शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

ग्रामसेवकांचा प्रशासनाविरुद्ध एल्गार

By admin | Updated: November 2, 2016 00:53 IST

मागील सहा महिन्यांपासून ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत.या मागण्याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत ...

मासिक, त्रैमासिक बैठकीवर बहिष्कार : आजपासून असहकार आंदोलनचंद्रपूर : मागील सहा महिन्यांपासून ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत.या मागण्याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत चंद्रपूर जिल्हा ग्रामसेवक युनियनने २ नोव्हेंबरपासून जिल्हाभरातील पंचायत समितीसमोर असहकार आंदोलन पुकारले आहे.ग्रामसेवकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील अनेक महिन्यापासून ग्रामसेवक युनियनद्वारे पत्रव्यवहार सुरू होता. मात्र दखलच घेतली जात नाही, असा आरोप आहे. शासनाचा दूत या नात्याने ग्रामीण भागात विकासाचे कार्य करुनही प्रशासनाकडून असमानतेची वागणूक मिळत आहे, ग्रामसेवक प्रशासन व राजकीय पुढाऱ्याच्या मधे भरडला जात आहे. यातून ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्याचाही संघटनेचा आरोप आहे. वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार आणि वाटाघाटी करुनही समस्या कायम आहेत. त्यामुळे ग्रामसेवक युनियनने प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारीत असहकार आंदोलन करणार असल्याचे यापूर्वीच मुख्य कार्यपालन अधिकारी व ग्रामविकास मंत्रालयाला कळविले होते.निवेदनामध्ये मांडलेल्या समस्यापैकी सन २००९ पासून ग्रामसेवक संवर्गाला सेवेत कायम न करणे, कंत्राटी ग्रामसेवकाची अनामत रक्कम परत न करणे, डीसीपीएसची कपात केलेल्या रकमेच्या पावत्या न मिळणे, महात्मा गांधी, मग्रारोयोची कामे केवळ ग्रामसेवकावर थोपविणे, ग्रामसेवकाने केलेल्या कामावर नजरचुकीने अनियमितता झाल्यास ग्रामसेवकावर कारवाई करणे, वैयक्तिक शौचालयाच्या बांधकांमाची ग्रामसेवकावर सक्ती न करणे, कालबद्ध पदोन्नती प्रथम, द्वितीय लागू न करणे, ग्रामसेवकाचे सेवापुस्तके अद्यावत करणे, चिमूर पंचायत समितीत ग्रामसेवकाचे असहकार आंदोलन सुरु आहे. त्यावर कुठलीही कारवाई न करणे, प्रत्येक तालुक्यात ई टेंडरीगची सुविधा करणे, चिमूर पंचायत समितीच्या ग्रामसेवकांचे (एमआरईजीएस) पूर्व सूचना व लेखी कारण न मागविता त्यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम परत करावी, या विविध मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. ग्रामसेवक युनियनने दिलेल्या निवेदनात आंदोलनादरम्यान ग्रामसेवक शासनाच्या मासिक, त्रैमासिक बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मात्र ग्रामपंचायतीमध्ये राहून जनतेची कामे करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. ग्रामसेवकाच्या जिल्ह्यातील या असहकार आंदोलनामुळे प्रशासनाच्या योजना व माहिती जनतेपर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होऊन प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आंदोलनाचे टप्पेजिल्हाभरातील ग्रामसेवक कोणत्याही मासिक, पाक्षिक, पं.स. व जि.प. स्तरावरील इतर कोणत्याही आढावा सभेला बसणार नाहीत. जन्म, मृत्यू, पाणी टंचाई व निवडणूक ही कामे वगळता अहवाल सादर करणार नाहीत. ग्रामपंचायतीचे दप्तर तपासनीस वरिष्ठ अधिकाऱ्यास रेकार्ड उपलब्ध करुन देणार नाहीत.या असहकार आंदोलनात जिल्ह्यातील ७३५ (अंदाजे) ग्रामसेवक सहभागी आहेत. प्रशासनाला या मागण्याचे अनेकदा निवेदन दिले आहेत. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. आंदोलनादरम्यान जनतेची कामे करण्यात येणार असून प्रशासनास अहवाल देणार नाही. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.- पद्माकर अल्लीवार, जिल्हा सरचिटणीस, ग्रामसेवक युनियन जिल्हा चंद्रपूर