शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

वेकोलि प्रकल्पग्रस्तांना शैक्षणिक पात्रतेनुसार मिळणार रोजगार

By admin | Updated: March 21, 2017 00:39 IST

वेकोलिमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सतत प्रयत्न व संघर्ष केल्यानंतर हा गुंतागुंतीचा व बऱ्याच अवधीपासून लोंबकळणारा ...

हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना यश : प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंद चंद्रपूर : वेकोलिमध्ये शैक्षणिक अर्हतेनुसार रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी सतत प्रयत्न व संघर्ष केल्यानंतर हा गुंतागुंतीचा व बऱ्याच अवधीपासून लोंबकळणारा प्रश्नही ना. अहीर यांच्या माध्यमातून मार्गी लागल्याने नव्याने प्रकल्पग्रस्त म्हणून वेकोलिमध्ये रूजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार नोकरी देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या निर्णयामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या शिक्षणाचा सन्मान ठेवत त्यांच्या पात्रतेनुसारच नोकरी देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंद निर्माण झाला आहे.त्यामुळे वेकोलि प्रकल्पग्रस्तांनी ना. अहीर यांचे अभिनंदन करून आभार मानले आहे.यापूर्वी वेकोलि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनीला वाढीव मोबदला, प्रकल्पग्रस्तांना विसंगती असलेल्या नियमात बदल करून न्यायोचित मार्गाने नोकऱ्या मिळवून देण्यात केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांना यश आले होते. त्यानंतर आता कोल इंडिया लिमीची सब्सीडी वेकोलि प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार आजतागायत काम देण्यात येत नव्हते. बहुतांशी नव्याने नियुक्त होणाऱ्या वेकोलि प्रकल्पग्रस्तास जनरल मजदूर कॅटेगरी-१ या पदावरच समावून घेतले जात होते. सदर प्रकार अन्यायी असल्याने ना. हंसराज अहीर यांनी ही बाब कोळसा मंत्रालय कोल इंडिया तसेच वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे शैक्षणिक अर्हतेनुसारच संबंधित प्रकल्पग्रस्तांना वेकोलि प्रबंधनात तत्सम पदावर सामावून घेण्यात यावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. अनेक बैठकांच्या माध्यमातून त्यांनी हा प्रश्न उपस्थित करून संबंधिताने लक्ष वेधले होते. अखेर त्यांच्या या भूमिकेवर शिक्कामोर्तब करून वेकोलिच्या फंक्शनल डायरेक्टरांच्या ६९४ व्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यास कोल इंडिया व वेकोलिला बाध्य केले. त्यामुळे या निर्णयामुळे वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या शिक्षणाचा सन्मान होवून त्यांच्या पात्रतेनुसारच आता नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.तांत्रिक शिक्षण, आयटीआय, डिप्लोमाधारक, अभियांत्रिकी यासारख्या पदवीधारकांना तसेच बी.ए. व तत्सम पदवीधारकांना त्याचबरोबर दहावी इयत्ता पास व यापेक्षा अधिक शैक्षणिक अर्हता असलेल्या व ३५ वर्ष पेक्षा कमी वयोमर्यादा असणाऱ्यांची सुरक्षाकर्मी म्हणून प्रकल्पग्रस्तांची वेकोलिमध्ये नियुक्ती होणार असून ही निवड ऐच्छिक स्वरूपाची ठेवण्यात आली आहे. हा निर्णय हंसराज अहीर यांच्या प्रयत्नातून घेतल्या गेल्याने वणीचे आ. संजय रेड्डी बोदकुरवार, राजुऱ्याचे आमदार अ‍ॅड. संजय धोटे, चंद्रपूरचे आमदार नाना शामकुळे, आर्णीचे आमदार राजू तोडसाम, पूर्व पालकमंत्री संजय देवतळे, विजय राऊत, व प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आभार मानले. (नगर प्रतिनिधी)