शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

गोवरीवासीयांचा संघर्ष संपेना !

By admin | Updated: May 22, 2014 23:45 IST

वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गोवरीवासीयांना गेल्या ३० वर्षांपासून पुराचा फटका दरवर्षी बसतो. यात अनेक संसाराची पुराने वाताहत होऊन कुटुंब उघड्यावर येते. पै-पै जोडून उभा केलेला संसाराचा डोलारा

 प्रकाश काळे - हरदोना

वेकोलिच्या कुशीत वसलेल्या गोवरीवासीयांना गेल्या ३० वर्षांपासून पुराचा फटका दरवर्षी बसतो. यात अनेक संसाराची पुराने वाताहत होऊन कुटुंब उघड्यावर येते. पै-पै जोडून उभा केलेला संसाराचा डोलारा क्षणार्धात पुराच्या पाण्यात वाहून जातो. पुराच्या पाण्यातून कुटुंब सावरताना होणारी धडपड नागरिकांच्या काळजाचा ठाव घेणारी असून गोवरीवासीयांचे हा संघर्ष ३० वर्षांनंतरही अजून कायम आहे. राजुरा तालुक्यापासून अवघ्या नऊ कि.मी. अंतरावर वेकोलिच्या कुशीत वसलेले गोवरी हे जेमतेम चार हजार लोकसंख्या असलेले गाव. गावाच्या सभोवताल असलेल्या कोळसा खाणी अगदी गावालगत आहे. सुसज्ज रस्ते गावाच्या विकासाचे प्रतिक मानले जाते. मात्र रस्ते चांगले असणे म्हणजे गावाचा परीपूर्ण विकास झाला, असे आपल्याला म्हणता येणार नाही. गोवरी गावाच्या सभोवताल वेकोलिची कोळसा खाण व मातीचे महाकाय ढिगारे आहेत. वेकोलिने कोळसा उत्खननानंतर मातीचे ढिगारे अगदी नाल्याच्या किनार्‍यावर टाकले आहे. वेकोलिने अनेक नाल्यांची दिशा वळविल्याने अल्पशा पावसाने नाल्याला पूर येतो. गोवरी गाव वेकोलिच्या कुशीत अगदी नाल्याच्या काठावर वसले आहे. त्यामुळे गावकर्‍यांना दरवर्षी पुराचा नाहक फटका बसून पै पै जोडून मोठ्या मेहनतीने उभा केलेला संसार उघड्यावर येतो. पुराच्या पाण्यातून कुटुंबाची सावरासावर करताना डोळ्यात अश्रू येतात. कुटुंब वाचविताना चाललेली धडपड जीवघेणेी असते. पुराच्या पाण्यातून कुटुंबाचा डोलारा सुरक्षित स्थळी हलविताना काळजाची होणारी तगमग गोवरीवासीय गेल्या ३० वर्षांपासून अनुभवत आहे. अनेक घरांची पुरात पडझड होऊन कुटुंब उघड्यावर येते. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने येथील जाणकारांना विचारणा केली असता पूर्वी गोवरी परिसरातील गावांपेक्षा वेगळे होते. परिसरात कोळशाचे मोठ्या प्रमाणात साठे असल्याने वेकोलिने अगदी गावालगत कोळसा खाणी निर्माण केल्या. त्यामुळे कोळसा उत्खननासाठी शक्तीशाली ब्लॉस्टींगने नवीन इमारतींना अल्पावधीतच तडे जात आहे. वेकोलिने परिसरातील नाल्याची दिशा वळविल्याने अल्पशा पावसाने गोवरी गावात पाणी येते. मात्र गावकर्‍यांच्या हिताचे कोणतेही निर्णय वेकोलिने घेतले नाही. वेकोलिने गावकर्‍यांना आवश्यक सुविधा पुरविणे आवश्यक आहे. वेकोलिकडून गावकर्‍यांसाठी अनेक योजना आहेत. मात्र योजना कुठे गडप होतात कळायला मार्ग नाही. वेकोलिने वर्षाकाठी कोट्यवधी रुपयांचा नफा कमवायचा आणि गावकर्‍यांनी आयुष्यभर वेकोलिच्या दुष्परिणामांना सामोरे जायचे, असा अलिखीत नियम बनला आहे. वेकोलिचे जबाबदार अधिकारी याकडे लक्ष द्यायला तयार नाही.