शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
2
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
3
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
4
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
5
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
6
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
7
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
8
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
9
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
10
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
11
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
12
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
13
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
14
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
15
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
16
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
17
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
18
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
19
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
20
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा

डोंगरगावातील आंब्यांची खवय्यांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:40 IST

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त आहेत. अशा उष्ण वातावरणात आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगरगाव हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे शहरातील ग्राहकांना नेहमीच भुरळ पाडतात.

ठळक मुद्देगावरान आंब्यांची मागणी वाढली : आंब्यांसाठी यंदा पोषक हवामान

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त आहेत. अशा उष्ण वातावरणात आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगरगाव हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे शहरातील ग्राहकांना नेहमीच भुरळ पाडतात.आंबा म्हटले की, तोंडाला पाणी सुटते. मग त्या कैऱ्या असोत की परिपक्व. पिकलेले आंबे तर प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात. आंबे हवेहवेसे वाटत असले तरी झाड लावण्याची कुणी तसदी घेत नाही. त्यामुळे हा रानमेवा हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी आंब्यांच्या झाडांची लागवड करून त्याला व्यावसायिक पद्धतीने संगोपण केले. त्यामुळे गावरान आंब्यांचे गाव म्हणून डोगरगावची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे.सध्या तप्त उन्हाळा सुरू आहे. अंगाची लाहीलाही होत असताना गावरान आंबा चाखल्यास मोठा आनंद मिळतो. डोंगरगाव हे गाव शहरापासून पाच किमी अंतरावर आहे. गावातील सर्वच नागरिक शेती करतात. येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. धानासोबतच भाजीपाल्याच्या उत्पादनासाठीही हे गाव प्रसिद्ध आहे. परंतु, मागील काही वर्षात डोंगरगाव हे दर्जेदार गावरान आंब्यांमुळे चर्चेत आले आहे. उमेश दिनकर पाथोडे, शिवदास रामदास पाथोडे, अशोक लहानू पाथोडे व अजय हिरामन कोसे आदींनी आपल्या शेतात रत्ना, दशेरी, लंगडा, केशर या प्रजातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. याशिवाय गावरान आंब्यांची झाडेही शेतात आहेत. या शेतकºयांकडे सुमारे १५० झाडे असल्याची माहिती पुढे आली. उत्पादित केलेले आंबे एवढे दर्जेदार असतात की, बाजारात केव्हा येतात, याची प्रतीक्षा शहरातील नागरिकांना लागून असते.आंबा पाडाला आल्यानंतर आंबा उत्पादकांचे जे नेहमीचे ग्राहक आहेत ते ग्राहक फोनवरूनच आपल्याला किती आणि केव्हा आंबे लागतील, याची सूचना देतात. त्याचबरोबर उर्वरित आंबे या उत्पादकांनी नुसते रस्त्याने फिरविले तरी हातोहात खपत असतात. बाजारातील रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकविलेल्या आंब्यांपेक्षा डोंगरगावचे आंबे केव्हाही बरे, अशा प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करतात. अनेकजण तर डोंगरगावला जाऊन आंबे खरेदी करतात. शेतकºयांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नगदी पिकांचा स्वीकार केला. यातून त्यांना आर्थिक लाभ होत आहे.

टॅग्स :Mangoआंबा