शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

डोंगरगावातील आंब्यांची खवय्यांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:40 IST

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त आहेत. अशा उष्ण वातावरणात आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगरगाव हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे शहरातील ग्राहकांना नेहमीच भुरळ पाडतात.

ठळक मुद्देगावरान आंब्यांची मागणी वाढली : आंब्यांसाठी यंदा पोषक हवामान

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त आहेत. अशा उष्ण वातावरणात आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगरगाव हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे शहरातील ग्राहकांना नेहमीच भुरळ पाडतात.आंबा म्हटले की, तोंडाला पाणी सुटते. मग त्या कैऱ्या असोत की परिपक्व. पिकलेले आंबे तर प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात. आंबे हवेहवेसे वाटत असले तरी झाड लावण्याची कुणी तसदी घेत नाही. त्यामुळे हा रानमेवा हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी आंब्यांच्या झाडांची लागवड करून त्याला व्यावसायिक पद्धतीने संगोपण केले. त्यामुळे गावरान आंब्यांचे गाव म्हणून डोगरगावची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे.सध्या तप्त उन्हाळा सुरू आहे. अंगाची लाहीलाही होत असताना गावरान आंबा चाखल्यास मोठा आनंद मिळतो. डोंगरगाव हे गाव शहरापासून पाच किमी अंतरावर आहे. गावातील सर्वच नागरिक शेती करतात. येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. धानासोबतच भाजीपाल्याच्या उत्पादनासाठीही हे गाव प्रसिद्ध आहे. परंतु, मागील काही वर्षात डोंगरगाव हे दर्जेदार गावरान आंब्यांमुळे चर्चेत आले आहे. उमेश दिनकर पाथोडे, शिवदास रामदास पाथोडे, अशोक लहानू पाथोडे व अजय हिरामन कोसे आदींनी आपल्या शेतात रत्ना, दशेरी, लंगडा, केशर या प्रजातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. याशिवाय गावरान आंब्यांची झाडेही शेतात आहेत. या शेतकºयांकडे सुमारे १५० झाडे असल्याची माहिती पुढे आली. उत्पादित केलेले आंबे एवढे दर्जेदार असतात की, बाजारात केव्हा येतात, याची प्रतीक्षा शहरातील नागरिकांना लागून असते.आंबा पाडाला आल्यानंतर आंबा उत्पादकांचे जे नेहमीचे ग्राहक आहेत ते ग्राहक फोनवरूनच आपल्याला किती आणि केव्हा आंबे लागतील, याची सूचना देतात. त्याचबरोबर उर्वरित आंबे या उत्पादकांनी नुसते रस्त्याने फिरविले तरी हातोहात खपत असतात. बाजारातील रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकविलेल्या आंब्यांपेक्षा डोंगरगावचे आंबे केव्हाही बरे, अशा प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करतात. अनेकजण तर डोंगरगावला जाऊन आंबे खरेदी करतात. शेतकºयांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नगदी पिकांचा स्वीकार केला. यातून त्यांना आर्थिक लाभ होत आहे.

टॅग्स :Mangoआंबा