शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

डोंगरगावातील आंब्यांची खवय्यांना भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:40 IST

उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त आहेत. अशा उष्ण वातावरणात आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगरगाव हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे शहरातील ग्राहकांना नेहमीच भुरळ पाडतात.

ठळक मुद्देगावरान आंब्यांची मागणी वाढली : आंब्यांसाठी यंदा पोषक हवामान

घनश्याम नवघडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाच्या काहीलीने नागरिक त्रस्त आहेत. अशा उष्ण वातावरणात आंबे खाण्याचा आनंद काही वेगळाच असतो. डोंगरगाव हे गावरान आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील आंबे शहरातील ग्राहकांना नेहमीच भुरळ पाडतात.आंबा म्हटले की, तोंडाला पाणी सुटते. मग त्या कैऱ्या असोत की परिपक्व. पिकलेले आंबे तर प्रत्येकालाच हवेहवेसे वाटतात. आंबे हवेहवेसे वाटत असले तरी झाड लावण्याची कुणी तसदी घेत नाही. त्यामुळे हा रानमेवा हळूहळू कमी होताना दिसत आहे. मात्र डोंगरगाव येथील शेतकऱ्यांनी आंब्यांच्या झाडांची लागवड करून त्याला व्यावसायिक पद्धतीने संगोपण केले. त्यामुळे गावरान आंब्यांचे गाव म्हणून डोगरगावची तालुक्यात ओळख निर्माण झाली आहे.सध्या तप्त उन्हाळा सुरू आहे. अंगाची लाहीलाही होत असताना गावरान आंबा चाखल्यास मोठा आनंद मिळतो. डोंगरगाव हे गाव शहरापासून पाच किमी अंतरावर आहे. गावातील सर्वच नागरिक शेती करतात. येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे. धानासोबतच भाजीपाल्याच्या उत्पादनासाठीही हे गाव प्रसिद्ध आहे. परंतु, मागील काही वर्षात डोंगरगाव हे दर्जेदार गावरान आंब्यांमुळे चर्चेत आले आहे. उमेश दिनकर पाथोडे, शिवदास रामदास पाथोडे, अशोक लहानू पाथोडे व अजय हिरामन कोसे आदींनी आपल्या शेतात रत्ना, दशेरी, लंगडा, केशर या प्रजातीच्या आंब्याच्या झाडांची लागवड केली आहे. याशिवाय गावरान आंब्यांची झाडेही शेतात आहेत. या शेतकºयांकडे सुमारे १५० झाडे असल्याची माहिती पुढे आली. उत्पादित केलेले आंबे एवढे दर्जेदार असतात की, बाजारात केव्हा येतात, याची प्रतीक्षा शहरातील नागरिकांना लागून असते.आंबा पाडाला आल्यानंतर आंबा उत्पादकांचे जे नेहमीचे ग्राहक आहेत ते ग्राहक फोनवरूनच आपल्याला किती आणि केव्हा आंबे लागतील, याची सूचना देतात. त्याचबरोबर उर्वरित आंबे या उत्पादकांनी नुसते रस्त्याने फिरविले तरी हातोहात खपत असतात. बाजारातील रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकविलेल्या आंब्यांपेक्षा डोंगरगावचे आंबे केव्हाही बरे, अशा प्रतिक्रिया ग्राहक व्यक्त करतात. अनेकजण तर डोंगरगावला जाऊन आंबे खरेदी करतात. शेतकºयांनी पारंपरिक शेतीवर अवलंबून न राहता नगदी पिकांचा स्वीकार केला. यातून त्यांना आर्थिक लाभ होत आहे.

टॅग्स :Mangoआंबा