नाही. त्यामुळे या संदर्भात ज्या कार्यालयाकडून काम होत नसेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी व एक महिन्याच्या आत सातबारा फेरफार करुन द्यावा, अशी मागणी मांडवकर यांनी केली आहे. अधिग्रहीत झालेल्या शेतजमिनीचे फेरफार न झाल्यामुळे जलसंपदा विभाग पाणी वापर संस्थेला कालवे हस्तांतरितसुद्धा करु शकत नसून शेतकर्‍यांना शेतसारा एक महिन्याच्या आत परत करावा, अन्यथा लालपोथरा कालवा संघर्ष समिती शेतकर्‍यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा मांडवकर यांनी दिला आहे पत्रपरिषदेला विजय ढेंगळे उपस्थित होते. ( प्रतिनिधी)