शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उर्दू प्राथमिक शाळेला अतिक्रमणाचा विळखा

By admin | Updated: August 12, 2016 01:14 IST

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक जाती धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी वरोरा शहरात नगर परिषदतर्फे प्राथमिक शाळा सुरू आहेत.

वरोरा नगरपालिकेचे दुर्लक्ष : विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो त्रास वरोरा : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक जाती धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी वरोरा शहरात नगर परिषदतर्फे प्राथमिक शाळा सुरू आहेत. मात्र त्यातील उर्दू प्राथमिक शाळा ही नगरसेवकांच्या व पदाधिकारांच्या दुर्लक्षतेमुळे अनेकांना ही आपलीच मालमत्ता असल्याचे वाटायला लागले आहे. या शाळेसमोर काहींनी अतिक्रमण करून जागा बळकावली आहे. मात्र याकडे नगरपरिषद बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, स्वछता विभाग व पोलीस प्रशासनही लक्ष द्यायला तयार नाही. काही नगरसेवकांनी अतिक्रमणाबाबत सभेत विषय मांडला तरी त्या विषयावर चर्चा होत नाही. आपला पाल्य हा शिकला पाहिजे, मोठा अधिकारी किंवा मोठा व्यावसायिक झाला पाहिजे, हे प्रत्येक पालकाला वाटत असते. पण आर्थिक परिस्थीती आणि महागाईमुळे काही पालक आपल्या पाल्यांना नगरपरिषदेच्या शाळेमध्ये पाठवतात. हातावर आणून पानावर खाण्याची परिस्थिती असणारे बहुसंख्य गरीबांचे मुले कधी अनवाणी पायाने तर कधी फाटलेले कपडे घालून का होईना, दररोज शाळेत हजेरी लावतात. ज्या शाळेत मुले शिक्षण घेतात त्या शाळेत जायला रास्ता नाही, पटांगण आहे पण पाऊस आला तर पटांगणाला स्विमिंग पुलाचे स्वरूप येते. शहरात नगरपरिषदेच्या नाकर्तेपणामुळे मोडकळीस आलेल्या अनेक शाळा आहेत. पण शहरातील मुख्य चौकातील म्हणजे नेहरू चौकातील उर्दू प्राथमिक शाळा हे चांगलेच उदाहरण आहे. अनेक मुस्लिम बांधवांचे पाल्य या शाळेत विद्याग्रहण करायला येतात. परंतु, शाळेच्या सुरक्षा भिंतीच्या काही अंतरावरच दुकाने असावे असा नियम असताना शाळेलाच लागूनच काही अवैद्य दारू विक्रेते दारू विक्रीचा व्यवसाय करतात. सट्टापट्टी घेणाऱ्यांची व लावणाऱ्यांची गर्दी या परिसरात नेहमीच असते. अतिक्रमणमुळे विध्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असून शाळेसमोर असणारे चिखल, कचरा, पाणी साचलेले आहे. एकीकडे स्वच्छतेच्या नावावर दुसरा क्रमांक पटकविणारी नगरपरिषद आणि दुसरीकडे स्वच्छतेच्या नावावर लखपती बनलेले ठेकेदार यांना शाळेसमोरचे चित्र दिसत नसावे. त्यामुळे परिसरात स्वच्छतेचे बारा वाजल्यासाचे चित्र पाहावयास मिळत आहे. शाळेसमोर हा सर्व प्रकार सुरु असताना वरोऱ्यातील राजकीय पक्ष गप्प का, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहे .त्यामुळे या समस्येकडे लक्ष देऊन परिसरात स्वछता आणि बेकायदेशीर अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिक करीत आहेत . (शहर प्रतिनिधी)