शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
2
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
3
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
4
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
5
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
6
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
7
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
8
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
9
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
10
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
11
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
12
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
13
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
14
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
15
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
16
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
17
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
18
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
19
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
20
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!

कर्नाटका एम्टामधील कामगारांची आर्थिक कोंडी

By admin | Updated: August 21, 2015 01:40 IST

गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीतील कार्यरत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आल्याने मिळेल ते काम करण्याचे संकट त्यांच्यावर ओढवले आहे.

भद्रावती : गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेल्या कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीतील कार्यरत कर्मचाऱ्यांवर उपासमारीची पाळी आल्याने मिळेल ते काम करण्याचे संकट त्यांच्यावर ओढवले आहे.यातील कामगार मोल मजुरीसह मच्छी, भुट्टा, मुंगफल्ली, फळे, भंगार, भाजीपाला अशा प्रकारची कामे करुन कोळसा खाण सुरु होईल या आशेवर एक- एक दिवस पुढे रेटत आहे. खाणीत पीसी आॅपरेटर या पदावर काम करुन २० ते २५ हजार कमविणारा आज भुट्टे विकून तीन ते चार हजार कमवत आहे. बरांज मोकासा येथे असलेल्या या कोळसा खाणीत जवळपास ८०० कामगार कार्यरत होते. यात बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, मध्यप्रदेशन, पश्चिम बंगाल या बाहेरील राज्यासह उर्वरित महाराष्ट्र राज्यातील कामगार कार्यरत होते. या खाणीत पीसी आॅपरेटर, ड्रायव्हर, इलेक्ट्रीशीएन फिटर, वेल्डर, सुरक्षा कर्मचारी, वायरमन, हेल्पर, लेबर या पदावर हे कामगार काम करीत होते. प्रती दिवशी आठ तास कामाच्या मोबदल्यात महिन्याला त्यांना २० ते २५ हजार रुपये पगार मिळत होता. कंपनीने त्यांना राहण्याकरिता खाणी शेजारीच वसाहत बांधली. त्यात वीज, पाणी आणि इतर मुलभूत सुविधासुद्धा पुरविल्या होत्या. त्यांच्या मुलांना परिसरातील शाळा, कॉलेजमध्ये जाण्या- येण्याकरिता स्कूलबसची व्यवस्था, कामगारांना ने- आण करण्याकरिता स्टार बसची व्यवस्था, कामगारांसह त्यांच्या कुटुंबियांच्या उपचाराची जबाबदारीदेखील कंपनीने घेतली होती. परंतु कंपनी बंद झाल्यानंतर देण्यात येणाऱ्या संपूर्ण सुविधा काढून घेण्यात आल्या. ‘ नो वर्क- नो पे’ या नियमानुसार कामगारांना आर्थिक मोबदला दिला जात नाही. त्यामुळे याठिकाणी कार्यरत काही बाहेरील कर्मचारी कंपनी सुरु होईल, या आशेवर येथेच राहात असून उदरनिर्वाहासाठी ते मिळेल ते काम करीत आहे. काही कामगारांनी स्वत:चा छोटेखानी चालता फिरता व्यवसाय सुरु केला आहे. तरीही ते आर्थिक कोंडीत आहेत. (शहर प्रतिनिधी)