शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 23:01 IST

देशामध्ये महाराष्ट्राने सर्वप्रथम प्लास्टिक बंदी लागू सर्वांपुढे आदर्श निर्माण केला. पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी नव्या कायद्यानुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे कठोर कार्यवाही करून सक्रीयता दाखविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केले.

ठळक मुद्देकुणाल खेमणार : जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : देशामध्ये महाराष्ट्राने सर्वप्रथम प्लास्टिक बंदी लागू सर्वांपुढे आदर्श निर्माण केला. पुढच्या पिढ्यांच्या सुरक्षिततेसाठी या कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीसाठी नव्या कायद्यानुसार प्राधिकृत अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली. त्यामुळे कठोर कार्यवाही करून सक्रीयता दाखविणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुणाल खेमनार यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयात पर्यावरण विभागामार्फत आयोजित आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने प्लास्टिक पिशवी व थर्माकोल मुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियानाला सुरूवात केली आहे. या अभियानामध्ये महानगरपालिका व नगरपरिषदमध्ये आयुक्त, उपायुक्त, शॉप अ‍ॅण्ड एस्टॉब्लिशमेंट अधिकारी, निरीक्षक, अनुज्ञप्ती निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य निरीक्षक, आरोग्य अधिकारी यांना कार्यवाही करण्याचे अधिकार देण्यात आले आहे. याशिवाय उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तलाठ्यांना नामनिर्देशित केले. जिल्हा परिषदमार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, ग्रामसेवक कार्यवाही करू शकतात. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग सदस्य सचिव, प्रादेशिक अधिकारी, उपप्रादेशिक अधिकारी, क्षेत्र अधिकारी, शास्त्रज्ञांनाही प्राधिकृत करण्यात आले.आरोग्य विभागामार्फत संचालक, आरोग्यसेवा, उपसंचालक, आरोग्य अधिकारी, पुरवठा उपआयुक्त व जिल्हा पुरवठा अधिकारी, वनाधिकारी, उपवनसंरक्षक अथवा नामनिर्देशित केलेले अधिकारी यासंदर्भात कार्यवाही करू शकतात. २०० मिलीपेक्षा कमी द्रव धारण क्षमता असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या पीईटी व पीईटीई बाटल्या पिण्याच्या पाण्याची पिशवी, थर्माकोल अथवा तत्सम आदी उत्पादन करणाऱ्या कंपन्यांची तपासणी करण्याविषयीही मार्गदर्शन करण्यात आले.