शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण ग्रामसमृद्धी योजनेचा बट्ट्याबोळ

By admin | Updated: October 26, 2014 22:36 IST

शासनाने सन २०१० पासून पर्यावरण ग्रामसमृद्धी योजना राज्यात सुरु केली. यासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र सदर निधीचा उपयोग न करता बऱ्याच ग्रामपंचायतींनी

कोट्यवधी रुपये पाण्यात : कुठे गेले निर्मल ग्राम ?लखमापूर : शासनाने सन २०१० पासून पर्यावरण ग्रामसमृद्धी योजना राज्यात सुरु केली. यासाठी ग्रामपंचायतींना लाखो रुपयांचा निधी देण्यात आला. मात्र सदर निधीचा उपयोग न करता बऱ्याच ग्रामपंचायतींनी या योजनेअंतर्गत असलेली कामेच केली नाही. त्यामुळे शासनाचे निर्मल ग्राम पुरस्काराचे स्वप्न हे स्वप्नच राहिले असून कोरपना, जिवती तालुक्यासह जिल्ह्यातच या योजनेचा बट्ट्याबोळ झालेला दिसून येत आहे.या योजनेंतर्गत ग्रामपंचायतींना एक ते सहा लाखापर्यंत निधी देण्यात आला. ज्यामध्ये गाव १०० टक्के हागणदारीमुक्त करणे, शौचालय बांधणे, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षलागवड व संगोपन, ग्रामस्वच्छता, नरेगाव अंतर्गत झाडांसाठी खड्डे खोदणे आदी कामे करावयाची होती. परंतु अनेक ग्रामपंचायतींनी थातूरमातूर कामे करुन निधीची उचल केली आहे. कोरपना तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींना सदर निधीचा पुरवठा केल्याचे समजते. यामधून २८ ग्रामपंचाययतीची निवड निर्मल ग्राम पुरस्कारासाठी करण्यात आली होती. मात्र गावात ही योजना प्रभावीपणे न राबविल्याने एकही ग्रामपंचायत पुरस्कारासाठी पात्र ठरली नाही. परिणामी शासनाचे कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे चित्र दिसते. प्रत्येक गावात वैयक्तिक शौचालय असावे व गाव हागणदारी मुक्त व्हावे, यासाठी वैयक्तिक शौचालय निधी म्हणून १२०० ते १०,००० रुपयापर्यंत निधी देण्यात आला. यात अनेक गावांमध्ये शौचालय बांधण्यात आले नसल्याचे समजते. काही ग्रामपंचायतींनी पहिल्या टप्प्यातील निधी खर्च करुनही दुसऱ्या टप्प्यातील निधींसाठी ग्रामपंचायती पात्र ठरलेल्या नाही. वृक्षलागवडीसाठी साधारणत: दोन बाय दोन आकाराचे खड्डे खोदण्याचे आदेश संबंधित विभागामार्फत देण्यात आलेले होते. मात्र खड्डेच खोदले नसल्याचे चित्र सर्वत्र दिसते.सन २०१०-११, ११-१२, १२-१३, १३ ते २०१४ मध्ये चार वर्षापासून योजनेअंतर्गत निधी ग्रामपंचायतींना उपलब्ध होेत असताना सदर कामे गेली कुठे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. झाडांची लागवड करताना झाडांचे संगोपन, पाणी व्यवस्थापन न करता कागदोपत्री मात्र वृक्षारोपण झाल्याचे समजते. एकंदरीत शासनाने निर्मल ग्रामचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी खर्च केला. मात्र या निधीचा उपयोग झालेला दिसत नाही. १० वर्षात कोरपना तालुक्यात एकही गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झालेले दिसत नाही. हागणदारीमुक्त गाव योजनेसाठी शासन अनेक उपक्रम व बक्षिस योजना राबवित असताना निधी तर खर्च होतो. परंतु गाव हागदारीमुक्त होत नसल्याचे दिसते. (वार्ताहर)