शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी समस्या ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 22:14 IST

जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत असणाऱ्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेत रूजु करण्यात आले. परंतु त्यांना अद्याप स्थायी करण्यात आले नाही. सार्वजनिक विभाग अंतर्गत येणारे हे कर्मचारी सेवा देऊनही त्यांना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात सामावून घेतले नाही. त्यामुळे मागील एक वर्षापासून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. दरम्यान, समायोजन न केल्याने बुधवारपासून दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा कर्मचाºयांनी दिला आहे.

ठळक मुद्देकामकाजावर बहिष्कार टाकणार : वैद्यकीय महाविद्यालयात समायोजनाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा सामान्य रूग्णालयात कार्यरत असणाऱ्या सुमारे २५० कर्मचाऱ्यांकडून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सेवेत रूजु करण्यात आले. परंतु त्यांना अद्याप स्थायी करण्यात आले नाही. सार्वजनिक विभाग अंतर्गत येणारे हे कर्मचारी सेवा देऊनही त्यांना राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागात सामावून घेतले नाही. त्यामुळे मागील एक वर्षापासून कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. दरम्यान, समायोजन न केल्याने बुधवारपासून दैनंदिन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात आले. मात्र, या महाविद्यालयाकरिता कर्मचाऱ्यांचा नवीन आकृतीबंद तयार करून भरती करण्यात आली नाही. सवंर्गनिहाय पदांना मान्यता देऊन स्वतंत्र आणि कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केली. परंतु, राज्यशासनाने मागणीची दखल न घेता जिल्हा सामान्य रूग्णालयातील स्थायी कर्मचाºयांना वैद्यकीय महाविद्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आली.राज्य शासनाच्या वैद्यकीय आरोग्य शिक्षण विभागात वेतन मान्यतेसह सामावून घेतले नाही. वैद्यकीय महाविद्यालय हा विभाग राज्याच्या वैद्यकीय व उच्च शिक्ष मंत्रालय अंर्तगत आणि जिल्हा सामान्य रूग्णालय सार्वजनिक आरोग्य विभागाच्या कक्षेत येतो. या दोनही शिखर संस्थामध्ये विविध संवर्गातील पदे रिक्त आहे. अशा परिस्थितीत वैद्यकीय महाविद्यालयाला स्वतंत्र कर्मचारी आकृतीबंद तयार करून नियुक्ती करणे गरजे होते. परंतु जिल्हा सामान्य रूग्णालयातील कर्मचाºयांकडूनच वैद्यकीय महाविद्यालयाचे कामकाज चालविले जात आहे, असा आरोप कर्मचारी कृती संघटनेने केला आहे.रूग्णसेवेवर परिणाम होणार नाही -डॉ. मोरेजिल्हा सामान्य रूग्णालयातील स्थायी व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बुधवारी दैनदिन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निवेदनातून इशारा दिला. या आंदोलनादरम्यान रूग्णालयातील दैनंदिन कामकाजावर कोणताही परिणाम होऊ नये, याकरिता पर्यायी व्यवस्था करण्यात आली. वैद्यकीय महाविद्यालयातील ५० विद्यार्थी, कंत्राटी २० व अन्य ३० कर्मचाऱ्यांना आरोग्य सेवा देण्यास बोलाविण्यात आले. यामुळे उपचारावर कोणताही अनिष्ठ परिणाम होणार नाही, असा दावा वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांनी केला.