शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
2
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस
3
जिथे-जिथे नवीन मतदार तिथे-तिथे भाजपचा विजय! राहुल गांधी यांची टीका; प्रियांका गांधी म्हणाल्या...
4
रागाने गेलेला मुलगा आठ वर्षांनी परतला, पोलिसांकडून ‘सरप्राईज गिफ्ट’; आई-वडिलांचे डोळे अश्रूंनी डबडबले 
5
अमेरिकेकडून शस्त्रास्त्रं खरेदी थांबविल्याच्या वृत्ताचे भारताकडून जोरदार खंडन; संरक्षण मंत्रालयानं स्पष्टच सांगितलं 
6
८० एकरांत २५ फूट गाळ, अजूनही दबलेत १५० जण; आधुनिक मशिन धरालीत येण्यास लागणार ४ दिवस
7
निवडणूक आयोग शपथपत्र द्यायला सांगतोय; पण मी आधीच संसदेत शपथ घेतली आहे : राहुल गांधी
8
महादेवी हत्तीणीसाठी सोमवारी सर्वाेच्च न्यायालयाला साकडे, राज्य सरकार, वनतारा, नांदणी मठ देणार एकत्रित विनंतीअर्ज
9
इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत; शिंदेसेनेचे आंदोलन, तर भाजपची टीका
10
एकाच वेळी चार विद्यार्थ्यांची अंत्ययात्रा, हमसून-हमसून धाय मोकलून रडले गाव...
11
पडळकर समर्थकाचे अपहरण, पाच तासांत आरोपी ताब्यात; रोहित पवार मास्टरमाइंड असल्याचा आरोप
12
"पुणे तर ‘फ्युचर सिटी’; १० वर्षांत कायापालट; शहरासाठी आणखी पाच पोलिस ठाणी" 
13
कावडयात्रेत घुसला भरधाव ट्रक; दोन शिवभक्तांचा मृत्यू
14
उद्योगांची एक्स्प्रेस सुस्साट, प्रक्रिया सुलभ आणि वेगवान; गुंतवणूकदारांना मोठा दिलासा
15
ठाण्यात कैद्यांच्या बंदोबस्तामध्ये हलगर्जीपणा, नऊ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
16
महादेवीसाठी महाराष्ट्रात तोडीच्या सुविधा नाहीत; पेटाच्या नव्या भूमिकेवर मठाचे स्पष्टीकरण
17
जोपर्यंत टॅरिफचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत भारतासोबत व्यापार चर्चा होणार नाही - ट्रम्प
18
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
19
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
20
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 

वृक्षदिंडीने दिला पर्यावरणाचा संदेश

By admin | Updated: August 13, 2015 01:56 IST

प्रदूषणावर आळा घालण्यासाठी व पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन ...

विद्यार्थ्यांसह गावकरी सहभागी : सामाजिक वनीकरण विभागाचे आयोजनताडाळी : प्रदूषणावर आळा घालण्यासाठी व पर्यावरणाचे जतन व संवर्धन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जाणीव जागृती विद्यार्थ्यांमध्ये व जनसामान्यांमध्ये निर्माण होणे काळाची गरज आहे. याच उद्देशाने प्रेरित होवून चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूरद्वारा संचालित जनता विद्यालय ताडाळी तथा सामाजिक वनीकरण विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले. यातून पर्यावरणाचा संदेश देण्यात आला.चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ. अशोक जीवतोडे यांच्या मार्गदर्शनात तथा मुख्याध्यापक एम.बी. खुसपरे यांच्या नियोजनात काढण्यात आलेल्या वृक्षदिंडीची सुरुवात वृक्षपालखीत ठेवलेल्या वटवृक्षाचे पूजन करुन करण्यात आली.विविध फुलांनी सजविलेली आकर्षक वृक्षपालखी, मराठमोळा पेहराव धारन करुन बॅडच्या तालावर नृत्य करणारे लेझीम पथक, वृक्षकलश, हातात घेऊन ‘एक फुल एक झाड, परिसर करु या हिरवागार’, ‘झाडे लावा प्रदूषणाला पळवा’ असे घोषवाक्य उच्चारणाऱ्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. ग्रामपंचायत ताडाळीच्या प्रांगणात वृक्षपालखी खाली ठेवून हरित गणेश वंदना करण्यात आली. याप्रसंगी सामाजिक वनीकरण विभागाचे उपसंचालक कांबळे, लागवड अधिकारी धांडे, सहायक लागवड अधिकारी अमित साळवे, सरपंच ज्योती आसेकर, मुख्याध्यापक खुसपरे यांनी आपल्या उद्बोधनपर भाषणातून वृक्ष आपला सखा आहे. त्याचप्रमाणे परोपकारी बना असा मोलाचा संदेश दिला. या वृक्षदिंडीत गावकरीही सहभागी झाले. (वार्ताहर)