शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
4
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
5
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
6
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
7
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
8
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
9
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
10
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
11
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
12
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
13
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
14
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
15
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
16
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
17
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
18
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
19
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
20
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा

पर्यावरण ग्रामसमृद्धी योजनेचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: October 26, 2014 22:36 IST

शासनाने सन २०१० पासून पर्यावरण ग्रामसमृद्धी योजना राज्यात सुरु केली. यासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र सदर निधीचा उपयोग न करता बऱ्याच ग्रामपंचायतींनी

कोट्यवधी रुपये पाण्यात : कुठे गेले निर्मल ग्राम ?लखमापूर : शासनाने सन २०१० पासून पर्यावरण ग्रामसमृद्धी योजना राज्यात सुरु केली. यासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र सदर निधीचा उपयोग न करता बऱ्याच ग्रामपंचायतींनी या योजनेअंतर्गत असलेली कामेच केली नाही. त्यामुळे शासनाचे निर्मल ग्राम पुरस्काराचे स्वप्न हे स्वप्नच राहिले असून कोरपना, जिवती तालुक्यासह जिल्ह्यातच या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला दिसून येत आहे.या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना एक ते सहा लाखापर्यंत निधी देण्यात आला. ज्यामध्ये गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करणे, शौचालय बांधणे, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षलागवड व संगोपन, ग्रामस्वच्छता, नरेगाव अंतर्गत झाडांसाठी खड्डे खोदणे आदी कामे करावयाची होती. परंतु अनेक ग्रामपंचायतींनी थातूरमातूर कामे करुन निधीची उचल केली आहे. कोरपना तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींना सदर निधीचा पुरवठा केल्याचे समजते. यामधून २८ ग्रामपंचाययतीची निवड निर्मल ग्राम पुरस्कारासाठी करण्यात आली होती. मात्र गावात ही योजना प्रभावीपणे न राबविल्याने एकही ग्रामपंचायत पुरस्कारासाठी पात्र ठरली नाही. परिणामी शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसते. प्रत्येक गावात वैयक्तिक शौचालय असावे व गाव हागणदारी मुक्त व्हावे, यासाठी वैयक्तिक शौचालय निधी म्हणून १२०० ते १०,००० रुपयापर्यंत निधी देण्यात आला. यात अनेक गावांमध्ये शौचालय बांधण्यात आले नसल्याचे समजते. काही ग्रामपंचायतींनी पहिल्या टप्प्यातील निधी खर्च करुनही दुसऱ्या टप्प्यातील निधींसाठी ग्रामपंचायती पात्र ठरलेल्या नाही. वृक्षलागवडीसाठी साधारणत: दोन बाय दोन आकाराचे खड्डे खोदण्याचे आदेश संबंधित विभागामार्फत देण्यात आलेले होते. मात्र खड्डेच खोदले नसल्याचे चित्र सर्वत्र दिसते.सन २०१०-११, ११-१२, १२-१३, १३ ते २०१४ मध्ये चार वर्षापासून योजनेअंतर्गत निधी ग्रामपंचायतींना उपलब्ध होेत असताना सदर कामे गेली कुठे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. झाडांची लागवड करताना झाडांचे संगोपन, पाणी व्यवस्थापन न करता कागदोपत्री मात्र वृक्षारोपण झाल्याचे समजते. एकंदरीत शासनाने निर्मल ग्रामचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी खर्च केला. मात्र या निधीचा उपयोग झालेला दिसत नाही. १० वर्षात कोरपना तालुक्यात एकही गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झालेले दिसत नाही. हागणदारीमुक्त गाव योजनेसाठी शासन अनेक उपक्रम व बक्षिस योजना राबवित असताना निधी तर खर्च होतो. परंतु गाव हागदारीमुक्त होत नसल्याचे दिसते. (वार्ताहर)