शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यावसायिकांनी केले अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:27 IST

चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला तसेच फळांचा बाजार भरतो. या ठिकाणी व्यापारी ठोकमध्ये भाजीपाला तसेच फळे ...

चंद्रपूर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाला तसेच फळांचा बाजार भरतो. या ठिकाणी व्यापारी ठोकमध्ये भाजीपाला तसेच फळे घेऊन लहान व्यावसायिकांना विकतात. मात्र मागील काही दिवसांपासून येथे मोठ्या प्रमाणात काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले असून, वाट्टेल तिथे आपला माल उतरवून इतरांना अडचणीत आणत आहेत. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन येथील अतिक्रमणावर आळा घालावा, अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.

कोरोना संकटामुळे राज्य शासनाने लाॅकडाऊन केले. दरम्यान, सकाळी ११ वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू राहतात. त्यामुळे साहजिकच येथे व्यावसायिक तसेच ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. परिणामी सोशल डिस्टन्सचाही येथे फज्जा उडत आहे. विशेष म्हणजे, बाहेर गावातून ट्रकद्वारे येथे भाजीपाला येतो. मात्र व्यापारी वाट्टेल तिथे भाजीपाला उतरवून इतरांना अडचणीत आणत आहेत. त्यातच काही लहान व्यावसायिकही जागा मिळेल तिथे बसून भाजीपाला विक्री करीत आहेत. त्यामुळे वाहने तसेच ग्राहकांना जाण्यासाठी जागाच नसल्याचे चित्र येथे बघायला मिळत आहे. जो-तो आपल्या सोयीनुसार येथे भाजीपाला उतरवित असून, वाट्टेल तिथे विक्री करीत असल्यामुळे बाजारात एकसूत्रता दिसत नसून, ग्राहकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लक्ष देऊन होणारे अतिक्रमण तसेच ग्राहकांचा त्रास कमी करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

बाॅक्स

दाताळा रस्त्यावरही विक्री

मागील काही दिवसांपासून चंद्रपूर ते दाताळा या मार्गावरील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात काही लहान व्यावसायिक रस्त्याकडेला बसून मोठ्या प्रमाणात भाजीपाला विकत आहेत. परिणामी वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भाजीपाला विकावा, मात्र रस्त्यावर न बसता खुल्या जागेत बसावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, कृषी उत्पन्न बाजार समिती तसचे महापालिकेचेही याकडे दुर्लक्ष झाले आहे.