शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चौकातील अतिक्रमण धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 00:40 IST

शहरातील रस्ते आधीतच अरुंद आहेत. दोन वाहने आली तरी नागरिकांचा कोंडमारा होतो. येथील टिपू सुलतान चौक अतिशय वर्दळीचा असून मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे नागरिकांची डोकेदु:खी वाढली.

ठळक मुद्देअपघाताच्या घटना वाढल्या : कारवाई कधी होणार ?

मनोज गोरे ।ऑनलाईन लोकमतकोरपना: शहरातील रस्ते आधीतच अरुंद आहेत. दोन वाहने आली तरी नागरिकांचा कोंडमारा होतो. येथील टिपू सुलतान चौक अतिशय वर्दळीचा असून मागील अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे नागरिकांची डोकेदु:खी वाढली. हा चौक जणू मृत्यूचाच सापळा झाल्याचे संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमध्ये उमटत आहे़कोरपना शहरातील लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शाळा, महाविद्यालय, आरोग्यकेंद्र, औद्योगिक संस्थामुळे वाहनाची संख्या वाढली. जिल्हा व अन्य तालुक्यांशी संपर्क वाढल्याने दिवसभरात शेकडो वाहने शहरात येतात. यवतमाळ, आदिलाबाद व चंद्रपूर येथून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची संख्या चिंताजनक झाली आहे. शहरातील मुख्य वर्दळतीचे ठिकाण असलेल्या टिपू सुलतान चौकातून बरीच वाहने वळसा घेतात. याच मार्गावर काही मोठ्या दुकानदारांनी दुकाने थाटली. शिवाय दुकानांसमोरील सरकारी जागा अन्य लहान व्यवसायिकांना देवून खोऱ्याने पैसे मिळवित आहे. फळ विक्रेते, पानठेले, खासगी प्रवासी वाहतूक आणि अन्य किरकोळ व्यवसायिकांना नाईलाजास्तव या चौकातूनच कारभार हाकावा लागत आहेत. त्यामुळे चौकात दिवसभरात प्रचंड गर्दी असते. पादचाºयांना येथून वाट काढताना जिवाची कसरत होते़ हा सर्व प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक प्रशासनातील संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी अतिक्रमणांकडे हेतुपूर्वक दुर्लक्ष केले. पोलीस प्रशासनानेही कारवाईचा बडगा उगारला नाही. परिणामी, या चौकात दिवसेंदिवस अपघात होत आहेत.पोलीस प्रशासनाने या चौकात शिपाईची नियुक्ती केली नाही. वाहतूक नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. टिपू सुलतान चौकात चारही बाजूने लहानमोठ्या व्यापाऱ्यांनी अतिक्रमण केले. हे अतिक्रमण हटविण्याचे धाडस अजूनही अद्याप कोणी केले नाही. याला कारण काय, असा सवाल नागरिक विचारीत आहे. आठवडी बाजारात दुकाने लावण्यासाठी बरीच मोठी जागा आहेत. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेवून विकासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. केवळ राजकीय हिशेब पुढे ठेवून लोकप्रतिनिधी गप्प बसत असल्याने या चौकातील अतिक्रमण सर्वसामान्य नागरिकांसाठी धोकादायक ठरले आहे.शहराच्या विकासाठी शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मिळतो. त्यामुळे नागरिक सुविधा पूर्ण करताना दीर्घकालीन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे. यामध्ये शासन, प्रशासन व लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते़ मात्र आजपर्यंतचा अनूभव लक्षात घेता यासाठी कोणत्याच हालचाली सुरु नसल्याने कोरपना येथील समस्या वाढतच आहेत़शहरातील अतिक्रमणाला अभय कुणाचे ?कोरपना शहरातील टिपू सुलतान चौकासोबतच अन्य मार्गांवरही मोठ्या प्रत्तमणात अतिक्रमण झाले आहे़ हे अतिक्रमण हटवून रस्त्याचे रुंदीकरण केल्यास शहराचा चेहरामोहरा बदलू शकतो. बाजारपेठ, शहरातील लहान दुकाने आणि सार्वजनिक संस्थाना चांगली शिस्त लागू शकते. परंतु लोकप्रतिनिधींनी हा विषय अद्याप गांभिर्याने घेतलाच नाही. तर दुसरीकडे अतिक्रमणाला अभय दिले जात आहे.