शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण ग्रामसमृद्धी व शतकोटी वृक्षलागवड कार्यक्रमाचा फज्जा

By admin | Updated: May 23, 2015 01:28 IST

कोरपना तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीमध्ये सन २०१०-२०१४ या कालावधीमध्ये शासनाच्या पर्यावरण ग्रामसमृद्धी व शतकोटी वृक्षारोपण कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करण्यात आला.

रत्नाकर चटप  नांदाफाटाकोरपना तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतीमध्ये सन २०१०-२०१४ या कालावधीमध्ये शासनाच्या पर्यावरण ग्रामसमृद्धी व शतकोटी वृक्षारोपण कार्यक्रमाचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र लाखोचा निधी खर्च होऊन गावात झाडेच लागली नसल्याचे दिसत असल्याने या योजनेचा तालुक्यात फज्जा उडाला आहे.शासनाने सन २०११-१२ मध्ये ग्रामपंचायतींना नर्सरी तयार करण्यासाठी निधी दिला. यातील २० टक्केही रोपे तयार झाली नाही. त्यानंतर रोपवाटिका विकसित करण्यासाठी देण्यात आलेल्या निधीचाही वापर करण्यात आला नसल्याचे चित्र दिसते. सन २०१२-२०१३ मध्ये काही ग्रामपंचायतींनी शकल लढवित बाहेरुन मोजक्या रोपांची खरेदी केली. ही रोपे ग्रामपंचायत कार्यालयातच वाळून गेली तर काही रोपे काही दिवसातच नष्ट झाली आहे. रोपे लावण्यासाठी नियोजन आराखडा व खड्डयाचा आकार याबाबत दुर्लक्ष करण्यात आले. झाडे न लावताच काही ग्रामपंचायतीने कामाचा आराखडा, अंंदाजपत्रक व तांत्रिक मान्यता न घेताच निधी मंजूरर करुन घेतला. यातच गतवर्षी तालुक्यात नरेगा अंतर्गत झाडे लावण्यात आली. यात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे दिसते. वृक्षारोपणासाठी व संवर्धनासाठी गरज नसताना नऊ रुपयांची प्लॉस्टीक जाळी ५६ रुपयात ग्रामपंचायतीला देण्यात आली. त्याच बरोबर अनेक ग्रामपंचायतीपुढे ट्रक भरुन बांबूही उतरविण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्षात वृक्षारोपण झालेच नाही. याबाबत काही लोकप्रतिनिधींनी संबंधित विभागाकडे तक्रारी दाखल केल्यानंतर पंचायत समितीने आॅक्टोबर २०१४ मध्ये शतकोटी वृक्षारोपण कार्यक्रमाची तपासणी केली.यात काही ग्रामपंचायतीमध्ये नऊ टक्के, कुठे २८ टक्के, कुठे ३५ टक्के तर कुठे ५ टक्के झाडे जगल्याची दिसले. त्यानंतर १७ एप्रिल २०१५ रोजी मंत्रालयातून चौकशीबाबत पत्रही देण्यात आले. चांदवली मुंबई येथील आमदार नसीम खान यांनी विधानसभेत याबाबत प्रश्न उपस्थित केला. अर्धा तास चर्चाही झाली. प्रश्न १६/१३७ नुसार झाल्यानंतर कोरपना पंचायत समितीमध्ये दोन विस्तार अधिकाऱ्यांवर निलंबनाचा बडगा उगारण्यात आल्याचे समजते. झाड न लावताच खड्डे खोदणे, कचरा काढणे व साफ करणे, पाणी कुंपण यासाठीचा खर्च या योजने अंतर्गत दाखवून अनेक ग्रामपंचायतींनी निधी लाटला आहे. आजमितीला लाखो रुपये खर्च होेऊनही प्रशासन संबंधितांवर कारवाई का करीत नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. एकदा झाड लावल्यानंतर त्याचे मुल्यांकन झाले नसल्याचा प्रकार जिवती व कोरपना तालुक्यात उघडपणे दिसत असताना याबाबत पांघरुन का घातले जात आहे, याबाबत उलटसुलट चर्चा नागरिकांमध्ये दिसून येत आहे. याकडे संबंधित अधिकारी व विभाग लक्ष देईल का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.