लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शंकरपूर ग्रामपंचायतने गावात सर्वत्र प्रतिबंधात्मक फवारणी करण्यात आले होती. मात्र, संभाव्य धोका टाळण्यासाठी आता गावात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही वाहनाला सॅनिटाईज केल्यानंतर प्रवेश दिल्या जात आहे. ग्रामपंचायतच्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.शंकरपूर हे गाव दोन जिल्ह्याच्या सीमेवर बसले आहे. त्यात रेड झोन म्हणून घोषित झालेल्या नागपूर जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्याची सीमा या गावापासून पाच ते सात किलोमीटर आहे. त्यामुळे या गावात प्रवेश करणारे बरेच व्यक्ती रेड झोन जिल्ह्यातून गावात येण्याचा धोका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र, कान्पा- चिमूर हा राज्य महामार्ग असल्याने हा रस्ता बंद करू शकत नव्हते. त्यामुळे या रस्त्यावर पोलीस नाका उभारण्यात आला आहे. येथून दुचाकी व चारचाकी वाहनांची ये जा असल्याने रोगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका आहे. त्यामुळे ग्रामसेवक के. टी. गायकवाड यांनी या रस्त्यावरून येणारे वाहन सॅनिटाईझ करूनच पुढे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या पोलीस नाक्यावर ग्रामपंचायतने दिवसा व रात्रपाळीत दोन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. हे कर्मचारी वाहनावर फवारणी करीत आहेत. कोरोना या रोगाचा प्रसार थांबविण्यासाठी या ग्रामपंचायतने उचलले पाऊल कौतुकास्पद ठरले आहे. यासाठी ग्रामसेवक गायकवाड, ग्रामपंचायतचे कर्मचारी संतोष कोरडे, सादिक शेख, बाळकृष्ण ढोक व मारोती समर्थ आदी सहकार्य करीत आहेत.
वाहन सॅनिटायझर करूनच गावात प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 05:01 IST
शंकरपूर हे गाव दोन जिल्ह्याच्या सीमेवर बसले आहे. त्यात रेड झोन म्हणून घोषित झालेल्या नागपूर जिल्ह्यासह भंडारा जिल्ह्याची सीमा या गावापासून पाच ते सात किलोमीटर आहे. त्यामुळे या गावात प्रवेश करणारे बरेच व्यक्ती रेड झोन जिल्ह्यातून गावात येण्याचा धोका आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व रस्ते बंद करण्यात आले आहे. मात्र, कान्पा- चिमूर हा राज्य महामार्ग असल्याने हा रस्ता बंद करू शकत नव्हते.
वाहन सॅनिटायझर करूनच गावात प्रवेश
ठळक मुद्देग्रामपंचायतची मोहीम : कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पदाधिकारी एकवटले