शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

मनरेगाच्या 1197 कामांवर 7 हजार 291 मजुरांना रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 05:00 IST

जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवर उदरनिर्वाह करतात. त्यावरच मजुरांना हंगामी रोजगार उपलब्ध होतो. रब्बी हंगामातून मजुरांना पुरेसा मिळणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील मजूर कोरोनापूर्वी विविध शहरात रोजगासाठी गेले होते. लॉकडाऊन उठविल्यानंतर हे मजूर आपापल्या गावात परत आले. त्यामुळे रोजगार हमी योजनेतंर्गत कामे सुरू होणार की नाही, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला.

ठळक मुद्देजिल्ह्यातील चित्र : लाॅकडाऊन कालावधीत मजुरांना मिळाला आधार

n  लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोनाने ग्रामीण भागातील नागरिकांना संकटात ढकलल्याच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना जिल्ह्यात मोठा आधार ठरला आहे. सध्या एक हजार १९७ कामे सुरू असून त्यावर ७ हजार २९१ मजुरांना रोजगार मिळाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश नागरिक शेतीवर उदरनिर्वाह करतात. त्यावरच मजुरांना हंगामी रोजगार उपलब्ध होतो. रब्बी हंगामातून मजुरांना पुरेसा मिळणे शक्य नाही. त्यामुळे ग्रामीण व आदिवासी भागातील मजूर कोरोनापूर्वी विविध शहरात रोजगासाठी गेले होते. लॉकडाऊन उठविल्यानंतर हे मजूर आपापल्या गावात परत आले. त्यामुळे रोजगार हमी योजनेतंर्गत कामे सुरू होणार की नाही, हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात चार हजार मजुरांना रोजगार मिळाला होता. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी सूचना दिल्याने तातडीने मनरेगाची कामे मंजूर करण्यात आली. जिल्ह्यात ८१० ग्रामपंचायतींतर्गत एक हजार १९७ कामे सुरू आहेत. या कामावर ७ हजार २९१ मजुरांना रोजगार मिळाला आहे.  मनरेगा कामासाठी शासनाकडून पात्र व्यक्तिंना जाॅबकार्ड देण्यात आले. कार्डधारकांनी कामाची मागणी केल्यास ग्रामपंचायतीमध्ये चर्चा होते. अधिकाऱ्यांना अहवाल पाठविल्यानंतर  कामाला मंजुरी दिली जाते. यंदा संकटात मनरेगाने मोठी मदत केली आहे.

तीन तालुक्यात सर्वाधिक कामे सुरूब्रह्मपुरी, नागभीड व सिंदेवाही तालुक्यात  केली जात आहेत. नागभीड तालुक्यात १ हजार ९३४, सिंदेवाही ७५६ व ब्रह्मपुरी तालुक्यात १ हजार १३ मजुरांना रोजगार मिळाला आहे. बल्लारपूर, भद्रावती, चंद्रपूर व राजुरा तालुक्यात तुलनेने कमी कामे मंजूर झाली आहेत. मनरेगाच्या ११९७ कामांवर ७ हजार २९१ मजुरांना रोजगार झाली आहेत. चिमूर, सावली या तालुक्यात कामांना मंजुरी देण्यात आली. त्यामुळे रोजगार उपलब्ध झाला. 

ग्रामीण भागात शेतीपासूनच रोजगार मिळतो. मात्र, त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे रोजगार हमी योजनेची कामे वाढविणे गरजेचे आहे. कोरोनामुळे मजुरांचे हाल झाले. उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला. मनरेगामुळे आधार मिळू शकतो.- नानाजी बिरादार, रा.  येरमी येसापूर ता. जिवती

 

टॅग्स :jobनोकरी