शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय पुरूष आयोग स्थापन करा

By admin | Updated: September 2, 2015 00:48 IST

पत्नीपीडित पुरूषांना मानसिक आधार देऊन तसेच कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांचा परिवार विभक्त होण्यापासून वाचविण्याचे काम ..

चंद्रपुरात चर्चासत्र : पत्नीपीडित पुरूषांची मागणीघोडपेठ : पत्नीपीडित पुरूषांना मानसिक आधार देऊन तसेच कायदेशीर मार्गदर्शन करून त्यांचा परिवार विभक्त होण्यापासून वाचविण्याचे काम जिल्ह्यात भारतीय परिवार बचाव संघटना करीत आहे. मात्र त्यांना आधार देण्यासाठी शासनाने राष्ट्रीय पुरूष आयोग स्थापन करण्याची मागणी नंदकिशोर मैंदळकर यांनी केली.रविवारी चंद्रपुरातील आझाद बागेमध्ये संघटनेचे सल्लागार अ‍ॅड. संदीप नागापुरे यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्र पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सहकारी शिक्षणाधिकारी नरेंद्र पिंपळकर, संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, डॉ. गुरूदेव गेडाम, सुदर्शन नैताम, विनोद पिसे, दीपक पराते, प्रशांत हजबन, संदीप आत्राम, शीतल साळवे, डॉ. राहुल विधाते आदी उपस्थित होते.सभेत अनेकांनी स्त्री अत्याचाराच्या व्यथा मांडल्या. संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर चर्चासत्रात बोलताना म्हणाले, स्त्री अत्याचाराने समाज ढवळून निघत आहे. त्यामुळे कुटुंब व्यवस्था ढासळू लागली आहे. भारतीय कुटुंब व्यवस्थेची मृत्युघंटा वाजत आहे. हुंडाबळी कायदा ४९८ अ चे भूत प्रत्येक पुरूषाच्या मानगुटीवर बसणार आहे. आजपर्यंत समाजाने स्त्रीला देवीच्या स्थानी बघितले आहे. तिला देवगाय म्हटले आहे व पुरूषाला मारकुंडा सांड. परंतु, आता परिस्थिती बदलली आहे. सर्व्हेनुसार जास्तीत जास्त खटले साध्याभोळ्या निर्व्यसनी पुरूषांवर झालेले आहेत, असे सांगितले.नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) च्या सर्व्हेनुसार २०१४ या वर्षात ६० हजार स्त्री अत्याचारग्रस्त पुरूषांनी आत्महत्या केल्या आहेत. ९८ टक्के स्त्रिया नवरा आपल्या मनासारखा वागत नसल्यास त्याच्यावर केस करतात. त्यांना घरात सासू-सासरे नकोत, जेलमध्ये पाठवेन अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. स्त्रियांच्या बाजूने हुंडाबळीचा कायदा आहे. त्याचा खुळखुळ्यासारखा वापर स्त्रिया करीत आहेत. तो वाजवला की सासरचे सगळे गजाआड. अशा प्रकरणांत स्त्रीच्या बाजूने उभे राहणाऱ्यांची संख्या जास्त असते. पण पुरूष हा एकाकी असतो. त्यामुळे पुरूषाला दाद मागायला जागाच नाही. पुरूषांनाही दाद मागता यावी पुरूष आयोगाची स्थापन करून पुरूषांनाही ४९८ ब हा कायदा बहाल करावा जेणे करून दोषी स्त्रीवरही कारवाई करता येईल, असे नंदकिशोर मैंदळकर यांनी म्हटले आहे. (वार्ताहर)