शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
5
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
6
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
7
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
8
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
9
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
11
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
12
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
13
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
14
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
15
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
16
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
17
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
18
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
19
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
20
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत

केवळ १२० शेतकऱ्यांना तातडीचे कर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:37 IST

एक महिन्यापूर्वी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची घोषणा होताच ज्या शेतकऱ्यांवर कर्ज होते, ...

पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठ : गतवर्षीची मदत अद्यापही मिळाली नाहीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : एक महिन्यापूर्वी राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली. कर्जमाफीची घोषणा होताच ज्या शेतकऱ्यांवर कर्ज होते, त्यांना खरिप लागवडीसाठी १० हजार रूपयांचे कर्ज तातडीने उपलब्ध करून देण्याचे परिपत्रक काढण्यात आले. मात्र मागणीच नसल्याचे कारण देत आतापर्यंत जिल्ह्यातील केवळ १२० शेतकऱ्यांना तातडीच्या १० हजार रूपये कर्जाचे वाटप करण्यात आले आहे. दहा हजार रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आलेल्यांमध्ये विदर्भ कोकण ग्रामीण बँकेने सर्वाधिक ११२ शेतकऱ्यांना तर जिल्हा मध्यवर्ती बँकेने केवळ ८ अशा केवळ १२० शेतकऱ्यांना प्रत्येकी दहा हजार रूपये प्रमाणे १ कोटी २० लाखांचे कर्ज वाटप केले आहे. तातडीचे दहा हजार रूपयाचे कर्ज देण्यास बँक तयार आहेत. मात्र शेतकरीच कर्जाची मागणी करीत नसल्याचा जिल्हा उपनिंबधक कार्यालयाने म्हटले आहे. दहा हजार रूपयाचे तातडीचे कर्ज मिळत असले तरी यासाठी शासनाचे निकष कठोर असल्याने कर्जासाठी शेतकरीच मागणी करीत नसल्याचे यावरून दिसून येत आहे. जिल्ह्यात सर्वच भागात खरिपाच्या हंगामात कापूस, धान, सोयाबीन, तूर व इतर पिकांची लागवड केली जाते. काही तालुक्यात कापूस उत्पादक तर काही तालुक्यात धान उत्पादक शेतकरी जास्त आहेत. मात्र यावर्षी प्रधानमंत्री पीक विमा योजनेतून कापूस पिकासाठी बल्लारपूर, मूल, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांत संताप पसरला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत भात, ज्वारी, सोयाबीन, तूर, कापूस, मूंग व उडीद पिकांचा समावेश केला आहे. मात्र यावर्षीच्या अधिसूचित पिकाच्या यादीतून कापूस पिकाला वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे. पीक विम्याकडे शेतकऱ्यांची पाठपीक विमा योजनेसाठी शासनाने ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. परंतु, गतवर्षी ज्या शेतकऱ्यांनी पिकाचा विमा काढला होता, त्यातील अनेक शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतरही अद्यापही मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे पीक विमा काढण्याकडे यावर्षी शेतकऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे. गतवर्षी कर्जदार शेतकऱ्यांमधून कापूस, सोयाबीन, धान व तूर पिकांसाठी जिल्ह्यातील ६८ हजार ७१९ शेतकऱ्यांनी तर बिगर कर्जदार गटातून ६९ हजार ५७६ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता. या विमा हप्त्याची रक्कम १२ कोटींच्या घरात आहे. मात्र यातील अनेक शेतकऱ्यांचे नुकसान होवूनही पीक विम्याची रक्कम मिळालेली नाही. यावर्षीच्या पीक विम्याबाबत आकडेवारी मागितली असता, उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. पिकांवर अळीचा प्रादुर्भावदोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असून शेतकरी सुखावला आहे. मात्र कापूस, तूर, धान पिकांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतपर्यंत जिल्ह्यात ५४ टक्के पेरणी आटोपली असून काही ठिकाणी रोवणीची कामे सुरू आहेत. मात्र जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प अद्यापही कोरडे असून मोठ्या पावसाची प्रतीक्षाच आहे. कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांत संभ्रम कायमशासनाने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर कित्येकदा कर्जमाफीचे निकष बदलले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला होता. कर्जमाफीचा लाभ आपल्याला मिळणार की नाही, याबाबत समजदार व्यक्तींकडून माहिती जाणून घेताना शेतकरी दिसत होते. परंतु कर्जमाफीचे निकष अद्यापही अनेक शेतकऱ्यांना समजले नसल्याने त्यांच्यात कर्जमाफीविषयी संभ्रम कायम आहे.