शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

वेतनाअभावी एम्टा कामगारांची उपासमार

By admin | Updated: May 22, 2015 01:21 IST

सुप्रिम कोर्टाने २०१४ मध्ये दिलेल्या निर्णयामध्ये देशातील २१८ कोल ब्लॉक रद्द करण्यात आले होते.

भद्रावती: सुप्रिम कोर्टाने २०१४ मध्ये दिलेल्या निर्णयामध्ये देशातील २१८ कोल ब्लॉक रद्द करण्यात आले होते. त्यात बरांज येथील कर्नाटका एम्टा कोळसा खाणीतील चारही ब्लॉक रद्द करण्यात आले. परिणामी या खाणीत कामावर असलेल्या स्थायी व अस्थायी ७७५ कामगारांना एप्रिल महिन्यापासून वेतन देण्यात आले नाही. या कामगारांचा वसाहतीतील वीज पुरवठा खंडित केल्याने या कामगारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. वीज पुरवठा नसल्याने मे महिन्याच्या रखरखत्या उन्हात कामगारांचे कुटुंब वसाहतीत राहत आहे. त्यांना उन्हाळ्यात उकाड्याचा सामना करीत दिवस काढावे लागत आहे. दिवसभर घरात उकाड्यात राहायचे आणि रात्रीच्यावेळी घराबाहेर मोेकळ्या जागेवर झोपायचे असा त्यांचा दिनक्रम सुरू आहे.आंघोळ व पिण्यासाठी पाणी नसल्याने पाण्यासाठी कामगारांच्या कुटुंबाला भटकंती करावी लागत आहे. लहान मुलांचे तर प्रचंड हाल होत आहेत. या खाणीची एजन्सी एम्टाकडून गेली असली तरी खाणीचा ब्लॉक कर्नाटक सरकारला पुन्हा भेटल्याने या प्रशासनाने मात्र कामगाराकडे दुर्लक्ष केले आहे.बरांज येथे कर्नाटक पॉवर कंपनी लिमिटेड या कंपनीने कोळसा उत्खनाचे काम २००८ मध्ये कर्नाटका एम्टा या एजन्सीला दिले होते. मात्र ही कंपनी सुरुवातीपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. या कंपनीने शासनाच्या निर्णयानुसार कोणतीही रितसर परवानगी न घेता खाण सुरू केली. ते करताना बरांज गावाचे पुनर्वसन करण्यात आले नाही. याविरुद्ध आंदोलन करुन राजकीय पुढाऱ्यांनी आपली पोळी शेकून घेतलीय मात्र अजुनही येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला नाही.कर्नाटका एम्टाच्या या बेलगाम कारभारामुळे सर्वोच्च न्यायालयाने खाणीतील एक ते चार असे सर्व ब्लॉक रद्द केले. एम्टा कंपनीला ३१ मार्च २०१५ पासून खाणीचे काम बंद करण्याचे आदेश देण्यात आले. एम्टा कंपनीचे काम बंद झाल्यानंतर पुन्हा बरांज येथील चार ब्लॉक कर्नाटक सरकारला पुन्हा मिळाले. मात्र अजुनही कर्नाटक सरकारकडून कोळशाचे उत्खनन करण्यात आले नसून प्रशासनसुद्धा नेमण्यात आले नाही. या खाणीत काम मिळेल अशी आशा असल्याने कामगार मात्र वसाहत सोडून गेले नाही. एम्टा कंपनीने कामगारांना एप्रिल महिन्यापासून वेतन देणे बंद केले. वसाहतील विद्युत पुरवठा खंडीत केला. एम्टा एजन्सीच्या माध्यमातून एम्टा खाणीत हे कामगार काम करीत होते. मात्र आता कर्नाटक सरकारसुद्धा या कामगारांकडे लक्ष देत नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. (शहर प्रतिनिधी)