शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
3
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
4
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
5
लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
7
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
8
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
9
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
10
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
11
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
12
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
13
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
15
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
16
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
17
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
18
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
19
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
20
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा

अचानक बदल्या झाल्याने कर्मचाऱ्यांत संताप

By admin | Updated: August 25, 2014 23:54 IST

एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश सोमवारी धडकल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सत्राच्या मधातच बदल्या झाल्याने

चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्याचे आदेश सोमवारी धडकल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. सत्राच्या मधातच बदल्या झाल्याने अनेकांची चिंता वाढली आहे. त्यामुळे किमान यावर्षासाठी तरी बदल्या रद्द कराव्या, अशी मागणी कर्मचारी करीत आहे.शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या उन्हाळ्यात किंवा जुन महिन्यात अनेकवेळा होतात. बदल्यांमुळे कर्मचाऱ्यांना अडचण होणार नाही, याची खबरदारी घेतल्या जाते. विशेष म्हणजे, अनेक कर्मचाऱ्यांचे पाल्य शाळा, महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. आता सत्राच्या मध्यातच बदल्या झाल्याने कर्मचाऱ्यांची मोठी फजीती होणार आहे. काही कर्मचाऱ्यांनी विनंती बदली मागितली होती. या कर्मचाऱ्यांचा कुठेही विचार न करता उलट त्यांची दूरवर बदली केली आहे. तर काही कर्मचाऱ्यांची मागील वर्षीच बदली झाली असतानाही त्यांचीही यावेळी बदली करण्यात आली आहे.उन्हाळ्याच्या दिवसामध्ये बदली झाली असती तर, पाल्यांचा दाखला सोयीनुसार घेता आला असता, आता मात्र पाल्य एकीकडे आणि पालक दुसरीकडे अशी अवस्था या कर्मचाऱ्यांची झाली आहे. त्यामुळे किमान यावर्षीसाठी बदली रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. (नगर प्रतिनिधी)