शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

सीएएविरुद्ध आंबेडकरी समाजही पुकारणार एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST

सिद्धार्थ विद्यालयाच्या सभागृहामध्ये खुशाल तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रा. नामदेव कन्नाके, डॉ. सिराज खान, आनंद एंगलवार, सुब्रोतो दत्ता, किशोर पोतनवार, अ‍ॅड. कपिल भगत, भारत थुलकर, हिराचंद बोरकुटे, अयुबभाई कच्छी आदींनी मार्गदर्शन केले. यासंदर्भात सर्वसमावेशित बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचेही ठरविण्यात आले.

ठळक मुद्देचंद्रपुरात पार पडली बैठक : संविधान संवर्धन समितीचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : केंद्र सरकारने लागू केलेल्या सीएए, एनआरसी, एनपीआर विरुद्ध देशभरात आंदोलने सुरु आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. मात्र आता संविधानाला वाचविण्यासाठी आंबेडकरी समाजही या कायद्याविरुद्ध रस्त्यावर उतरणार आहे. याससंदर्भात चंद्रपूर येथे संविधान संवर्धन समितीची बैठक पार पडली. यावेळी जोपर्यंत सीसीए, एनआरसी, एनआरपी कायदे केंद्र सरकार मागे घेणार नाही तोपर्यंत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.येथील सिद्धार्थ विद्यालयाच्या सभागृहामध्ये खुशाल तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये प्रा. नामदेव कन्नाके, डॉ. सिराज खान, आनंद एंगलवार, सुब्रोतो दत्ता, किशोर पोतनवार, अ‍ॅड. कपिल भगत, भारत थुलकर, हिराचंद बोरकुटे, अयुबभाई कच्छी आदींनी मार्गदर्शन केले. यासंदर्भात सर्वसमावेशित बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचेही ठरविण्यात आले.बैठकीला प्रा. धनंरजय मेश्राम, अनिल रामटेके, अ‍ॅड. रवींद्र मोटघरे, विद्याधर लाडे, गौरीशंकर टिपले, डॉ. प्रजेश घडसे, प्रा. रवी कांबळे, अ‍ॅड. कपिल भगत, अ‍ॅड. भिमराव रामटेके, बैजू शिंदे, प्रा. सुरेश पाटील, आनंद कवाडे, देशक खोब्रागडे, संतोष डांगे, प्रा. कोमल खोब्रागडे, रवींद्र उमाटे, शिरीष गोगुलवार यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधक उपस्थित होते. प्रास्ताविक बंडू नगराळे, संचालन अंकुश वाघमारे यांनी तर आभार सुरेश नारनवरे यांनी मानले.अशी करणार जनजागृतीएनआरसीवर बहिष्कार टाकण्यासाठी वार्डावार्डात तसेच जिल्हाभर १८ मार्चपर्यंत जागृती करण्यात येणार आहे. या दरम्यान, शहराच्या ठिकाणी परिषदा घेण्यात येणार आहे. सरकारने कायदे मागे न घेतल्यास १८ मार्चनंतर जिल्हास्तरावर महामोर्चे काढण्यात येणार आहे.या आहेत मागण्याकेंद्र सरकारने सीएए, एनआरसी कायदे मागे घ्यावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करावी, आदिवासींची त्यांच्या धर्मानुसार जनगणना करावी या मागण्यासुद्धा करण्यात येणार आहे. बिहारप्रमाणे महाराष्ट्र सरकारने एनआरसी, एनपीआर विरोधात ठराव पारित करण्यासाठी निवेदन देण्यात येणार आहे.