शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

अपहाराने ग्रासल्या नळ योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2016 01:39 IST

गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषद मार्फत गावागावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या.

२७ योजनांच्या तक्रारी : पाणी पुरवठा समितींच्या पदाधिकाऱ्यांविरूद्ध एफआयआरचंद्रपूर : गावकऱ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी जिल्हा परिषद मार्फत गावागावात ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या. या योजनांच्या देखभालीसाठी गावातच पाणी पुरवठा समित्या गठीत करण्यात आले. मात्र या समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आपले पोट भरण्यासाठी पाणी पुरवठा योजनांची पुरती वाट लावली आहे. जिल्ह्यातील २७ पाणी पुरवठा योजनांच्या विविध तक्रारी जिल्हा परिषदेला आल्या. तक्रारींची दखल घेत अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. यात चार योजनांत आर्थिक अफरातफर आढळल्याने पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष, सचिव व सदस्यांविरूद्ध पोलिसांत एफआयआर नोंदविण्यात आली आहे.ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषदेमार्फत गावागावात पाणी पुरवठा योजना सुरू आहेत. या योजनेद्वारे गावकऱ्यांची तहाण भागत आहे. योजनेमध्ये कोणत्याही समस्या उद्भवल्यास त्या दूर करण्यासाठी पाणी पुरवठा समिती गावात गठीत करून पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र पदाधिकाऱ्यांनी नळ योजनेत विविध समस्या दाखवून मोठा गैरव्यवहार केला आहे. विशेष म्हणजे या नळ योजना सन २००५ नंतर सुरू झाल्या आहेत. या अनेक नळ योजनांना दहा वर्षही झालेली नाही. पाणी पुरवठा योजनेच्या देखभालीसाठी जिल्हा परिषदेकडून ४० ते ४२ हजार रुपयाचा निधी प्रत्येक समित्यांना दिला जात आहे. मात्र समिती पदाधिकाऱ्यांनी या निधीचा दुरूपयोग करून स्वत:चेच पोट भरण्याचे काम केल्याने योजनेमध्ये गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या. या कामाची चौकशी करण्यात आली. (स्थानिक प्रतिनिधी)येथील सदस्यांवर गुन्हे दाखल जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केलेल्या प्रकरणात चार समिती पदाधिकाऱ्यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. यात गोंडपिपरी तालुक्याचे वडकुली, करंजी, नागभीड तालुक्यातील नवखडा व जिवती तालुक्यातील परमडोली येथील पाणी पुरवठा समितीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.या समितींच्या तक्रारीआर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी २७ गावातील नागरिकांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली आहे. यात करंजी, वडकुली, दाताळा, नवखळा, अंतरगाव, जानाळा, गांगलवाडी, परमडोली, सुमठाना, मरकागोंदी, कोठोडा, पाटण, मरकमेठा, पाटीगुडा, नंदप्पा, भुरी-येसापूर, टाटाकवडा, नागापूर, आंबेनेरी, साखरा, मजरा (रै), आठमुर्डी, येरखेडा व चिमूर तालुक्यातील जलस्वराज्य प्रकल्पाअंतर्गत केलेल्या कामाच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहे.