शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

मनपा शाळेत इंग्रजीचे धडे

By admin | Updated: June 23, 2014 23:46 IST

महानगरपालिकेच्या शाळांनी सध्या कात टाकणे सुरू केले आहे. मराठी शाळांचे अंधारात जात असलेले भविष्य बघता यावर्षीपासून मनपाने आपल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकविण्याचा

पहिली ते चवथी : यावर्र्षींपासून शैक्षणिक सत्र प्रारंभचंद्रपूर: महानगरपालिकेच्या शाळांनी सध्या कात टाकणे सुरू केले आहे. मराठी शाळांचे अंधारात जात असलेले भविष्य बघता यावर्षीपासून मनपाने आपल्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचा अभ्यासक्रम शिकविण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे, मनपाच्या या इंग्रजी शाळांना विद्यार्थीही मिळणे सुरू झाले आहे.चंद्रपुरात नगरपालिका अस्तित्वाल आल्यानंतर जिल्हा परिषदेसारख्या पालिकेतर्फे विद्यार्थ्यांसाठी शाळा उघडण्यात आल्या. या शाळांना तेव्हा सुगीचे दिवस होते. प्रत्येकजण जिल्हा परिषद किंवा नगरपालिकांच्याच शाळांमध्ये शिक्षण घ्यायचे. मात्र कालांतराने जिल्ह्यात काही ठिकाणी खासगी शाळा सुरू झाल्या. या खासगी शिक्षण संस्थांनी नवनवे अभ्यासक्रम सुरू केले. त्यामुळे सधन पालकांचा कल या खासगी शाळांकडे वाढू लागला. कालांतराने मध्यमवर्गीयदेखील खासगी शाळांकडे वळू लागले. चांगल्या निकाल देणाऱ्या शाळा म्हणून खासगी शाळांकडे बघितले जाऊ लागले. त्यामुळे नगरपालिकांच्या शाळेतील विद्यार्थी कमी होऊ लागले. अलिकडच्या काळात इंग्रजी माध्यमाचे फॅड वाढले आहे. शहरात कान्व्हेंट संस्कृतीचा बोलबाला आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात इंग्रजीशिवाय तरणोपाय नाही, हे कळून आल्यामुळे प्रत्येक पालक आपल्या पाल्यांना कॉन्व्हेंटमध्ये दाखल करीत आहे. अवाढव्य खर्च वाढला असला तरी पालक तो करताना दिसत आहे. या कान्व्हेंट संस्कृतीमुळे मनपाच्या शाळांना उतरती कळाच लागली. मागील पाच वर्षात तर या शाळांची स्थिती अतिशय चिंताजनक झाली आहे. अनेक शाळा दहा ते बारा विद्यार्थ्यांवरच सुरू आहे. मनपाला शाळांचा खर्च पेलवत नसल्याने सोई-सुविधा पुरविणेही मनपाने बंद केले आहे. त्यामुळे पटसंख्या कमालीची घसरली आहे. महात्मा गांधी प्राथमिक शाळा आणि कस्तुरबा गांधी प्राथमिक शाळा तर महानगरपालिकेला बंद कराव्या लागल्या.या सर्व प्रकारामुळे आणि स्पर्धेच्या युगात टिकता यावे म्हणून महानगरपालिकेने आता आपल्याच शाळांमध्ये सुधार करण्याचा निर्णय घेतला आहे. मनपा आता आपल्या शाळांमधून इंग्रजी माध्यमाचे धडे देणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर चार शाळांमधून इंग्रजी माध्यम सुरू केले आहे. यावर्षीपासून हा अभ्यासक्रम सुरू होणार आहे. इयत्ता पहिलीतील २० ते २५ विद्यार्थ्यांनी या शाळांमध्ये प्रवेशही घेतला आहे. (शहर प्रतिनिधी)