शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांगीण विकासाकरिता भावी पिढी सक्षम करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 00:06 IST

गावातील लहान मुले उद्याचे भावी नागरिक आहेत. त्यामुळे मुलांना सर्वांगाने सक्षम केल्यास गावाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.

ठळक मुद्देजितेंद्र पापळकर : पिपर्डा गावात स्वच्छता महोत्सव

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : गावातील लहान मुले उद्याचे भावी नागरिक आहेत. त्यामुळे मुलांना सर्वांगाने सक्षम केल्यास गावाचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. कोरपना तालुक्यातील पिपर्डा गावात आयोजित स्वच्छता महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते.स्वच्छता महोत्सवाचे प्रास्ताविक कोरपना पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी धनंजय साळवे यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते पार पडले. तर अध्यक्षस्थानी राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र मोहिते, सामाजिक कार्यकर्ता सय्यद आबिद अली आदी उपस्थित होते.पापळकर पुढे म्हणाले, मुलांचा विकास करावयाचा असेल, तर स्वच्छतेच्या सवयीसह कुपोषणमुक्त ग्राम होणे गरजेचे आहे. यासोबतच स्पर्धेच्या युगात गावातील तरुण समोर येण्यासाठी तरुणांना वाचणाची सवय लावली पाहिजे. वाईट व्यसनापासून दूर राहिले पाहिजे. उज्वल जीवन घडविण्यासाठी लहान पणापासूनच चांगल्या सवयीचा स्विकार केला पाहिजे, असे ते म्हणाले. तसेच पिपर्डा गावातील शाश्वत स्वच्छता, गुडमार्निंग पथकासह गावात राबविलेल्या सर्व उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. राजुरा विधानसभा क्षेत्राचे आ. संजय धोटे यांनी जीवनमान उंचावण्याकरिता सर्वांनी स्वच्छता राखणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केले. जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मोहिते म्हणाले, सकारात्मक दृष्टीने सर्वांनी विचार केल्यामुळेच आज गावात शाश्वत स्वच्छता निर्माण झाली आहे. पुढेही गावकऱ्यांनी असेच कार्य करावे.यावेळी नायब तहसीलदार मडावी, कृषी अधिकारी देवनाडे, स्वच्छ भारत मिशनचे माहिती शिक्षण संवाद तज्ज्ञ कृष्णकांत खानझोडे, पिपर्डा ग्रामपंचायतचे सरपंच चंद्रभान मडावी, धानोली ग्रामपंचायतचे सरपंच विजय रणदिवे, विस्तार अधिकारी जिवन प्रधाण, प्रविण मस्के, खुशाल राठोड, नगरसेवक सोयल अली, रमेश मालेकर उपस्थित होते.यावेळी गावात शाश्वत स्वच्छता राखणाऱ्या जेष्ठ नागरिकांचा व गुडमार्निग पथकाच्या तरुणांचा सत्कार करण्यात आला. संचालन व आभार सय्यद आबिद अली यांनी मानले.