शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

गोवरीवासीयांचा संघर्ष संपेना !

By admin | Updated: May 22, 2014 23:45 IST

वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गोवरीवासीयांना गेल्या ३० वर्षांपासून पुराचा फटका दरवर्षी बसतो. यात अनेक संसाराची पुराने वाताहत होऊन कुटुंब उघड्यावर येते. पै-पै जोडून उभा केलेला संसाराचा डोलारा

 प्रकाश काळे - हरदोना

वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गोवरीवासीयांना गेल्या ३० वर्षांपासून पुराचा फटका दरवर्षी बसतो. यात अनेक संसाराची पुराने वाताहत होऊन कुटुंब उघड्यावर येते. पै-पै जोडून उभा केलेला संसाराचा डोलारा क्षणार्धात पुराच्या पाण्यात वाहून जातो. पुराच्या पाण्यातून कुटुंब सावरताना होणारी धडपड नागरिकांच्या काळजाचा ठाव घेणारी असून गोवरीवासीयांचे हा संघर्ष ३० वर्षांनंतरही अजून कायम आहे. राजुरा तालुक्यापासून अवघ्या नऊ कि.मी. अंतरावर वेकोलिच्या कुशीत वसलेले गोवरी हे जेमतेम चार हजार लोकसंख्या असलेले गाव. गावाच्या सभोवताल असलेल्या कोळसा खाणी अगदी गावालगत आहे. सुसज्ज रस्ते गावाच्या विकासाचे प्रतिक मानले जाते. मात्र रस्ते चांगले असणे म्हणजे गावाचा परीपूर्ण विकास झाला, असे आपल्याला म्हणता येणार नाही. गोवरी गावाच्या सभोवताल वेकोलिची कोळसा खाण व मातीचे महाकाय ढिगारे आहेत. वेकोलिने कोळसा उत्खननानंतर मातीचे ढिगारे अगदी नाल्याच्या किनार्‍यावर टाकले आहे. वेकोलिने अनेक नाल्यांची दिशा वळविल्याने अल्पशा पावसाने नाल्याला पूर येतो. गोवरी गाव वेकोलिच्या कुशीत अगदी नाल्याच्या काठावर वसले आहे. त्यामुळे गावकर्‍यांना दरवर्षी पुराचा नाहक फटका बसून पै पै जोडून मोठ्या मेहनतीने उभा केलेला संसार उघड्यावर येतो. पुराच्या पाण्यातून कुटुंबाची सावरासावर करताना डोळ्यात अश्रू येतात. कुटुंब वाचविताना चाललेली धडपड जीवघेणेी असते. पुराच्या पाण्यातून कुटुंबाचा डोलारा सुरक्षित स्थळी हलविताना काळजाची होणारी तगमग गोवरीवासीय गेल्या ३० वर्षांपासून अनुभवत आहे. अनेक घरांची पुरात पडझड होऊन कुटुंब उघड्यावर येते. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने येथील जाणकारांना विचारणा केली असता पूर्वी गोवरी परिसरातील गावांपेक्षा वेगळे होते. परिसरात कोळशाचे मोठ्या प्रमाणात साठे असल्याने वेकोलिने अगदी गावालगत कोळसा खाणी निर्माण केल्या. त्यामुळे कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टींगने नवीन इमारतींना अल्पावधीतच तडे जात आहे. वेकोलिने परिसरातील नाल्याची दिशा वळविल्याने अल्पशा पावसाने गोवरी गावात पाणी येते. मात्र गावकर्‍यांच्या हिताचे कोणतेही निर्णय वेकोलिने घेतले नाही. वेकोलिने गावकर्‍यांना आवश्यक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. वेकोलिकडून गावकर्‍यांसाठी अनेक योजना आहेत. मात्र योजना कुठे गडप होतात कळायला मार्ग नाही. वेकोलिने वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा नफा कमवायचा आणि गावकर्‍यांनी आयुष्यभर वेकोलिच्या दुष्परिणामांना सामोरे जायचे, असा अलिखीत नियम बनला आहे. वेकोलिचे जबाबदार अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही.