शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

१२ दिवसानंतरही संसार उघड्यावरच

By admin | Updated: June 10, 2014 23:56 IST

कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ३० मे रोजी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात ८६ झोपड्या जळून खाक झाल्यात. घरातील धान्य आणि वस्तुंची राखरांगोळी झाली.

तुटपुंजी मदत : १ कोटी ८० लाखांचे नुकसानरत्नाकर चटप - लखमापूरकोरपना तालुक्यातील गडचांदूर शहरातील वॉर्ड क्र. ४ मध्ये ३० मे रोजी दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. यात ८६ झोपड्या जळून खाक झाल्यात. घरातील धान्य आणि वस्तुंची राखरांगोळी झाली. आज १२ दिवसानंतरही आगग्रस्तांचे संसार उघड्यावर आहेत. आम्हाला निवारा कधी मिळेल, अशी आर्त हाक ते देत आहेत. शासकीय सर्वेक्षणानुसार या आगीमुळे जवळपास एक कोटी ८० लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले. घरात मुठभर धान्यदेखील उरले नसल्याने हात कुणाकडे पसरावे, असा प्रश्न आगग्रस्तांपुढे उभा ठाकला आहे. सध्या काही सामाजिक संघटना आणि परिसरातील सीमेंट कंपन्या या आगग्रस्तांना मदत करीत आहेत. आगीत सर्वच जळून खाक झाल्याने पुन्हा संसाराचा गाडा कसा उभा करायचा, हा प्रश्न आगग्रस्तांना छळत आहे. या वस्तीत शेतमजूर कामगार व लघुउद्योग करणारे कुटुंब मोठ्या संख्येने वास्तव्याला आहेत. मिळेल ते काम करुन दररोजच्या जेवणाची सोय करणे व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे, असा या वस्तीतील लोकांचा दिनक्रम आहे. त्यामुळे राहण्यासाठी घर नसल्याने व प्रशासन इतर मुलभूत सुविधा पुरविण्यात उशिर करीत असल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचे आगग्रस्तांनी सांगितले. काही कुटुंबीयांचे नातेवाईक बाहेरगावावरुन रोजच्या जेवणाचा डबा पुरवित आहेत. परंतु अर्ध्यापेक्षा अधिक रहिवाशांचे नातेवाईक दूर गावी राहतात. त्यामुळे त्यांच्या भोजनाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने सुरुवातीच्या काळात चहा, बिस्कीट आणि भोजनाची व्यवस्था सुरळीतपणे केली. मात्र आता या सामाजिक जबाबदारीतून हात झटकले असल्याचे प्रकर्षाने जाणवते. मिळेल तेव्हा खायचे नाही तर उपाशी रहायचे, अशी परिस्थिती आगग्रस्तांची आहे. आगीतून सावरण्यासाठी जळालेले टिनपत्रे, भांडी, हरविलेल्या वस्तू शोधण्यापलिकडे आगग्रस्तांपुढे पर्याय नाही. आतापर्यंत शासनामार्फत खावटी खर्च म्हणून केवळ बाराशे ते दिड हजार रुपये प्रती कुटुंबाला देण्यात आले आहे. इतक्या कमी पैशात पुन्हा संसार उभा करायचा तरी कसा, असा आगग्रस्तांचा प्रश्न आहे.