शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

१२ दिवसानंतरही संसार उघड्यावरच

By admin | Updated: June 10, 2014 23:56 IST

कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ३० मे रोजी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात ८६ झोपड्या जळून खाक झाल्यात. घरातील धान्य आणि वस्तुंची राखरांगोळी झाली.

तुटपुंजी मदत : १ कोटी ८० लाखांचे नुकसानरत्नाकर चटप - लखमापूरकोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ३० मे रोजी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात ८६ झोपड्या जळून खाक झाल्यात. घरातील धान्य आणि वस्तुंची राखरांगोळी झाली. आज १२ दिवसानंतरही आगग्रस्तांचे संसार उघड्यावर आहेत. आम्हाला निवारा कधी मिळेल, अशी आर्त हाक ते देत आहेत. शासकीय सर्वेक्षणानुसार या आगीमुळे जवळपास एक कोटी ८० लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले. घरात मुठभर धान्यदेखील उरले नसल्याने हात कुणाकडे पसरावे, असा प्रश्न आगग्रस्तांपुढे उभा ठाकला आहे. सध्या काही सामाजिक संघटना आणि परिसरातील सीमेंट कंपन्या या आगग्रस्तांना मदत करीत आहेत. आगीत सर्वच जळून खाक झाल्याने पुन्हा संसाराचा गाडा कसा उभा करायचा, हा प्रश्न आगग्रस्तांना छळत आहे. या वस्तीत शेतमजूर कामगार व लघुउद्योग करणारे कुटुंब मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. मिळेल ते काम करुन दररोजच्या जेवणाची सोय करणे व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, असा या वस्तीतील लोकांचा दिनक्रम आहे. त्यामुळे राहण्यासाठी घर नसल्याने व प्रशासन इतर मुलभूत सुविधा पुरविण्यात उशिर करीत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले. काही कुटुंबीयांचे नातेवाईक बाहेरगावावरुन रोजच्या जेवणाचा डबा पुरवित आहेत. परंतु अर्ध्यापेक्षा अधिक रहिवाशांचे नातेवाईक दूर गावी राहतात. त्यामुळे त्यांच्या भोजनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवातीच्या काळात चहा, बिस्कीट आणि भोजनाची व्यवस्था सुरळीतपणे केली. मात्र आता या सामाजिक जबाबदारीतून हात झटकले असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मिळेल तेव्हा खायचे नाही तर उपाशी रहायचे, अशी परिस्थिती आगग्रस्तांची आहे. आगीतून सावरण्यासाठी जळालेले टिनपत्रे, भांडी, हरविलेल्या वस्तू शोधण्यापलिकडे आगग्रस्तांपुढे पर्याय नाही. आतापर्यंत शासनामार्फत खावटी खर्च म्हणून केवळ बाराशे ते दिड हजार रुपये प्रती कुटुंबाला देण्यात आले आहे. इतक्या कमी पैशात पुन्हा संसार उभा करायचा तरी कसा, असा आगग्रस्तांचा प्रश्न आहे.