शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकांचा प्रशासनाविरुद्ध एल्गार

By admin | Updated: November 2, 2016 00:53 IST

मागील सहा महिन्यांपासून ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत.या मागण्याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत ...

मासिक, त्रैमासिक बैठकीवर बहिष्कार : आजपासून असहकार आंदोलनचंद्रपूर : मागील सहा महिन्यांपासून ग्रामसेवकांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत.या मागण्याकडे सतत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करीत चंद्रपूर जिल्हा ग्रामसेवक युनियनने २ नोव्हेंबरपासून जिल्हाभरातील पंचायत समितीसमोर असहकार आंदोलन पुकारले आहे.ग्रामसेवकांच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी मागील अनेक महिन्यापासून ग्रामसेवक युनियनद्वारे पत्रव्यवहार सुरू होता. मात्र दखलच घेतली जात नाही, असा आरोप आहे. शासनाचा दूत या नात्याने ग्रामीण भागात विकासाचे कार्य करुनही प्रशासनाकडून असमानतेची वागणूक मिळत आहे, ग्रामसेवक प्रशासन व राजकीय पुढाऱ्याच्या मधे भरडला जात आहे. यातून ग्रामसेवकांनी आत्महत्या केल्याचाही संघटनेचा आरोप आहे. वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार आणि वाटाघाटी करुनही समस्या कायम आहेत. त्यामुळे ग्रामसेवक युनियनने प्रशासनाविरुद्ध एल्गार पुकारीत असहकार आंदोलन करणार असल्याचे यापूर्वीच मुख्य कार्यपालन अधिकारी व ग्रामविकास मंत्रालयाला कळविले होते.निवेदनामध्ये मांडलेल्या समस्यापैकी सन २००९ पासून ग्रामसेवक संवर्गाला सेवेत कायम न करणे, कंत्राटी ग्रामसेवकाची अनामत रक्कम परत न करणे, डीसीपीएसची कपात केलेल्या रकमेच्या पावत्या न मिळणे, महात्मा गांधी, मग्रारोयोची कामे केवळ ग्रामसेवकावर थोपविणे, ग्रामसेवकाने केलेल्या कामावर नजरचुकीने अनियमितता झाल्यास ग्रामसेवकावर कारवाई करणे, वैयक्तिक शौचालयाच्या बांधकांमाची ग्रामसेवकावर सक्ती न करणे, कालबद्ध पदोन्नती प्रथम, द्वितीय लागू न करणे, ग्रामसेवकाचे सेवापुस्तके अद्यावत करणे, चिमूर पंचायत समितीत ग्रामसेवकाचे असहकार आंदोलन सुरु आहे. त्यावर कुठलीही कारवाई न करणे, प्रत्येक तालुक्यात ई टेंडरीगची सुविधा करणे, चिमूर पंचायत समितीच्या ग्रामसेवकांचे (एमआरईजीएस) पूर्व सूचना व लेखी कारण न मागविता त्यांच्या पगारातून कपात केलेली रक्कम परत करावी, या विविध मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या होत्या. ग्रामसेवक युनियनने दिलेल्या निवेदनात आंदोलनादरम्यान ग्रामसेवक शासनाच्या मासिक, त्रैमासिक बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मात्र ग्रामपंचायतीमध्ये राहून जनतेची कामे करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. ग्रामसेवकाच्या जिल्ह्यातील या असहकार आंदोलनामुळे प्रशासनाच्या योजना व माहिती जनतेपर्यंत पोहचण्यास अडचण निर्माण होऊन प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)आंदोलनाचे टप्पेजिल्हाभरातील ग्रामसेवक कोणत्याही मासिक, पाक्षिक, पं.स. व जि.प. स्तरावरील इतर कोणत्याही आढावा सभेला बसणार नाहीत. जन्म, मृत्यू, पाणी टंचाई व निवडणूक ही कामे वगळता अहवाल सादर करणार नाहीत. ग्रामपंचायतीचे दप्तर तपासनीस वरिष्ठ अधिकाऱ्यास रेकार्ड उपलब्ध करुन देणार नाहीत.या असहकार आंदोलनात जिल्ह्यातील ७३५ (अंदाजे) ग्रामसेवक सहभागी आहेत. प्रशासनाला या मागण्याचे अनेकदा निवेदन दिले आहेत. मात्र प्रशासनाने दखल घेतली नाही. आंदोलनादरम्यान जनतेची कामे करण्यात येणार असून प्रशासनास अहवाल देणार नाही. हा आंदोलनाचा पहिला टप्पा आहे. या आंदोलनाची प्रशासनाने दखल घेतली नाही तर आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल.- पद्माकर अल्लीवार, जिल्हा सरचिटणीस, ग्रामसेवक युनियन जिल्हा चंद्रपूर