शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अनुकंपाधारकांना नोकरीत सामावून घ्या

By admin | Updated: August 22, 2015 01:39 IST

वनविभागाच्या सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वावर नोकरीवर सामावून घेण्यासाठी ....

वनमंत्र्यांना साकडे : शिष्टमंडळाने दिले निवेदनकोठारी : वनविभागाच्या सेवेत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला अनुकंपा तत्वावर नोकरीवर सामावून घेण्यासाठी अनुकंपाधारकांनी कोठारीत स्वातंत्र्यदिनी झालेल्या कार्यक्रमात साकडे घातले. त्यांना विनवनी करून कुटुंबाची होत असलेली वाताहात थांबविण्यासाठी एकाला तरी नोकरीवर घ्यावे अशी विनंती केली. तसेच निवेदनही देण्यात आले.वनविभागात कार्यरत असताना आपले कर्तव्य बजावत असताना आलेल्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होते. घरचा कर्ता पुरूष एकाएकी निघून गेल्याने कुटुंबाची वाताहात होते. घरी दारिद्र निर्माण होवून मुलांचा शैक्षणिक, कौटुंबिक विकास थांबतो. परिणामी तरुण नैराश्यापोटी वाममार्गाने लागतो. त्याचे गंभीर परिणाम कुटुंबावर होते. वनविभागात कार्यरत मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांनांना नोकरी देण्यासाठी शासन विचाराधिन नाही. अनुकंपाधारकाचे वय निघून जात आहे. तरीही त्यास शासनाकडून नोकरीची संधी दिल्या जात नाही. ेकवळ निरनिराळे नियम बनवून अनुकंपाधारकाची फरफट सुरू आहे. कोणते ना कोणते कारण पुढे करून अनुकंपाधारकांना डावलण्याचा शासनाचा कट आहे. वनविभागात अनेक रिक्त पदे आहेत. ते वेळोवेळी भरले जातात. मात्र अनुकंपाधारकांना १० टक्के राखीव असल्याचे सांगण्यात येते. मात्र आजपर्यंत अनुकंपाधारकांना कुठेही संधी देण्यात आली नाही.सध्या राज्यात चंद्रपूर जिल्ह्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत. त्यांना अनुकंपाधारक अनेकदा भेटले. आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. मात्र त्यांच्याकडून अजूनपर्यंत योग्य प्रतिसाद मिळत नसल्याने अनुकंपाधारकांत तीव्र नाराजी पसरली आहे. वनमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने त्यांनी अनुकंपाधारकांच्या समस्या अग्रक्रमाने सोडवून कुटुंबाची होत असलेली वाताहत थांबवून कुटुंबातील एकाला नोकरीत सामावून घेवून कुटुंबाला नवसंजीवनी द्यावी, यासाठी कोठारी येथे झालेल्या कार्यक्रमात अनुकंपाधारकांनी वनमंत्र्यांना साकडे घातले. (वार्ताहर)