शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

कोरपना येथे उपजिल्हा रुग्णालय स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:52 IST

कोरपना : तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयाची दर्जावाढ करून उपजिल्हा ...

कोरपना : तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्हा सीमेवरील शेवटचे तालुका मुख्यालय असलेल्या कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयाची दर्जावाढ करून उपजिल्हा रुग्णालयाची स्थापना करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अबरार अली व रुग्णांकडून होते आहे.

कोरपना हे तालुक्याचे स्थान असल्याने येथे तालुक्यातील अनेक गावातून रुग्ण उपचारासाठी येतात. मात्र येथील रुग्णालयात बऱ्याच सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना रेफर टू चंद्रपुर केले जाते. रुग्णालयात सद्यस्थितीत ३० खाटाचीच व्यवस्था असल्याने अधिक रुग्ण झाल्यास त्यांना जमिनीवर झोपूनच उपचार घ्यावे लागतात. रुग्णालयात बऱ्याच रोगाचे तज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांनाही दुसऱ्या रुग्णालयात उपचार घेण्यावाचून पर्याय उरत नाही. रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्याने येथील वातावरण आरोग्यदृष्ट्या पोषक नाही. त्यामुळे येथील स्वच्छता व परिसर सौंदर्यीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. रुग्णालयात गरजेनुसार पाण्याची व्यवस्था नसल्याने रुग्णांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. तसेच येथे अनेक आधुनिक उपचार यंत्र सामग्री उपलब्ध नाही. त्यामुळे थातुरमातुर उपचार करूनच जिल्हा रुग्णालयात रेपर होण्याखेरीज पर्याय उरत नाही. त्यामुळे येथे तज्ञ सह उपचार यंत्र पुरवण्याची गरज रुग्णांकडून व्यक्त होत आहे. कोरपना हे तेलंगणा राज्य व यवतमाळ जिल्ह्यातील गावातील नागरिकांना सोयीचे व मध्यवर्ती ठिकाण पडत असल्याने येथे आरोग्यविषयक सुविधा वाढवणे अत्यंत गरजेची आहे. मात्र यावर अनेकदा लक्ष वेधून ही आरोग्य यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. रुग्णालयात पुरेसा वैद्यकीय स्टॉप नाही. तसेच तालुका पातळी वर आवश्यक असलेले तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालय गडचांदूर येथे असल्याने कोरपणा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पाहिजे तितके लक्ष देणे शक्य होत नाही. त्याचाही फटका रुग्णांना येथील असुविधामुळे बसतो आहे. करिता कोरपना येथील ग्रामीण रुग्णालयाची दर्जावाढ करून उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करणे गरजेचे असल्याचे मत अली यांनी व्यक्त केले आहे.

तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयही हलवा

तालुक्याचे मुख्यालय असलेल्या कोरपना येथे तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे कार्यालय त्वरित हलविण्यात यावे. जेणेकरून तालुक्याचा आरोग्यविषयक कारभार एक केंद्री होईल. सर्व कार्यालय एका जागी राहल्याने काम काज ही जलद गतीने होणार. त्यादृष्टीने गडचांदूर वरून सदर कार्यालय कोरपना येथे हलविण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.