शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षांनंतरही ग्रामीण रस्त्यांचे भाग्य उजळेना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:29 IST

गोवरी : रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहे. स्मार्ट रस्त्यांनी शहरे सजली असताना ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था ...

गोवरी : रस्ते हे देशाच्या विकासाचे प्रतीक आहे. स्मार्ट रस्त्यांनी शहरे सजली असताना ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांकडे गेल्या अनेक वर्षांपासून अद्याप कुणाचेही लक्ष गेले नाही. अनेक रस्ते अखेरच्या घटका मोजत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाळ्यात चिखलाचे साम्राज्य व खड्डेच खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत. मात्र, स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य उजळले नाही. हे ग्रामीण भागातील नागरिकांचे दुर्दैव आहे.

राजुरा तालुक्यातील गोवरी-पोवनी, पारधीगुडा-मंगी , भुरकुंडा(खु)-देवाडा-गडचांदूर फाटा, पाचगाव-खैरगुडा, पाचगाव-कैकाडीगुडा, कुळमेथे गुडा-कोटकागुडा, भुरकुंडा (बू)-देवाडा यासारख्या तालुक्यांतील बहुतांश रस्त्यांवर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात चिखलाचे साम्राज्य पसरलेले असते. यामुळे वाहनधारकांसह प्रवाशांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. प्रवाशांसह नागरिकांची ओरड होऊनही या रस्त्यांच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्षच होत असल्याचे दिसून येत आहे. संबंधित विभाग आणि लोकप्रतिनिधी रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने दिवसेंदिवस ग्रामीण भागातील रस्ते नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

140821\img-20210814-wa0028.jpg

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही ग्रामीण भागातील रस्त्यांचे भाग्य उजळेना....!