शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांनी खरपूस समाचार घेतला; निलेश लंकेंनी वेगळाच आरोप करत वादाची दिशा बदलली!
2
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
3
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
4
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
5
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
6
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
7
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
8
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
9
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
10
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
11
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
12
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
13
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
16
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
17
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
18
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
19
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती

पर्यावरणस्रेही विकासाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:10 AM

महानिर्मितीच्या वतीने राज्यात मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन केले जात आहे. मात्र, पर्यावरणाचीही काळजी घेतली असून पर्यावरणस्रेही विकास आज काळाची गरज आहे, असे मत महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देबिपीन श्रीमाळी : पर्यावरणदिनी सीटीपीएसतर्फे जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महानिर्मितीच्या वतीने राज्यात मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन केले जात आहे. मात्र, पर्यावरणाचीही काळजी घेतली असून पर्यावरणस्रेही विकास आज काळाची गरज आहे, असे मत महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी यांनी व्यक्त केले. महाऔष्णिक विद्युत केंद्राने आयोजित जागतिक पर्यावरण दिनानिमित्ताने पार पडलेल्या दोन दिवसीय जागृती कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी मुख्य अभियंता जयंत बोबडे व अन्य मान्यवर उपस्थित होते. व्यवस्थापकीय संचालक श्रीमाळी यांनी महानिर्मितीच्या पर्यावरणस्नेही विकासासोबतच पर्यावरण धोरणांची मांडणी केली. पर्यावरणाच्या संरक्षण व सुधारणेसाठी तीन कलमीय कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने विद्युत केंद्रातून वापरलेल्या पाण्याचे शुन्य विसर्ग, एमओईएफ व सीसीप्रती युनिट पाणी वापरण्याचा मानक साध्य करणे, एमपीसीबी, एमओईएफ, सीसी मानकानुसार एसपीएम पातळी मर्यादित करण्यासाठी सर्व ईएसपी फिल्ड ९५ टक्के आणि त्यापेक्षा जास्त ठेवणे गरजेचे आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. चंद्रकांत थोटवे यांनी महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञानात्मक सुधारण करून स्वच्छ व सुंदर पर्यावरण कायम ठेवण्यासाठी पाच कलमी कार्यक्रमाची माहिती दिली. वीज निर्मितीसाठी प्रती युनिट कोळसा वापर कमी करणे, सयंत्र उर्जा वापर कमी करणे, कोळसा वाघिणी रेल्वे विलंबशुल्क शून्य करणे, कार्यस्थळ स्वच्छता, प्रसन्नता, नवकल्पना आदींचा या कार्यक्रमात समावेश आहे. मुख्य अभियंता जयंत बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत केंद्राच्या पर्यावरण संबंधी सद्यस्थितीचे सादरीकरण आणि पाठपुरावा दर महिन्याला केला जातो. महानिर्मितीचे वरिष्ठ व्यवस्थापन हे पर्यावरण दूताची भूमिका पार पाडत आहे. यावेळी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे खुशाल अवचरमल, सुरेंद्र कारणकर, बाळकृष्ण सांगळे जलबिरादरीचे संजय वैद्य, डॉ. टी. डी. कोसे उपस्थित होते. संचालन तेजस्विता तवाडे, कीर्ती चन्ने व वैशाली चौधरी यांनी केले. विजय येऊल यांनी आभार मानले.