शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

राज्य महामार्गालगतच्या लेआऊटमधील रस्त्यांवर अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2018 23:24 IST

राज्य महामार्गालगत ले-आऊटमधील अंतर्गत रस्ते प्रत्येक ले-आऊटधारकांनी केले आहे. मात्र ले-आऊट मधील १२ मीटरच्या अंतर्गत रस्त्यावर व्यवसायिकांनी पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा: राज्य महामार्गालगत ले-आऊटमधील अंतर्गत रस्ते प्रत्येक ले-आऊटधारकांनी केले आहे. मात्र ले-आऊट मधील १२ मीटरच्या अंतर्गत रस्त्यावर व्यवसायिकांनी पक्के बांधकाम करुन अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अंतर्गत रस्ते दिसेनासे झाल्याने नागरिक राज्य महामार्गाच्या अंतर्गत रस्त्याचा उपयोग करीत असल्याने अनेक अपघात होवून अनेकांना आपला प्राण गमवावा लागल्याच्या घटना घडल्या आहेत.नागपूर- चंद्रपूर राज्य महामार्ग वरोरा शहरातील वर्दळीचे समजले जाणारे आनंदवन चौक, रत्नमाला चौक व बोर्डा चौकातून जात आहे. या दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ले-आऊट आहे. या ले-आऊटमधील नागरिक थेट राज्य महामार्गावर आल्यास अपघात होऊ शकतो. त्यामुळे अशा ले-आऊट धारकांना १२ मीटरचा अंतर्गत रस्ता सोडून रस्ता तयार करणे बंधनकारक आहे. या नियमानुसार ले-आऊटधारकांनी राज्य महामार्गलगत अंतर्गत रस्ते सोडले आहे. वरोरा शहरातील आनंदवन चौक ते बोर्डा चौकात विनायक ले-आऊट वगळता इतर ले-आऊटमधील अंतर्गत रस्ते शोधूनही सापडत नाही. या अंतर्गत रस्त्यावर मोठ-मोठ्या व्यवसायिकांनी पक्के अतिक्रमण करुन आपला व्यवसाय थाटला आहे. त्यामुळे रस्ता असूनही अतिक्रमनामुळे नागरिकांना जाता येत नाही.त्यामुळे नागरिकांना राज्य महामार्गाच्या अंतर्गत रस्त्याचा आधार घ्यावा लागतो. आनंदवन चौक ते बोर्डा चौक या रस्त्यादरम्यान मोठ्या प्रमाणात जड वाहनाची वर्दळ असल्याने नागरिक महामार्गाच्या अंतर्गत रस्त्याची निवड करतात. त्यामुळे याही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनाची वर्दळ असल्याने अनेकदा अपघात झाले आहे. त्यात काहींचा मृत्यू तर काही कायमचे अपंग झाले आहे. राज्य महामार्गालगत ले-आऊटमधील रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन पुढे येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.