शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:01 IST

देशामध्ये महाराष्ट्राने सर्वप्रथम प्लास्टिक बंदी लागू सर्वांपुढे आदर्श निर्माण केला. पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी नव्या कायद्यानुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे कठोर कार्यवाही करून सक्रीयता दाखविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केले.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशामध्ये महाराष्ट्राने सर्वप्रथम प्लास्टिक बंदी लागू सर्वांपुढे आदर्श निर्माण केला. पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी नव्या कायद्यानुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे कठोर कार्यवाही करून सक्रीयता दाखविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण विभागामार्फत आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लास्टिक पिशवी व थर्माकोल मुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियानाला सुरूवात केली आहे. या अभियानामध्ये महानगरपालिका व नगरपरिषदमध्ये आयुक्त, उपायुक्त, शॉप अ‍ॅण्ड एस्टॉब्लिशमेंट अधिकारी, निरीक्षक, अनुज्ञप्ती निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य अधिकारी यांना कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. याशिवाय उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठ्यांना नामनिर्देशित केले. जिल्हा परिषदमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, ग्रामसेवक कार्यवाही करू शकतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग सदस्य सचिव, प्रादेशिक अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, क्षेत्र अधिकारी, शास्त्रज्ञांनाही प्राधिकृत करण्यात आले.आरोग्य विभागामार्फत संचालक, आरोग्यसेवा, उपसंचालक, आरोग्य अधिकारी, पुरवठा उपआयुक्त व जिल्हा पुरवठा अधिकारी, वनाधिकारी, उपवनसंरक्षक अथवा नामनिर्देशित केलेले अधिकारी यासंदर्भात कार्यवाही करू शकतात. २०० मिलीपेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पीईटी व पीईटीई बाटल्या पिण्याच्या पाण्याची पिशवी, थर्माकोल अथवा तत्सम आदी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करण्याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.