शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मनपा शाळेत इंग्रजीचे धडे

By admin | Updated: June 23, 2014 23:46 IST

महानगरपालिकेच्या शाळांनी सध्या कात टाकणे सुरू केले आहे. मराठी शाळांचे अंधारात जात असलेले भविष्य बघता यावर्षीपासून मनपाने आपल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकविण्याचा

पहिली ते चवथी : यावर्र्षींपासून शैक्षणिक सत्र प्रारंभचंद्रपूर: महानगरपालिकेच्या शाळांनी सध्या कात टाकणे सुरू केले आहे. मराठी शाळांचे अंधारात जात असलेले भविष्य बघता यावर्षीपासून मनपाने आपल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, मनपाच्या या इंग्रजी शाळांना विद्यार्थीही मिळणे सुरू झाले आहे.चंद्रपुरात नगरपालिका अस्तित्वाल आल्यानंतर जिल्हा परिषदेसारख्या पालिकेतर्फे विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडण्यात आल्या. या शाळांना तेव्हा सुगीचे दिवस होते. प्रत्येकजण जिल्हा परिषद किंवा नगरपालिकांच्याच शाळांमध्ये शिक्षण घ्यायचे. मात्र कालांतराने जिल्ह्यात काही ठिकाणी खासगी शाळा सुरू झाल्या. या खासगी शिक्षण संस्थांनी नवनवे अभ्यासक्रम सुरू केले. त्यामुळे सधन पालकांचा कल या खासगी शाळांकडे वाढू लागला. कालांतराने मध्यमवर्गीयदेखील खासगी शाळांकडे वळू लागले. चांगल्या निकाल देणाऱ्या शाळा म्हणून खासगी शाळांकडे बघितले जाऊ लागले. त्यामुळे नगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थी कमी होऊ लागले. अलिकडच्या काळात इंग्रजी माध्यमाचे फॅड वाढले आहे. शहरात कान्व्हेंट संस्कृतीचा बोलबाला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही, हे कळून आल्यामुळे प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटमध्ये दाखल करीत आहे. अवाढव्य खर्च वाढला असला तरी पालक तो करताना दिसत आहे. या कान्व्हेंट संस्कृतीमुळे मनपाच्या शाळांना उतरती कळाच लागली. मागील पाच वर्षात तर या शाळांची स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. अनेक शाळा दहा ते बारा विद्यार्थ्यांवरच सुरू आहे. मनपाला शाळांचा खर्च पेलवत नसल्याने सोई-सुविधा पुरविणेही मनपाने बंद केले आहे. त्यामुळे पटसंख्या कमालीची घसरली आहे. महात्मा गांधी प्राथमिक शाळा आणि कस्तुरबा गांधी प्राथमिक शाळा तर महानगरपालिकेला बंद कराव्या लागल्या.या सर्व प्रकारामुळे आणि स्पर्धेच्या युगात टिकता यावे म्हणून महानगरपालिकेने आता आपल्याच शाळांमध्ये सुधार करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा आता आपल्या शाळांमधून इंग्रजी माध्यमाचे धडे देणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर चार शाळांमधून इंग्रजी माध्यम सुरू केले आहे. यावर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. इयत्ता पहिलीतील २० ते २५ विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेशही घेतला आहे. (शहर प्रतिनिधी)