शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

जन-वन योजनेच्या माध्यमातून गावे समृद्ध करा

By admin | Updated: August 23, 2015 01:18 IST

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन- वन योजना की वनावरील अवलंबित व मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करणारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून गावे समृद्ध करण्यासाठी गाव समित्यांनी पुढाकार घ्यावा,

सुधीर मुनगंटीवार : श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजनेचा मोहुर्लीत शुभारंभचंद्रपूर : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन- वन योजना की वनावरील अवलंबित व मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी करणारी योजना असून या योजनेच्या माध्यमातून गावे समृद्ध करण्यासाठी गाव समित्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.मोहुर्ली येथे आज शनिवारी या योजनेचा शुभारंभ वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्या गुरुनुले, प्रधान सचिव तथा पालक सचिव प्रविणसिंह परदेशी, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक जे.पी. गरड, उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे व सभापती देवराव भोंगळे यावेळी उपस्थित होते.डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन- वन विकास योजनेत पहिल्या टप्प्यात राज्यातील १५० गावांचा समावेश करण्यात आला असून त्यापैकी ५० गावे ताडोबा अंधारी बफर क्षेत्रातील आहेत. या गावांना प्रत्येकी एक लाख या प्रमाणे ५० लाखांचे धनादेश गाव समित्यांना पालकमंत्री यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. त्याचप्रमाणे ताडोबा येथे येणाऱ्या पर्यटन शुल्कातून ताडोबा फाऊंडेशनच्या वतीने गाव विकासासाठी ७१ लाख १० हजार रुपयांचा धनादेश १२ गाव समित्यांना वाटप करण्यात आले. या परिसरातील विद्यार्थ्यांना मदत म्हणून २५ हजार रुपयांची शिष्यवृत्तीचे वाटपही याप्रसंगी करण्यात आले.समृद्ध वन ही आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी असून या वनाचे व वन्यप्राण्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. सृष्टीची ही श्रृखंला खंडीत होता कामा नये. तसेच वनावरील अवलंबित्व व मानव वन्यप्राणी संघर्ष कमी व्हावा, या हेतुने वनालगतच्या गावासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरू केल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. योजनेतील १५० गावांसाठी पहिल्या टप्प्यात ४० कोटीची तरतूद केली आहे, असे ते म्हणाले. (शहर प्रतिनिधी)