शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

५१४ निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 22:40 IST

चंद्रपूर मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या निवडणूक साक्षरता क्लबच्यामार्फत एक लाख ५४ हजार विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली आहे.

ठळक मुद्देजनजागृती कार्यक्रम : एक लाख ५४ हजार विद्यार्थ्यांना माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: चंद्रपूर मतदारसंघांमध्ये ११ एप्रिल रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी जनजागृती कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यामध्ये निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या निवडणूक साक्षरता क्लबच्यामार्फत एक लाख ५४ हजार विद्यार्थ्यांना शपथ देण्यात आली आहे.आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी केंद्रीय निवडणूक विभागामार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती अभियान सुरू आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील जनजागृती कार्यक्रमासाठी जिल्हा प्रशासनामार्फत मोठ्या प्रमाणात उपाययोजना केल्या जात आहे.वेगवेगळ्या कार्यक्रमाचे तालुकास्तरावर आयोजन करण्यात येत असून शाळा-कॉलेजच्यामार्फत घराघरात मतदानाच्या संदर्भात जनजागृती केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जनजागृती कार्यक्रमाचे नोडल अधिकारी प्राथमिक शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे यांनी जिल्ह्यामध्ये ५१४ निवडणूक साक्षरता क्लबची स्थापना केली आहे.जिल्ह्यातील १५ पंचायत समिती अंतर्गत वर्ग ८ ते १२ पर्यंतच्या सर्व शाळा व सर्व महाविद्यालयातील युवा मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती प्रभावीपणे देण्यात यावी, यासाठी सदर क्लबची स्थापना करण्यात आली आहे.१८ वर्षाखालील मुलाचा सहभागनिवडणुकीला मतदान करण्यासाठी १८ वर्षाची अट लादण्यात आली आहे. मात्र जे विद्यार्थी निवडणूक प्रक्रियेमध्ये वयाच्या अटीनुसार सहभागी होऊ शकत नाहीत. त्या विद्यार्थ्यांना देखील या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी करण्यातआले असून मतदान करणे किती आवश्यक आहे, हे आपल्या पालकांना समजावून सांगण्याची धुरा त्याच्यावर सोपविण्यात आली आहे. अशाप्रकारे मतदान जागृती करण्यात येत आहे. या साक्षरता क्लबला उत्स्फूर्त असा प्रतिसाद शाळा-कॉलेजमधून मिळत असून यामुळे या वर्षीच्या निवडणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात नागरिक मतदानासाठी बाहेर पडतील,अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.