शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

दारूच्या रिकाम्या बाटल्यांमुळे भद्रावतीच्या नाल्या तुंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:32 IST

भद्रावती : नगर परिषद सफाई कामगारांना रविवारी नालेसफाईचे काम चालू असताना शहरातील टप्प्यावरील नालीमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा जवळपास ...

भद्रावती

: नगर परिषद सफाई कामगारांना रविवारी नालेसफाईचे काम चालू असताना शहरातील टप्प्यावरील नालीमध्ये दारूच्या रिकाम्या बाटल्यांचा जवळपास सात ते आठ ठिकाणी खच पडून असल्याचे आढळून आले. एका ठिकाणी जवळपास ५०० ते ६०० बाटल्या होत्या. दारूच्या रिकाम्या बाटल्यांमुळे नाल्या तुंबल्या असून सांडपाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे सफाई कामगारांचे म्हणणे आहे.

दर महिन्याला नालेसफाईचे काम केले जाते. प्रत्येक महिन्याला मुख्यत्वेकरून टप्पा परिसरातील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून येतात.

दारूबंदी असलेल्या जिल्ह्याच्या एका गावातील एका भागात जर ही अवस्था असेल, तर संपूर्ण जिल्ह्यात काय अवस्था असेल, याचा विचार न केलेलाच बरा.

भद्रावती ते चंद्रपूरकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या आयुध निर्माणीच्या भिंतीपाशी दारूच्या रिकाम्या बाटल्यांचे असेच खच पडून राहतात.

दारूच्या रिकाम्या बाटल्यांमुळे नाल्या बुजल्या गेल्याने सांडपाणी वाहू शकत नाही. दारूच्या बाटल्यांमुळे पावसाळ्यात शहरी भागात पंचशीलनगर, घुटकाळा येथील नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याच्या घटना घडल्या आहेत. या प्रकारावर निर्बंध घालणे जरुरी आहे, असे पाणीपुरवठा सभापती चंद्रकांत खारकर यांचे म्हणणे आहे.